शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

'भैया, यह दिवार टूटती क्याें नहीं?'; उद्धव आणि राज यांच्यातील राजकीय वादाचे वृत्त विश्लेषण

By संदीप प्रधान | Updated: August 12, 2024 06:02 IST

हौसेपोटी शुक्रवारी बीडमध्ये काहींनी राज यांच्या मोटारीवर सुपाऱ्या फेकून ‘सुपारीबाज’ अशी घोषणाबाजी केली. राजकारणात काहीशा बाजूला पडलेल्या मनसेला ही ‘चमकायची सुपारी’च लाभली. 

संदीप प्रधान, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: महाराष्ट्रातील ठाकरे बंधूंच्या समर्थकांनी परस्परांवर सुपारी, टोमॅटो, नारळ, शेण अशा वेगवेगळ्या खाद्य व त्याज्य पदार्थांनी मारा केल्यानंतर ‘भैया, यह दिवार टूटती क्याें नहीं?’ असा सवाल सर्वसामान्यांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. ईर्षा व मत्सर या पायावर उभे राहिलेले पक्ष राजकारणात एकमेकांचे मित्रपक्ष होऊ शकत नाहीत; त्यामुळे दोन ठाकरे, दोन पवार आणि ठाकरे-शिंदे यांच्या दोन शिवसेना यांचे नाते विळ्याभोपळ्याचेच राहणार.

महाराष्ट्रात सध्या लढाई महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असताना, राज ठाकरे यांचा ‘मनसे’ खरे तर साइडिंगला टाकलेले ‘इंजिन’ आहे; परंतु, शनिवारच्या राड्याने मनसे विनाकारण चर्चेत आला. अर्थात ही चूक उद्धवसेनेच्या अतिउत्साही सैनिकांचीच. लोकसभा निवडणुकीत मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला. त्या बदल्यात काही लाभ होईल, अशी मनसेची अपेक्षा होती. मात्र, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिंदेसेनेकडील निशाणीवर लढावे, असा प्रस्ताव दिला गेला. त्यामुळे राज नाराज झाले व बिनशर्त पाठिंबा देऊन मोकळे झाले. आता २२५ ते २५० जागांवर उमेदवार उभे करण्याकरिता घराबाहेर पडलेल्या राज यांनी दौऱ्याकरिता मराठवाडा निवडला.

मराठवाड्याने उद्धवसेनेला बऱ्यापैकी साथ दिल्याने आपणच खरी शिवसेना असल्याचे दावे करण्याचे बळ त्यांना प्राप्त झाले. राज यांचे मराठवाड्यात येणे उद्धवसेनेला रुचले नाही. मात्र, सोलापुरात राज यांनी सरसकट आरक्षणाला विरोध करून आपल्या काकांनी - बाळासाहेबांनी - २५ वर्षांपूर्वी घेतलेल्या भूमिकेची कास धरली. साहजिकच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी राज यांच्यावर तोफ डागली. धाराशिव येथे मराठा समाजातील आक्रमक तरुणांचा सामना राज यांना करावा लागला. मुदलात राज-जरांगे यांच्यात सामना रंगला असताना, इकडे उद्धव ठाकरे हे आपले राजकीय शत्रू देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांना तिखट भाषेत लक्ष्य करीत होते.

मराठवाड्यातील उद्धवसेनेच्या सैनिकांना विधानसभा निवडणुकीच्या लढाईत आपला शत्रू नेमका कोण, याचा नेमका संदेश न पोहोचल्याने म्हणा किंवा नेत्यांची मर्जी जिंकण्याकरिता काहीतरी वेगळे करण्याच्या हौसेपोटी शुक्रवारी बीडमध्ये त्यांनी राज यांच्या मोटारीवर सुपाऱ्या फेकून ‘सुपारीबाज’ अशी घोषणाबाजी केली. राजकारणात काहीशा बाजूला पडलेल्या मनसेला ही ‘चमकायची सुपारी’च लाभली. 

ठाण्यातील सभेकरिता उद्धव आले असताना, मनसैनिकांनी टोमॅटो, नारळ, शेण फेकून सव्याज परतफेड केली. कालपरवापर्यंत टोमॅटोने शंभरी गाठली होती, तेव्हा ही चैन मनसैनिकांना परवडली नसती. श्रावणात नारळाला मागणी असते, तो महाग होतो. त्यामुळे नारळ फेकणे हेही चैनीचेच लक्षण आहे. एकेकाळी पुण्यातील अभिजनांनी स्त्रीशिक्षण देणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाईंना शेण मारले होते. आता सांस्कृतिक नगरी ठाण्यात मनसैनिकांनी प्रबोधनकार ठाकरे यांचा पुरोगामी वारसा सांगणाऱ्या त्यांच्या नातवाला शेण मारले. त्यातून उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आली, तर मनसे राहिली दूर महायुतीच्या नेत्यांना कपाळाला हात लावून बसावे लागेल. आमच्या प्रकारानंतर ही शक्यता जास्त वाढली आहे.

राहता राहिला बांगड्या फेकण्याचा प्रकार, तर अनेक राजकीय पक्षाच्या महिला नेत्यांनीही बांगड्यांचे आहेर देऊन ‘महिलांना कमकुवत, अबला ठरवू नका,’ असा इशारा अनेकदा दिला आहे. आपल्या पक्षाच्या महिला कार्यकर्त्या पुरुषांनाही देताना लाज वाटेल अशा शिव्या, टीव्ही कॅमेऱ्यांसमोर देत असताना, त्यांना बांगड्या उधळण्यास भाग पाडणे हा अन्याय आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात ‘गडकरी’बाहेरील हल्ल्याचा, राज यांचा उल्लेखही केला नाही. आपण राज आणि अशा आंदोलकांना काडीचेही महत्त्व देत नाही, हेच उद्धव यांनी दाखवून दिले आहे, जे पुरेसे बोलके आहे. मग ‘भैया, यह दिवार टूटती क्याें नहीं ? सुपारी, टोमॅटो, नारियल मारने के लिए तो बनाई है,’ असेच या सर्व तमाशाबद्दल म्हणावे लागेल.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे