शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नवे कल्याण... दिसायला देखणे, पण सुविधांच्या नावे ठणाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:48 IST

एखाद्या भागाचा विकास होताना त्या ठिकाणी वसाहत उभी करणाºया विकासकांकडून ‘सुलभतेची’ स्वप्ने दाखवली जातात. परंतु, प्रत्यक्षात मात्र ही सुलभता कधीच वाट्याला येत नाही.

प्रशांत माने, कल्याणएखाद्या भागाचा विकास होताना त्या ठिकाणी वसाहत उभी करणाºया विकासकांकडून ‘सुलभतेची’ स्वप्ने दाखवली जातात. परंतु, प्रत्यक्षात मात्र ही सुलभता कधीच वाट्याला येत नाही. वसवण्यात आलेली नगरी बाहेरून सुसज्ज आणि कॉर्पाेरेट दिसत असली, तरी हा भपका कितपत दिखावा आहे, याची प्रचीती अनुभवल्याशिवाय येत नाही. असेच काहीसे चित्र नवकल्याण पाहिले की, स्पष्ट होते. जुने कल्याणच्या मानाने सुस्थितीत वसलेल्या या नवकल्याणला सद्य:स्थितीत अवकळा आली आहे. मूलभूत सुविधांची वानवा प्रकर्षाने जाणवत असताना फेरीवाले, भाजीविक्रेते यांचा वाढता पसारा आणि वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने जागोजागी दिसणारे कचºयाचे ढीग पाहता ही नवकल्याणनगरीही आता बकालतेच्या गर्तेत सापडल्याचे दिसत आहे.ठाण्यापाठोपाठ डोंबिवली, कल्याण शहरे विकसित झाल्यावर कल्याणमधीलच गावठाण भाग असलेल्या काही भागांमध्ये लोकवस्ती वाढू लागली. एकेकाळी दलदलीचा आणि टेकड्यांचा भाग असलेल्या या परिसरात टोलेजंग इमारती आणि मोठमोठे कॉम्प्लेक्स उभे राहू लागले. साधारण १९९६-९७ च्या काळापासून विकसित होणारा हा भाग ‘नवकल्याण’ म्हणून नावाजला जाऊ लागला. दाटीवाटीचा भाग असलेल्या जुने कल्याणपेक्षा हा परिसर मोकळा तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे चाळींचे अतिक्रमण नव्हते. आगरी, कोळी समाजाची वस्ती असलेल्या या परिसरात विकासाला वाव मिळाला. विकासकांनी या ठिकाणी मोर्चा वळवला. रेल्वेस्थानकापासून थोडे दूर परंतु स्वस्तातील घरे म्हणून या ठिकाणी नागरिकीकरण झपाट्याने वाढले. कल्याण हे तालुक्याचे ठिकाण आहे, तसेच या ठिकाणी तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, महापालिकेचे मुख्यालय, पंचायत समिती असल्याने या शहराला अधिक पसंती देण्यात आली. त्यात नवकल्याण हे सुनियोजित पद्धतीने उभे राहू लागल्याने येथे राहायला येणाºयांचा ओघ आपसूकच वाढला. केडीएमसी क्षेत्रातील वायलेनगर, गांधारे, उंबर्डे, बारावे, बिर्ला कॉलेज, खडकपाडा आणि मिलिंदनगर हे प्रभाग सहसा नवकल्याण परिसरात येतात. प्रारंभी जेव्हा या ठिकाणी विकास होऊ लागला, तेव्हा बेस्टची सिंगल इमारत, गोदरेज पार्क, निक्कीनगर, श्री कॉम्प्लेक्स अशी मोजकीच बांधकामे होती. बाकीचा सर्व भाग हा गावठाण होता. हळूहळू खडकपाडा, वायलेनगर, गांधारे, उंबर्डे, सापर्डे हे भाग विकसित होऊ लागले. दुर्गाडी ते प्रेम आॅटो या दरम्यानचा मुरबाड वळण रस्ता जेव्हा बनवला गेला, तेव्हापासून विकासाचा वेग वाढला. बारावे रस्ता झाल्यावर त्या ठिकाणी माधवसृष्टी कॉम्प्लेक्स उभे राहिले. जेव्हा मोठमोठी कॉम्प्लेक्स आणि गृहसंकुले उभी राहू लागली, तेव्हा अन्य विकासकांनाही या परिसराची भुरळ पडली आणि त्यांनीही या ठिकाणी बांधकामे उभी करायला सुरुवात केली. विकास आराखड्यानुसार मोठ्या रस्त्यांची बांधणी केल्यानंतर अंतर्गत रस्त्यांचेही जाळे विणले गेले. सुंदर आणि योग्य विकास अशी गणना होऊ लागलेल्या नवकल्याणमध्ये नोकरदारवर्ग, सरकारी कर्मचारी, शिक्षक अशा मध्यमवर्गीयांसह ठाणे जिल्हा आणि तालुक्यातील कुणबी समाज आणि खान्देश समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वसला. टोलेजंग इमारती पाहता येथे उच्चभ्रू वर्गाचाही कल वाढला. दरम्यान, हे नवकल्याण उभे राहून साधारण २० वर्षांचा कालावधी लोटला. परंतु, आजमितीलाही या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशा प्रमाणात पुरवण्यात संबंधित यंत्रणा यशस्वी ठरलेली नाही. त्यामुळे आजही खाजगी वाहनांशिवाय इच्छित स्थळ गाठणे, हाच एकमेव पर्याय येथील रहिवाशांसमोर आहे. रेल्वेस्थानक परिसराकडे जाण्यासाठी कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून खाजगी बसची सुविधा आहे. परंतु, तीही कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांपुरतीच मर्यादित राहत असल्याने अन्य ठिकाणी राहणाºया रहिवाशांना खाजगी वाहन आणि रिक्षा प्रवासाशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाहीत. केडीएमसीकडून भाजी मार्केटची सुविधाही आजवर देण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्त्यावर, चौकाचौकांत ठाण मांडलेले भाजीविक्रेते आणि फेरीवाल्यांकडूनच खरेदी करणे क्रमप्राप्त ठरत आहे. याच भागामध्ये केडीएमसीचा बारावे जलशुद्धीकरण केंद्राचा प्लांट असल्याने पाणी मुबलक स्वरूपात उपलब्ध होते. कॉम्प्लेक्स परिसरातील रस्ते सुस्थितीत असले, तरी या ठिकाणीही जुने कल्याणप्रमाणे अंतर्गत रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. जसे अन्य ठिकाणी कचºयाच्या समस्येने ग्रासले आहे, तसे चित्र येथेही दिसते. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छतेबरोबरच आरोग्याचा प्रश्नही आ वासून उभा राहिला आहे. नवकल्याण उभे राहिले, परंतु या नवीन नगरीत सरकारी रुग्णालयाचीही वानवा आहे.एखादे शहर अथवा नगरी वसताना त्या ठिकाणी वाढणारे नागरिकीकरण पाहता त्या बदल्यात सुविधाही उपलब्ध करून देणे, हे तेथील व्यवस्थेचे कर्तव्य आहे. परंतु, नवकल्याणची सद्य:स्थिती पाहता बकालतेची झालर असलेल्या या भागात सुसज्ज मोठे मैदानही नाही. युनियन क्रि केट क्लबचे मैदान आहे, परंतु ते छोेटे असल्याने मुलांना कॉम्प्लेक्समधील आवाराचा मैदान म्हणून वापर करावा लागतो.पार्किंगचाही प्रश्न गंभीर : पार्किंगचीही समस्या जटील बनली आहे. कॉम्प्लेक्समधील वाहनेही आता रस्त्यावर उभी केली जातात. यातही येथील मोकळ्या जागेत जुने कल्याणमधील मोठ्या बसही बिनदिक्कतपणे उभ्या केल्या जात आहे. ही नगरी वसवण्यात त्याचबरोबर चौकांचे सुभोभीकरण, रस्त्यांचा विकास असो, यात विकासकांचेही मोठे योगदान राहिले आहे. परंतु, महापालिकेची डोळेझाक आणि कृपाशीर्वादाने या नगरीला सद्य:स्थितीला अवकळा आली आहे.आजारपणात जुन्या कल्याणचा आधारकोकण वसाहतीत महापालिकेचे आरोग्य केंद्र आहे, परंतु ते लांब असल्याने ते सोयीचे नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयांवरच अवलंबून राहावे लागते. काही अपवाद वगळता काही रुग्णालयांमध्ये सुविधांच्या नावाने बोंब असल्याने येथील रहिवाशांना आजारपणात जुने कल्याणची वाट धरणे भाग पडते.आरक्षणे केवळ कागदोपत्रीचवारकरी भवन, महिला उद्योग केंद्र, मॅटर्निटी होम, उद्यान, स्टडी सेंटर आदींची आरक्षणे या नवकल्याणमध्ये आहेत. परंतु, ठोस अंमलबजावणीअभावी ही आरक्षणे कागदोपत्रीच राहिली आहेत. परिणामी, आजच्या घडीलाही या सुविधांपासून स्थानिक रहिवासी वंचित राहिले आहेत. मूलभूत सुविधांअभावी परवड होत असताना या ठिकाणी विजेचा लपंडावही कायम असल्याने ‘जुने कल्याण बरे’ अशी म्हणण्याची वेळ स्थानिकांवर ओढवली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका