शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानासाठी नातेवाइकांकडून प्रतिसाद नाही, डॉक्टरांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 03:09 IST

ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीचा श्वासोच्छवास हा थांबलेले असतो. अशा व्यक्तीच्या नातेवाइकांना अवयव दानासाठी प्रेरित केले जाते. मात्र, नातेवाइकांकडून त्याला फारसा चांगला प्रतिसाद मिळत नाही.

डोंबिवली - ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीचा श्वासोच्छवास हा थांबलेले असतो. परंतु, त्यांचे हृदय चालू असते. ब्रेनडेड झालेली व्यक्ती व्हेटीलेंटरवर जगत असते. व्हेटीलेंटर काढल्यावर ती दोन तासांपेक्षा जास्त काळ राहू शकत नाही. अशा व्यक्तीच्या नातेवाइकांना अवयव दानासाठी प्रेरित केले जाते. मात्र, नातेवाइकांकडून त्याला फारसा चांगला प्रतिसाद मिळत नाही. हा प्रतिसाद वाढवा, यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डोंबिवली शाखेतर्फे नुकताच डोंबिवली जिमखान्यात ‘दान की अदालत’ हा कार्यक्रम झाला.‘दान की अदालत’मध्ये डॉक्टरांना प्रतिकात्मक आरोपीच्या पिजाऱ्यात बसविले होते. यावेळी अभिरूप न्यायालायामार्फत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अवयव दानसारखा कठीण विषय अतिशय सहज व सोप्यारितीने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. या वेळी हृदयप्रत्यारोपण सर्जन डॉ. अन्वय मुळे, किडनी प्रत्यारोपण सर्जन डॉ. हरेश डोडेजा, झेडटीसीसीच्या सुजाता अष्टेकर, लिव्हर प्रत्यारोपण सर्जन डॉ. गौरव गुप्ता, डॉ. चारूदत्त वैती आदींनी प्रश्नांची उत्तरे दिली. आयएमएचे राज्य अध्यक्ष मंगेश पाटे आणि न्युरोलॉजिस्ट डॉ. सुनील बंदिष्टी यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिले. डॉ. राहुल पंडित यांनी वकिलाची भूमिका पार पडली. डॉ. अर्चना पाटे, सचिव डॉ. वंदना धाकतोडे आदी मान्यवर उपस्थित होते.डॉक्टरांनी सांगितले, एखाद्या व्यक्तीने अवयवदानाची इच्छा व्यक्त करून उपयोग नाही. त्याने त्याविषयी नातेवाइकांनाही माहिती दिली पाहिजे. किंवा एखाद्या व्यक्तीने अवयवदानाचा फॉर्म भरला असेल पण त्यांच्या नातेवाइकाने त्यांच्या मृत्यूबाबत माहिती न दिल्यास अवयवदान होऊ शकत नाही. त्यात ही धार्मिक मान्यता यासारख्या गोष्टी आड येतात. त्यामुळे अवयवदानाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. एखाद्या रुग्णाला आजी-आजोबा, आई-वडील असे नऊ प्रकारचे जवळचे नातेवाईक अवयव दान करू शकतात. पण त्याव्यतिरिक्त कोणी त्यांना अवयवदान करू इच्छित असेल तर त्यासाठी आॅथोरेशन कमिटीकडून तपासणी केली जाते. या समितीने परवानगी दिल्यास त्या व्यक्तीला अवयवदान करता येऊ शकते. मात्र, समितीची परवानगी नसेल तर अवयव दान करता येणार नाही, असे सांगितले.प्रतीक्षा यादी मोठीरोटो यांच्या अहवालानुसार महाराष्ट्रात २०१८ मध्ये हृदयाच्या प्रतीक्षेत ८८ रुग्ण होते. त्यापैकी ३४ रुग्णांना हृदय मिळाले आहे. किडनीच्या प्रतीक्षेत पाच हजारांहून अधिक रुग्ण आहेत. तर या वर्षात केवळ २०० रुग्णांना किडनी मिळाल्या आहेत. लिव्हरची एक हजारापेक्षा जास्त रुग्णांना गरज आहे आणि केवळ १२४ रु ग्णांना लिव्हर प्राप्त झाले आहे. फुफ्फुसची २६ जणांना गरज आहे. मात्र, आठ रुग्णांनाच ते मिळाले आहे. स्वादूपिंडची ३२ जणांना आवश्यकता आहे. या आकडेवारीवरून अवयव दानाची जागृती वाढण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :Organ donationअवयव दानthaneठाणे