शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

साडेसात लाखांना नाही ‘आधार’

By admin | Updated: June 15, 2017 03:05 IST

केंद्रातील मोदी सरकारने सर्व व्यवहार आधार कार्डाशी जोडण्याचे फर्मान काढल्याने प्रत्येक व्यक्तीला ‘आधार’ सक्तीचा झाला आहे. परंतु एप्रिलपासुन तांत्रिक कारणे सांगत

- राजू काळे । लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : केंद्रातील मोदी सरकारने सर्व व्यवहार आधार कार्डाशी जोडण्याचे फर्मान काढल्याने प्रत्येक व्यक्तीला ‘आधार’ सक्तीचा झाला आहे. परंतु एप्रिलपासुन तांत्रिक कारणे सांगत सर्व आधार केंदे्र बंद करण्यात आल्याने एकट्या ठाणे जिल्ह्यातील सुमारे साडेसात लाख लोक आधार नोंदणीपासून वंचित राहिल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यातच ऐन शाळा सुरु होण्याच्या काळात विद्यार्थ्यांचीही पंचाईत होणार असल्याचे स्पष्ट झाले.शाळेतील विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. अनेकदा चार ते सात वर्षाच्या मुलांच्या हाताचे ठसे स्पष्ट दिसून येत नसल्याने त्यांची आधार नोंदणी करण्यात येत नव्हती. अखेर त्यांच्या नावासह केवळ छायाचित्राचा समावेश असलेली आधार नोंदणी सुरु करण्यात आली. यामुळे प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांची नोंदणी सक्तीची केली. त्याची मागणी पालकांकडे करण्यात येऊ लागली. यातच एप्रिलपर्यंत सुरु असलेली आधार नोंदणी अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांची पंचाईत झाली. नोंदणीसाठी वापरण्यात येणाऱ्या संगणक प्रणालीचे अपग्रेडेशन करण्याचा निर्णय सरकारने फेब्रुवारीमध्ये घेतला होता. त्याला संबंधित कंपन्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. परिणामी आधार नोंदणीचे काम करणऱ्या मेसर्स पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज प्रा. लि. या कंपनीने आधार नोंदणी करणाऱ्या सर्व एजन्सींचे काम बंद केले. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून आधार नोंदणी बंद पडली आहे. त्याचवेळी बँकांकडूनही आधार कार्डाची मागणी केली जात आहे. आधार कार्ड वेळेत सादर न केल्यास त्यांचे बँकेतील व्यवहार रोखण्याचा इशारा बँकांनी दिली आहे. तसेच रेशनकार्डाला आधार संलग्न करण्यासाठीही पुरवठा कार्यालयाकडून आधार कार्डाची मागणी केली जात आहे. त्याची प्रत निश्चित वेळेत जमा न केल्यास रेशनवरील धान्य मिळणार नसल्याचा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे आधार नोंदणी न केलेल्या गरीब व सामान्य कुटुंबाची परवड होण्याची शक्यता आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनाही आधारची सक्ती करण्यात आली आहे. शाळा सुरु होण्यास केवळ एक दिवसाचा अवधी असताना ही मागणी झाली. त्यामुळे आता वंचित विद्यार्थ्यांना आधार कार्ड मिळण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र केंद्रे सुरू झालेली नाहीत.७७ लाखांची आधारनोंदणी२०१५ मधील नोदींनुसार ८५ लाख २९ हजार २१७ इतक्या लोकसंख्येपैकी ७७ लाख ७९ हजार १२७ लोकांनी आधार नोंदणी केल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थानिक प्रशासनांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. अद्याप सात लाख ५० हजार ९० व्यक्ती आधार नोंदणीपासून वंचित असून त्यांच्यासाठी त्वरित आधार नोंदणी केंद्र सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बंद पडलेली आधार नोंदणी सुरु करण्याचे काम त्वरित केले जाणार आहे. - सुधीर राऊत, अतिरिक्त आयुक्त आधार कार्ड हा भविष्यात एकमेव पुरावा ग्राह्य धरला जाणार असल्याने प्रत्येकाला आधार नोंदणी बंधनकारक आहे. त्यासाठी त्याची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी पालिकेला निर्देश देण्यात आले आहेत. - अरुण देशपांडे, राज्य ग्राहक सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष