शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

ओबीसींच्या कोट्यातून मराठा आरक्षण नको!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 00:43 IST

कुणबी सेनेचा तीव्र विरोध : रस्त्यावर उतरून लढाई लढण्याचा इशारा

वाडा : सध्या महाराष्ट्रात शासकीय, राजकीय व सामाजिक पटलावर मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत आहे. मराठा समाजाला सरकारने १२ टक्के आरक्षण देऊ केले आहे. हे आरक्षण ओबीसी आरक्षणातून सरकार देत असेल, तर त्याला आमचा विरोध आहे. त्याविरोधात राज्यभर रस्त्यावर उतरून आरक्षणाचा वणवा पेटवू, असा सज्जड इशारा कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी बुधवारी वाडा येथे पत्रकार परिषदेत दिला.

राज्यात कोकण, विदर्भ, मराठवाडा व खानदेश या प्रदेशांत कुणबी समाजाची सुमारे ३५ टक्के लोकसंख्या आहे. हा समाज अतिशय तुटपुंज्या शेतीवर गुजराण करीत आहे. नोकऱ्यांचा अभाव व तुटपुंजी शेती यामुळे कर्जबाजारी झाला आहे. ओबीसीवर्गात सुमारे ३५० जातींचा समावेश केला आहे. वर्षानुवर्षे झालेल्या अन्यायामुळे बाराबलुतेदार वर्गात मोडणाºया सर्व जातींमध्ये असंतोषाची भावना असताना मराठा समाजाचा समावेश ओबीसीवर्गात केल्याने अधिक मागास असलेल्या जातींवर अन्याय होणार असल्याचे पत्रकार परिषदेत पाटील यांनी सांगितले. यावेळी तालुकाप्रमुख प्रल्हाद शिंदे, नेते आत्माराम भोईर, नितीन पाटील, सतीश पष्टे, राजन नाईक, प्रदीप हरड आदी पदाधिकारी उपस्थित होते.ओबीसी समाज देशोधडीला!पेसा कायद्यावर ते म्हणाले की, महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्रात पेसा कायद्यामुळे आदिवासींसाठी १०० टक्के आरक्षण घोषित केल्याने त्याचा जबर फटका ठाणे, पालघर, धुळे, नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर, भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यांतील ओबीसी समाजाला बसला आहे. त्यातच आता मराठा आरक्षण दिल्याने ओबीसी समाज पुरता देशोधडीला लागणार आहे. १९३९ नंतर जातनिहाय जनगणना जाहीर झालेली नसताना मराठा समाजाला १२ टक्के आरक्षण दिले कुठून? त्यासाठी कोणते निकष लावले, हे सरकारने जाहीर करावे, असा सवालही त्यांनी सरकारला केला. बाराबलुतेदार संघटनांना एकत्र करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

टॅग्स :thaneठाणेmarathaमराठाOBCअन्य मागासवर्गीय जाती