शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

नितीन गडकरी यांनी चव्हाणांना केले लक्ष्य?, फडणवीस यांच्याशी जवळीक वाढल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 02:31 IST

एकेकाळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची अलीकडच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मंत्री अशी नवी ओळख दृढ झाल्यानेच गडकरी यांनी ‘डोंबिवली घाणेरडी’, अशी शेरेबाजी करुन चव्हाण यांना लक्ष्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

- अनिकेत घमंडी डोंबिवली : एकेकाळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची अलीकडच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मंत्री अशी नवी ओळख दृढ झाल्यानेच गडकरी यांनी ‘डोंबिवली घाणेरडी’, अशी शेरेबाजी करुन चव्हाण यांना लक्ष्य केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.यापूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या माध्यमातून चव्हाण हे गडकरी गटाचे, असे ओळखले जात होते. मात्र आता दुसºयांदा आमदार झाल्यानंतर व राज्यमंत्री म्हणून चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जवळीक खूप वाढली.मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच त्यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद सोपवले. त्यामुळे गडकरी यांचे लक्ष्य डोंबिवली अथवा डोंबिवलीकर नसून चव्हाण असल्याचे बोलले जात आहे. राज्यमंत्री चव्हाण यांना आमदारकीचे तिकिट मिळवून देण्यात गडकरी यांचा मोठा वाटा आहे.तत्कालीन आमदार-महापौर हरिश्चंद्र पाटील यांना आमदारकीचे तिकीट डावलून चव्हाण यांना २००९ मध्ये देण्यात आले. पाटील हे मुंडे गटाचे समर्थक होते. मुंडे गटाला शह देत गडकरी गटाने चव्हाण यांना उमेदवारी दिली होती.चव्हाण यांचे नेतृत्वगुण हेरुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी, त्यांना ठाणे, उल्हासनगर, भार्इंदर, पनवेल आदी ठिकाणी निवडणूक प्रभारी म्हणून, तसेच कोकणातील ग्रामपंचायत, नगरपरिषदांसह अन्य संपर्काची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यामुळे चव्हाण यांची ओळख अलीकडच्या काळात फडणवीस यांचे विश्वासू मंत्री, अशी झाली. डोंबिवलीतील गडकरी, तावडे यांच्या फेºया कमी झाल्या. नेमकी तीच सल गडकरींच्या मनात असल्याचे भाजपातील काहींचे म्हणणे आहे.>‘श्रेष्ठींच्या विधानावर मत देणे तत्त्वात नाही’गडकरी यांची डोंबिवलीवरील टीका, त्यावरुन उठलेले काहूर आणि त्याचे भाजपांतर्गत राजकारणाचे पदर याबाबत राज्यमंत्री चव्हाण यांना विचारले असता पक्षश्रेष्ठींच्या विधानावर मत देणे पक्षाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बसत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. कामातून बोलणे सर्वाधिक योग्य राहील असे सूचक विधान त्यांनी केले.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीdombivaliडोंबिवली