शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

 तुम्ही कोण आहेत हे महत्वाचे नाही तर तुम्ही काय करता हे अतिशय महत्वाचे : अमृत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 16:26 IST

वाचन प्रेरणा दिनानिमित्त बालगोपाळांचा खास कार्यक्रम आयोजित केला होता. 

ठळक मुद्दे तुम्ही कोण आहेत हे महत्वाचे नाही तर तुम्ही काय करता हे अतिशय महत्वाचे : अमृत देशमुखइंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी या अभिवाचनामध्ये सहभागी झाले होते उत्तम ग्रंथांच्या सहवासात आलो, त्यातुन जगण्याचा मंत्र मिळाला : अमृत देशमुख

ठाणे : तुम्ही कोण आहेत हे महत्वाचे नाही तर तुम्ही काय करता हे अतिशय महत्वाचे आहे. पुस्तक वाचनाला कुठलाही शॉर्टकट नाही. ते अपरिहार्य आहे. मी पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असलो तरी माझे पहिले प्रेम हे क्लिष्ट आकडेमोडीवर न बसता अभिजात अक्षरांवर बसले. पुस्तकांची गोडी, प्रेम हे माझ्या मोठ्या भावामुळे लागले ते कायमचे. जीवनात प्रचंड नैराश्य आले होते , काय करावे समजत नव्हते मात्र उत्तम ग्रंथांच्या सहवासात आलो, त्यातुन जगण्याचा मंत्र मिळाला, वाचनामुळे प्रगल्भ झालो आणि आयुष्य सत्कारणी लागले. पुढे ही वाचनाची गोडी फक्त माझ्याच पुरतीच  सीमित  न ठेवता माझ्या लाखो मित्र मंडळींना ही गोडी लावण्यासाठी दिवसरात्र मी झटू लागलो. उत्तम पुस्तकं वाचल्याचा फायदा या मित्रमंडळींना नक्कीच झाला. पुढे तर वाचक रसिकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे मी Booklet Guy नावाचे मोबाईल ऍप सुरु केले जे अँपल आणि अँड्रॉइड यांनी फ्री मध्ये वाचकांना उपलब्ध करून दिले.  ‘मेक इंडिया रीड’ या माझ्या मिशनला फॉलो करणाऱ्यांची संख्या आता लाखांच्या घरात आहे. वर्षअखेपर्यंत ती कोटीपर्यंत जाईल याची खात्री मला आहे." एका मिनिटात दीडशे शब्द, एका दिवसात एक पुस्तक, आणि आत्तापर्यंत तब्बल १३५० पुस्तकांचे वाचन करणारा अमृत देशमुख मंचावरून उपस्थित मुलांशी, त्यांच्या पालकांशी आणि वाचकांशी संवाद साधत होता.                                                  

                     निमित्त होते, व्यास क्रिएशन्सच्या आणि थिएटर कोलाज यांच्या संयुक्त विद्यमाने  सहयोग मंदिर मध्ये सजली अभिवाचनाची अभिनव मैफल. इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी या अभिवाचनामध्ये सहभागी झाले होते हे महत्वाचे. काही विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा गंध समजून, उमजून तो व्यासपीठावर सुंदरपणे  सादर केला. अनेक विद्यार्थ्यांचे पालक या कार्यक्रमास उपस्थित होते. आपली मुले अगदी सहजपणे मराठीत, हिंदीत व्यक्त होत आहेत याचा आनंद आणि समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.  थिएटर कोलाजच्या संस्थापिका, अभिनेत्री आणि उत्तम निवेदिका पल्लवी वाघ-केळकर आणि व्यास क्रिएशन्सचे सर्वेसर्वा  निलेश गायकवाड यांना या कार्यक्रमाचे श्रेय निश्चितपणे जाते. वाघ यांनी सुरवातीस आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचा उद्देश आणि रूपरेषा समजून सांगितली. त्यानंतर निलेश गायकवाड यांनी व्यासची वाटचाल विशद केली. याचवेळी व्यास क्रिएशन्स यांनी अभिनव अश्या अक्षरठेव योजनेचा शुभारंभ केला. ठराविक रक्कम तीन वर्षासाठी व्यासपाशी ठेवल्यावर प्रतीवर्षी व्यास प्रकाशनाची पुस्तके वाचकांना दिली जातील, ती त्यांच्याच मालकीची होतील आणि तीन वर्षानंतर मूळ रक्कम ( प्रशासकीय खर्च वगळून ) वाचकाला परत केली जाईल.शुभारंभाच्याच दिवशी अनेक वाचक रसिकांनी या योजनेची माहिती करून घेतली आणि काही जणांनी तर रक्कम गुंतवून या योजनेचा लाभही घेतला. योजनेचा संपूर्ण तपशील व्यास क्रिएशनच्या कार्यालयात उपलब्ध आहे. यानंतर साहित्यिका डॉ. निर्मोही फडके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधला. पालकांनी आपल्या मुलांना पुस्तकाकडे कसे वळवावे याबद्दल आपली भूमिका मांडली. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वानीच आपली मातृभाषा टिकवणे, रुजवणे आणि वाढवणे हे किती आवश्यक आहे याबद्दल आपली मते मांडली. यानंतर मुलांचे सहजसुंदर असे अभिवाचन झाले. मराठीतले ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांची अभ्यास ही कथा, काठ का घोडा ही हिंदीतली कथा, तर लेखक मोहम्मद अशरफ खान यांची भुक्कड दादाजी ही कथा, बोबडी सुटली ही डॉ सुमन नवलकर यांची कथा यांचे अभिवाचन मंचावर झाले. त्यास पालकांचा आणि रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका वृंदा दाभोलकर यांनी केले तर  सुजाता भिडे यांनी मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक