शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे नियोजन होत नाही तोवर ओसी नाही; घोडबंदरच्या पाणी प्रश्नावरुन आयुक्तांचा पवित्रा

By अजित मांडके | Updated: January 24, 2024 16:17 IST

पाण्याचे आॅडीटही होत नाही

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : घोडबंदर भागाला आजही पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याची गंभीर बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. त्यामुळे घोडबंदरच्या पाण्याचे नियोजन होत नाही तो पर्यंत ओसी देऊ नका असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहर विकास विभागाला दिले आहेत. याशिवाय शहराला किती पाणी येते येते, किती पाणी नागरीकांना दिले जाते, पाण्याची चोरी, गळती किती आहे, यासंदर्भात पाण्याचे आॅडीट होणे अपेक्षित असतांना देखील त्याचे आॅडीट २००८ नंतर झालेच नसल्याची बाबही बुधवारी झालेल्या पाणी समस्येवरील जनसुनावणीत उघड झाली आहे.

पाण्याची समस्या सोडवण्यासाठी एक समिती स्थापन करून या समितीची महिन्यातून दोन वेळा बैठक घेण्याच्या अटीवर ठाण्यातील बांधकामांना परवानगी देण्याचे आदेश उच्च न्यायालयालयाने २०१७ मध्ये दिले होते.मात्र २०१७ साली स्थापन झालेल्या या तक्रार निवारण समितीच्या पाच वर्षात केवळ दोनच बैठका झाल्या होत्या. त्यानंतर बुधवारी महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या दालनात जनसुनावणी घेण्यात आली. या जनसुनावणीत घोडबंदर मधील अनेक नागरीकांनी हजेरी लावली होती. तसेच शहरातील इतर भागातील नागरीकांना देखील हजेरी लावली होती. यावेळी दक्ष नागरीक चंद्रहास तावडे यांनी शहरात पाण्याची समस्या असतांना त्याचे नियोजन कसे केले जाते, किती पाणी येते किती पाणी ठाणेकर नागरीकांना दिले जाते. पाण्याचा अपव्यय कशा पध्दतीने केला जातो, याची माहिती कशी मिळविली जाते. त्यासाठी पाण्याचे आॅडीट महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून केले जाते का? असा सवाल त्यांनी केला. मात्र २००८ नंतर पाण्याचे आॅडीटच झाले नसल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी दिली. अखेर आयुक्त अभिजीत बांगर यांनी यापुढे दरवर्षी पाण्याचे आॅडीट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता तरी पाण्याचे आॅडीट अशी अपेक्षा ठाणेकर नागरीक करीत आहेत.

दुसरीकडे घोडबंदर भागातील पाण्याची समस्या आजही सुटु शकलेली नसल्याचे वास्तव या जनसुनावणीत पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. घोडबंदर भागाला मंजुर असलेल्या पाण्याचा कोटा मिळत नाही. अनेक भागात आजही कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी पाण्याची आजही बोंब आहे, वेळेवर पाणी येत नाही, आले तरी ते किती वेळ आहे, याची माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे येथील गृहसंकुलांना दरमहा टँकरसाठी पाच ते सात लाखांचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे वास्तव येथील रहिवासी उदय शृंगारपुरे यांनी अधोरेखीत केली.

पाण्याची समस्या सुटावी यासाठी २०१३ पासून प्रयत्न केले जात असतांना देखील अद्यापही या भागाची पाण्याची समस्या सुटली नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यातही, पाणी नसतांनाही या भागात नव्याने बांधकामे उभी होत आहेत, आधीच्या रहिवाशांना पाणी मिळत नसल्याने नवीन लोकांना पाणी कसे मिळणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यावर आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाण्याचे योग्य नियोजन होत नाही, तोपर्यंत घोडबंदर भागात नव्या बांधकामांना ओसी न देण्याचे आदेश शहर विकास विभागाला दिले आहेत. परंतु पाणी समस्या केव्हा सुटणार यावर योग्य ते उत्तर मिळाले नसल्याने घोडबंदरकांची निराशा झाली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका