शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वर्दळीच्या रस्त्यावरील अनधिकृत इमारतीची तक्रार करूनदेखील पालिकेची कारवाई नाही; तक्रारदार कोर्टात

By धीरज परब | Updated: April 26, 2025 15:21 IST

Mira Road News: नगररचना विभागाने बांधकामास परवानगी नसल्याचे प्रभाग अधिकारी यांना लेखी कळवून सुद्धा कारवाईच न केल्याने अनधिकृत बांधकाम तयार होऊन त्यात दुकाने देखील थाटली गेली. आता मुंबई उच्च न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया करून करून कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. 

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन नाका ह्या दाटीवाटीच्या आणि अरुंद रस्ता व गटारच्या भागात अनधिकृत इमारत बांधकाम सुरु झाल्या पासून स्थानिक ग्रामस्थ असलेल्या वकिलाने महापालिकेत तक्रारी केल्या. नगररचना विभागाने बांधकामास परवानगी नसल्याचे प्रभाग अधिकारी यांना लेखी कळवून सुद्धा कारवाईच न केल्याने अनधिकृत बांधकाम तयार होऊन त्यात दुकाने देखील थाटली गेली. आता मुंबई उच्च न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया करून करून कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. 

भाईंदरचा उत्तन नाका हा आधीच अरुंद असून त्याठिकाणी अनेक जुनी तर अनेक नव्याने अनधिकृत बांधकामे झाली आहेत. नाक्या वरून भाईंदर आणि पाली कडे जाणारा रस्ता सुद्धा अतिशय अरुंद असल्याने दिवसरात्र वाहतूक कोंडी, हॉर्नचे आवाज असा जाच सुरूच असतो. उत्तन नाका येथे सीटीएस क्र. ४३५ ह्या ८७ चौमी जागेत सार्वजनिक मुख्य रस्ता - गटार लगत जागा तसेच आजूबाजूस जागा न सोडता बांधकाम सुरु असल्याने भविष्यात येथील रस्ता रुंद होणार नाही अशी तक्रार सप्टेंबर २०२२ मध्ये ऍड. मेरलोन अल्मेडा यांनी तत्कालीन प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांना केली होती. 

मात्र गायकवाड यांनी अनधिकृत बांधकामावर रीतसर कारवाई न करता उलट पालिका बांधकाम विभागास पत्र देऊन तक्रारदारास बांधकाम मधील नाले व रस्ता या मधील अंतराची माहिती द्यावी असे आश्चर्यकारक उत्तर दिले. महत्वाचे म्हणजे पालिकेच्या नगररचना विभागाने सुद्धा सदर जागेत बांधकाम परवानगी दिली नसल्याचे लेखी कालवून सुद्धा प्रभाग अधिकारी यांनी दुर्लक्ष केले. 

माहिती अधिकारात सुद्धा तत्कालीन उपायुक्त मारुती गायकवाड व कांचन गायकवाड यांनी अनधिकृत बांधकाम निदर्शनास आल्यावर सुद्धा कारवाई केली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागली असे ऍड. अल्मेडा यांनी सांगितले. 

परंतु प्रभाग अधिकारी व उपायुक्त यांनी वेळीच अनधिकृत बांधकाम थांबवून कारवाई न केल्याने आज दोन मजल्याची इमारत होऊन खाली दुकाने सुद्धा थाटली गेली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने आता कायदेशीर मार्गाचा अवलंब करत कार्यवाहीचे आदेश दिल्याने ऍड . मेरलोन यांनी आयुक्त, प्रभाग अधिकारी यांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे.   

टॅग्स :mira roadमीरा रोडMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकHigh Courtउच्च न्यायालय