शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

दावा, हरकती प्रलंबित असल्याने 'त्या' शेतकऱ्यांना मोबदला नाही, प्रांताधिकारांचे स्पष्टीकरण

By नितीन पंडित | Updated: September 16, 2022 15:26 IST

भिवंडी उपविभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून अनेक शासकीय प्रकल्प जात असल्याने भिवंडीतील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी बाधीत झाल्या आहेत.

भिवंडी : भूसंपादन प्रक्रियेत दावा अथवा हरकती आल्यास त्यांचा निकाल जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत जमीन बाधीत शेतकऱ्यांना त्यांच्या बाधीत जमिनीचा मोबदला दिला जात नाही, बाधीत प्रकरणात जर दावा व हरकती नसल्या तर मोबदला त्वरित देण्यात येतो, असे स्पष्टीकरण भिवंडी प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी शुक्रवारी दिले आहे.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात बाधित जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी मागील अडीच महिने प्रांत कार्यालयात हेलपाटे मारून व जमिनीचे रजिस्टर प्रक्रिया पार पडूनही मोबदला न मिळाल्याने भिवंडी तालुक्यातील अंजुर येथील ८७ वर्षीय उंदऱ्या दोडे या वृद्धांचा मानसिक तणावात मृत्यू झाला असल्याचा आरोप मयत वृद्धाच्या वारसांनी केला आहे.

अंजुर येथील सर्व्हे नं २६७/२ मधील जमीन मुबंई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात बाधीत झाली असून या बाधीत जमीन प्रकरणात मनोजकुमार जीतप्रताप सिंग यांची हरकत असून एका प्रकरणात दावा देखील प्रांत कार्यालयात प्रलंबित आहे. जो पर्यंत हरकती व दावा यासंदर्भातील निकाल लागत नाही तोपर्यंत बाधीत शेतकऱ्यांना मोबदला देता येत नाही.अंजुर येथील उंदऱ्या दोडे या शेतकऱ्यांच्या प्रकरणातील एका दाव्याचा निकाल लागला आहे. मात्र एक हरकत व एका दाव्याचा निकाल अजूनही प्रलंबित असून सदर प्रकरण हे न्यायालयात देखील न्यायप्रविष्ठ असल्याने शेतकऱ्यांना मोबदला दिलेला नसल्याची माहिती भिवंडी प्रांताधिकारी वाकचौरे यांनी दिली आहे.

अंजुर प्रकरणात शेतकरी व हरकतदार यांपैकी कुणालाही मोबदला दिला नसून बाधीत जमिनीच्या मोबदल्याची रक्कम शासनाकडेच आहे, जेव्हा निकाल लागेल त्यानुसार मोबदला वाटप होईल. मात्र तरीही कार्यालयाला व अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचे काम विनाकारण होत असून मयत शेतकरी हे ८७ वर्षीय वयोवृद्ध इसम होते आणि एका प्रकरणातील सुनावणीत त्यांच्या मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली आहे. 

भिवंडी उपविभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून अनेक शासकीय प्रकल्प जात असल्याने भिवंडीतील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी बाधीत झाल्या आहेत.या बाधीत जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना देतांना प्रांत कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून टक्केवारीनुसार पैशाची मागणी होत असल्याचे आरोप शेतकरी करीत असतात त्यामुळे भिवंडी प्रांत कार्यालय मागील काही दिवसांपासून सतत वादात सापडले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी