शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
2
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
5
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
6
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
8
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
9
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
10
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
11
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
12
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
13
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
14
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
15
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
16
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
17
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
18
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
19
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
20
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...

दावा, हरकती प्रलंबित असल्याने 'त्या' शेतकऱ्यांना मोबदला नाही, प्रांताधिकारांचे स्पष्टीकरण

By नितीन पंडित | Updated: September 16, 2022 15:26 IST

भिवंडी उपविभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून अनेक शासकीय प्रकल्प जात असल्याने भिवंडीतील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी बाधीत झाल्या आहेत.

भिवंडी : भूसंपादन प्रक्रियेत दावा अथवा हरकती आल्यास त्यांचा निकाल जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंत जमीन बाधीत शेतकऱ्यांना त्यांच्या बाधीत जमिनीचा मोबदला दिला जात नाही, बाधीत प्रकरणात जर दावा व हरकती नसल्या तर मोबदला त्वरित देण्यात येतो, असे स्पष्टीकरण भिवंडी प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी शुक्रवारी दिले आहे.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात बाधित जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी मागील अडीच महिने प्रांत कार्यालयात हेलपाटे मारून व जमिनीचे रजिस्टर प्रक्रिया पार पडूनही मोबदला न मिळाल्याने भिवंडी तालुक्यातील अंजुर येथील ८७ वर्षीय उंदऱ्या दोडे या वृद्धांचा मानसिक तणावात मृत्यू झाला असल्याचा आरोप मयत वृद्धाच्या वारसांनी केला आहे.

अंजुर येथील सर्व्हे नं २६७/२ मधील जमीन मुबंई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात बाधीत झाली असून या बाधीत जमीन प्रकरणात मनोजकुमार जीतप्रताप सिंग यांची हरकत असून एका प्रकरणात दावा देखील प्रांत कार्यालयात प्रलंबित आहे. जो पर्यंत हरकती व दावा यासंदर्भातील निकाल लागत नाही तोपर्यंत बाधीत शेतकऱ्यांना मोबदला देता येत नाही.अंजुर येथील उंदऱ्या दोडे या शेतकऱ्यांच्या प्रकरणातील एका दाव्याचा निकाल लागला आहे. मात्र एक हरकत व एका दाव्याचा निकाल अजूनही प्रलंबित असून सदर प्रकरण हे न्यायालयात देखील न्यायप्रविष्ठ असल्याने शेतकऱ्यांना मोबदला दिलेला नसल्याची माहिती भिवंडी प्रांताधिकारी वाकचौरे यांनी दिली आहे.

अंजुर प्रकरणात शेतकरी व हरकतदार यांपैकी कुणालाही मोबदला दिला नसून बाधीत जमिनीच्या मोबदल्याची रक्कम शासनाकडेच आहे, जेव्हा निकाल लागेल त्यानुसार मोबदला वाटप होईल. मात्र तरीही कार्यालयाला व अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचे काम विनाकारण होत असून मयत शेतकरी हे ८७ वर्षीय वयोवृद्ध इसम होते आणि एका प्रकरणातील सुनावणीत त्यांच्या मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली आहे. 

भिवंडी उपविभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून अनेक शासकीय प्रकल्प जात असल्याने भिवंडीतील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी बाधीत झाल्या आहेत.या बाधीत जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना देतांना प्रांत कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून टक्केवारीनुसार पैशाची मागणी होत असल्याचे आरोप शेतकरी करीत असतात त्यामुळे भिवंडी प्रांत कार्यालय मागील काही दिवसांपासून सतत वादात सापडले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी