शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे नियोजन होत नाही तोवर ओसी नाही; घोडबंदरच्या पाणी प्रश्नावरुन आयुक्तांचा पवित्रा

By अजित मांडके | Updated: January 24, 2024 16:17 IST

पाण्याचे आॅडीटही होत नाही

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : घोडबंदर भागाला आजही पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याची गंभीर बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. त्यामुळे घोडबंदरच्या पाण्याचे नियोजन होत नाही तो पर्यंत ओसी देऊ नका असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहर विकास विभागाला दिले आहेत. याशिवाय शहराला किती पाणी येते येते, किती पाणी नागरीकांना दिले जाते, पाण्याची चोरी, गळती किती आहे, यासंदर्भात पाण्याचे आॅडीट होणे अपेक्षित असतांना देखील त्याचे आॅडीट २००८ नंतर झालेच नसल्याची बाबही बुधवारी झालेल्या पाणी समस्येवरील जनसुनावणीत उघड झाली आहे.

पाण्याची समस्या सोडवण्यासाठी एक समिती स्थापन करून या समितीची महिन्यातून दोन वेळा बैठक घेण्याच्या अटीवर ठाण्यातील बांधकामांना परवानगी देण्याचे आदेश उच्च न्यायालयालयाने २०१७ मध्ये दिले होते.मात्र २०१७ साली स्थापन झालेल्या या तक्रार निवारण समितीच्या पाच वर्षात केवळ दोनच बैठका झाल्या होत्या. त्यानंतर बुधवारी महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या दालनात जनसुनावणी घेण्यात आली. या जनसुनावणीत घोडबंदर मधील अनेक नागरीकांनी हजेरी लावली होती. तसेच शहरातील इतर भागातील नागरीकांना देखील हजेरी लावली होती. यावेळी दक्ष नागरीक चंद्रहास तावडे यांनी शहरात पाण्याची समस्या असतांना त्याचे नियोजन कसे केले जाते, किती पाणी येते किती पाणी ठाणेकर नागरीकांना दिले जाते. पाण्याचा अपव्यय कशा पध्दतीने केला जातो, याची माहिती कशी मिळविली जाते. त्यासाठी पाण्याचे आॅडीट महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून केले जाते का? असा सवाल त्यांनी केला. मात्र २००८ नंतर पाण्याचे आॅडीटच झाले नसल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी दिली. अखेर आयुक्त अभिजीत बांगर यांनी यापुढे दरवर्षी पाण्याचे आॅडीट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता तरी पाण्याचे आॅडीट अशी अपेक्षा ठाणेकर नागरीक करीत आहेत.

दुसरीकडे घोडबंदर भागातील पाण्याची समस्या आजही सुटु शकलेली नसल्याचे वास्तव या जनसुनावणीत पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. घोडबंदर भागाला मंजुर असलेल्या पाण्याचा कोटा मिळत नाही. अनेक भागात आजही कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी पाण्याची आजही बोंब आहे, वेळेवर पाणी येत नाही, आले तरी ते किती वेळ आहे, याची माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे येथील गृहसंकुलांना दरमहा टँकरसाठी पाच ते सात लाखांचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे वास्तव येथील रहिवासी उदय शृंगारपुरे यांनी अधोरेखीत केली.

पाण्याची समस्या सुटावी यासाठी २०१३ पासून प्रयत्न केले जात असतांना देखील अद्यापही या भागाची पाण्याची समस्या सुटली नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यातही, पाणी नसतांनाही या भागात नव्याने बांधकामे उभी होत आहेत, आधीच्या रहिवाशांना पाणी मिळत नसल्याने नवीन लोकांना पाणी कसे मिळणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यावर आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाण्याचे योग्य नियोजन होत नाही, तोपर्यंत घोडबंदर भागात नव्या बांधकामांना ओसी न देण्याचे आदेश शहर विकास विभागाला दिले आहेत. परंतु पाणी समस्या केव्हा सुटणार यावर योग्य ते उत्तर मिळाले नसल्याने घोडबंदरकांची निराशा झाली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका