शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरी यांनी चव्हाणांना केले लक्ष्य?, फडणवीस यांच्याशी जवळीक वाढल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 02:31 IST

एकेकाळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची अलीकडच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मंत्री अशी नवी ओळख दृढ झाल्यानेच गडकरी यांनी ‘डोंबिवली घाणेरडी’, अशी शेरेबाजी करुन चव्हाण यांना लक्ष्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

- अनिकेत घमंडी डोंबिवली : एकेकाळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची अलीकडच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मंत्री अशी नवी ओळख दृढ झाल्यानेच गडकरी यांनी ‘डोंबिवली घाणेरडी’, अशी शेरेबाजी करुन चव्हाण यांना लक्ष्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.यापूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या माध्यमातून चव्हाण हे गडकरी गटाचे, असे ओळखले जात होते. मात्र आता दुसºयांदा आमदार झाल्यानंतर व राज्यमंत्री म्हणून चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जवळीक खूप वाढली.मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच त्यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद सोपवले. त्यामुळे गडकरी यांचे लक्ष्य डोंबिवली अथवा डोंबिवलीकर नसून चव्हाण असल्याचे बोलले जात आहे. राज्यमंत्री चव्हाण यांना आमदारकीचे तिकिट मिळवून देण्यात गडकरी यांचा मोठा वाटा आहे.तत्कालीन आमदार-महापौर हरिश्चंद्र पाटील यांना आमदारकीचे तिकीट डावलून चव्हाण यांना २००९ मध्ये देण्यात आले. पाटील हे मुंडे गटाचे समर्थक होते. मुंडे गटाला शह देत गडकरी गटाने चव्हाण यांना उमेदवारी दिली होती.चव्हाण यांचे नेतृत्वगुण हेरुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी, त्यांना ठाणे, उल्हासनगर, भार्इंदर, पनवेल आदी ठिकाणी निवडणूक प्रभारी म्हणून, तसेच कोकणातील ग्रामपंचायत, नगरपरिषदांसह अन्य संपर्काची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यामुळे चव्हाण यांची ओळख अलीकडच्या काळात फडणवीस यांचे विश्वासू मंत्री, अशी झाली. डोंबिवलीतील गडकरी, तावडे यांच्या फेºया कमी झाल्या. नेमकी तीच सल गडकरींच्या मनात असल्याचे भाजपातील काहींचे म्हणणे आहे.>‘श्रेष्ठींच्या विधानावर मत देणे तत्त्वात नाही’गडकरी यांची डोंबिवलीवरील टीका, त्यावरुन उठलेले काहूर आणि त्याचे भाजपांतर्गत राजकारणाचे पदर याबाबत राज्यमंत्री चव्हाण यांना विचारले असता पक्षश्रेष्ठींच्या विधानावर मत देणे पक्षाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बसत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. कामातून बोलणे सर्वाधिक योग्य राहील असे सूचक विधान त्यांनी केले.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीdombivaliडोंबिवली