शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

ठाण्याच्या जलवाहतुकीसाठी तीन आठवड्यात केंद्राशी करार करण्याच्या केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या पालिकेला सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 7:04 PM

ठाण्याच्या जलवाहतुकीसंदर्भात आणखी एक पाऊल पडले असून, येत्या तीन आठवड्यात या प्रकल्पाबाबत केंद्राशी करार करण्याच्या सुचना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ठाणे महापालिकेला दिल्या आहेत.

ठळक मुद्देपहिल्या टप्यात ठाणे ठाणे -वसई-कल्याण मार्ग होणार सुरुपाण्यावर चालणाऱ्या अँफिबियस बसचाही वापर करण्याची सूचना

ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाला गती मिळणार असून सोमवारी केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या दालनात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलेल्या योजनेच्या सादरीकरणानंतर महापालिकेने तीन आठवड्यात या प्रकल्पाबाबत केंद्राशी करार करण्याच्या सूचना गडकरी यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या. तर जलवाहतुकीसाठी बोटींबरोबर जमीन तसेच पाण्यावर चालणाऱ्या अ‍ॅफीबियस बसचाही वापर करण्याची सुचना गडकरी यांनी यावेळी दिल्या.               या बैठकीस खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत जलवाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अंतर्गत जलवाहतूक या महत्वाकांक्षी प्रकल्पातंर्गत ठाणे-वसई-कल्याण, ठाणे ते मुंबई आणि ठाणे ते नवी मुंबई या मार्गावर जलवाहतूक सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. यासंर्दभातील तपशीलवार प्रकल्प अहवाल तज्ज्ञ सल्लागार मे. मेडुला सॉप्ट टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यासंदर्भातील सादरीकरण महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी वाहतूक भवनात गडकरी यांच्यासमोर सादर केले. यावेळी या प्रकल्पाच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त करूनगडकरी यांनी ठाणे महानगरपालिकेने तीन आठवड्यात केंद्र सरकारच्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प विभागाशी सामंजस्य करार करावा जेणेकरून या प्रकल्पासाठी लागणाºया निधीचे वितरण करणे सुलभ होईल असे सांगितले. तसेच या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी त्यांनी आयआयटी, चेन्नई, जेएनपीटी, बीपीटी आणि कोचीन शीपयार्ड या संस्थांशीही समन्वय साधण्याच्या सूचना देतानाच या प्रकल्पातंर्गत जागतिक दर्जाच्या सुविधा आणि तंत्रज्ञान पुरविण्याबाबत त्यांनी महापालिकेस आश्वासन दिले. हा प्रकल्प यशस्वीपणे चालावा यासाठी प्रकल्पाच्या दुरूस्तीचे आणि निगा व देखभालसाठी प्रकल्प परिसरातच अत्याधुनिक केंद्र उभारण्याच्या सूचना देतानाच या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील नागरिकांना कमी वेळात प्रदुषणविरहित जागतिक दर्जाची सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.               दरम्यान हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ही सेवा वसई-ठाणे-कल्याण या मार्गावर सुरू करण्यात येणार असून त्यासाठी लागणारा निधी केंद्र सरकारकडून प्राप्त होणार आहे. या प्रकल्पातंर्गत चालविण्यात येणाऱ्या  बोटी या सीएनजी आणि मिथेनॉलवर चालणाऱ्या  असल्याने ही वाहतूक प्रदुषणविरहित असणार आहे. तसेच कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीसाठी बोटींबरोबरच जमीन तसेच पाण्यावर चालणाऱ्या अँफिबियस बसचाही वापर करण्याची सूचना गडकरी यांनी केली. या जलवाहतूक आराखड्यात दिव्याचाही समावेश करण्याची मागणी यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या तुलनेत हा किफायतशीर पर्याय ठरणार असल्यामुळे दिव्याचा देखील या प्रकल्पात समावेश करण्याची मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाwater transportजलवाहतूक