शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, डोंबिवलीचे नवे वॉर्ड महिनाअखेरपर्यंत ठरणार; विविध महापालिकांना राज्य सरकारच्या सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 07:12 IST

जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर  या महापालिकांच्या निवडणुकीचा धुरळा आता दिवाळीनंतर उडण्यास सुरुवात होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर  या महापालिकांच्या निवडणुकीचा धुरळा आता दिवाळीनंतर उडण्यास सुरुवात होणार आहे. राज्य शासनाने येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ठाणे  आणि उल्हासनगर महापालिकेला वाॅर्ड रचनेला कच्चा प्रारूप आरखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. तर वसई, नवी मुंबई, केडीएमसीसाठी १८ नोव्हेंबरची मुदत दिली आहे. भिवंंडीला २५ डिसेंबर आणि मीरा-भाईंदरसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत हे आराखडे तयार करावेत, असे सांगण्यात आले. तसा अध्यादेश काढण्यात आला आहे. 

त्यानुसार डिसेंबरमध्ये खऱ्या  अर्थाने प्रभागांची रचना कशी असेल याचेही चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता प्रभाग रचना कशी होते, याची धाकधुक इच्छुकांसोबत नवख्यांनादेखील लागली आहे. त्यातही ठाण्यात ४६ वॉर्डात प्रत्येकी तीन आणि एक वॉर्ड हा ४ नगरसेवकांचा असणार आहे. उल्हासनगरला २९ वॉर्डात प्रत्येकी तीन तर एका वाॅर्डात दोन असे ८९ सदस्य असणार आहेत. केडीएमसीत तीन सदस्यांचे ४३ तर चार सदस्यांंचा एक असे ४४ वाॅर्डात १३३, नवी मुंंबईत ४० वाॅर्डात तीन तर दोन सदस्यांचा एक वाॅर्ड असे १२२ सदस्य राहणार आहेत. भिवंडीत ३३ वाॅर्डात तीन तर एका वाॅर्डात दोन असे ३४ वाॅर्डात १०१, मीरा-भाईंंदरमध्ये तीन सदस्यांंचे ३४ आणि चार सदस्यांचा एक असे ३५ वाॅर्डात १०६ सदस्य तर वसई-विरारमध्ये तीन सदस्याचे ४२ वाॅर्डात १२६ सदस्य असणार आहेत.

मातब्बर विरोधकांची काढणार विकेट२०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत २०२१ ची जणगणना गृहीत धरली आहे. त्यानुसार  आता दिवाळी नंतर लागलीच सर्व महापालिकांकडून प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करून तो त्या त्या मुदतीपर्यंत राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे. त्यामुळे आता कोणत्या ठिकाणी नगरसेवक वाढणार कोणत्या ठिकाणी नगरसेवक कमी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातही या नव्या समीकरणामुळे प्रत्येक वॉर्ड हा आता ३५ ते ३७ हजार ते ४० हजारांचा असणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातही पालिकेच्या माध्यमातून ही प्रभाग रचना झिकझॅक पद्धतीने केली जाणार की, वर्तुळाकार केली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यातून सत्ताधारी पक्षाकडून वाॅर्ड रचनेबाबत प्रशासनावर सर्वाधिक हस्तक्षेप आणि दबाव येणार असून विरोधकांच्या मातब्बर इच्छुक उमेदवारांची आताच विकेट काढली जाणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :thaneठाणे