शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

ठाणे लोकसभेसाठी कुठलीच नावे चर्चेत नाही, नरेश म्हस्के यांचे स्पष्टीकरण

By अजित मांडके | Updated: February 22, 2024 18:25 IST

आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर ठाणे लोकसभा मतदारसंघावर महायुतीच्या तिन्ही पक्षाकडून आपापल्या पद्धतीने दावे दाखल केले गेले.

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच महायुतीच्या तिन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यातून तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची नावे पुढे येत असताना, शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे लोकसभेसाठी कुठलीच नावे चर्चेत नसल्याचे स्पष्टीकरण देत, या मतदारसंघात वरिष्ठ जो उमेदवार देतील, त्याचे काम करणारा असून पक्षीय भेदभाव आम्ही बाजूला ठेवणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर ठाणे लोकसभा मतदारसंघावर महायुतीच्या तिन्ही पक्षाकडून आपापल्या पद्धतीने दावे दाखल केले गेले. त्यातूनच भाजपाकडून माजी खासदार संजीव नाईक, विनय सहस्रबुद्धे, आमदाफ संजय केळकर तर शिवसेनेकडून आमदार प्रताप सरनाईक,माजी आमदार रवींद्र पाठक, माजी महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून माजी खासदार आनंद परांजपे यांची नावे इच्छुकांच्या यादीत पुढे येत आहे. याबाबत म्हस्के यांना विचारले असता, महायुतीत सध्यातरी कुठली ही नावे चर्चेत नाहीत. 

कुठल्याही पक्षाचा उमेदवार जाहीर होईल, त्यावेळी तो आपला उमेदवार, आमचा उमेदवार, मी उमेदवार आहे. अशा पद्धतीने ठाणे लोकसभा मतदारसंघात आम्ही काम करणार आहोत. त्यामुळे हा इच्छुक, तो इच्छुक,मी इच्छुक असे काही नाही. तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो आम्ही मान्य करून काम करणार आहोत असेही म्हस्के यांनी यावेळी स्पष्ट केले. तर  पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना जो शब्द दिला आहे. तो म्हणजे महाराष्ट्रात ४८ जागा निवडून आणण्याचा तो शब्द आम्हीं पाळणार आहोत. यासाठी दिलेला उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार आहोत, यावेळी पक्षीय भेदभाव आम्ही बाजूला ठेवणार असल्याचेही यावेळी म्हस्के यांनी जाहीर केले.

रविवारी ठाण्यातील जाहीर सभेत आदित्य ठाकरे यांनी पुनरुचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  मतदारसंघात लढण्याचे जाहीर आव्हान दिले. त्यावर म्हस्के यांनी ठाणे तर लांबच आहे, कल्याण मध्ये लढा आमच्या विरोधात सर्वांनी लढा असा टोला लगावला. जर तुमच्या हिम्मत असेल तर वरळीत लढा.वरळी सोडून शिवडी हा पर्याय का शोधता असा सवाल उपस्थित करत, आदित्य ठाकरे हे बालिश असल्याचाही उल्लेख केला.

टॅग्स :thaneठाणे