शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

नवी प्रभाग रचना शिवसेनेच्या पथ्यावर

By admin | Updated: October 12, 2016 04:41 IST

ठाणे महापालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे. या नव्या प्रभाग रचनेनुसार जुन्या ठाण्यातील

ठाणे : ठाणे महापालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे. या नव्या प्रभाग रचनेनुसार जुन्या ठाण्यातील कोपरी, वागळे पट्यातील जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे या भागातून कोणाला तिकीट द्यायचे याबाबत शिवसेनेमध्ये खलबते सुरु असतांनाच आता ही नवी प्रभाग रचना शिवसेनेच्या पथ्यावर पडणार असल्याची खंत थेट भाजपाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला ही प्रभाग रचना कशी फायदेशीर ठरु शकते याची कारणमिमांसाच स्थानिक पदाधिकारी श्रेष्ठींकडे विषद करणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच भाजपाने अवसान गाळल्याचे बोलले जात आहे. ठाणे महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत ७ आॅक्टोबरला जाहीर झाली. तर प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडाही प्रसिद्ध झाला आहे. या प्रभाग रचनेनुसार वागळे इस्टेट, कोपरी भागात यंदा नगरसेवकांची संख्या १० ने घटली आहे. नव्या समीकरणानुसार येथून ३२ नगरसेवक निवडून येणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र काहीसा दिलासा मिळाला असून कळव्यातून १६ तर मुंब्य्रातून २० नगरसेवक निवडून येणार असल्याने त्यांना या भागांतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वर्तकनगर परिसरातून चार जादा नगरसेवक निवडून येणार असून नव्या रचनेत येथील प्रभागांची संख्या १२ झाली आहे. परंतु जुन्या ठाण्यातील नगरसेवकांची संख्या कमी झाल्याने त्याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु असे असले तरीदेखील या प्रभाग रचनेचा फायदा हा शिवसेनेलाच होऊ शकतो, किंबहुना ती शिवसेनेच्याच पथ्यावर पडणार असल्याचा दावा भाजपाने केला आहे. विशेष म्हणजे भाजपचे फारसे अस्तित्व नसलेल्या कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातून तर तब्बल ४५ म्हणजेच एक तृतीयांश नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यामुळे पालिकेत स्वबळाची स्वप्ने बघणाऱ्या भाजपमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नव्याने झालेल्या प्रभाग रचनेचे निरिक्षण केल्यानंतर भाजपच्या विद्यमान नगगरसेवकांची सुद्धा कोंडी होईल अशा पद्धतीची रचना असल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.नौपाडा, वृंदावन सोसायटी आदी परिसरातील प्रभागरचना पाहिल्यानंतर तसा संशय घेण्यास जागा असल्याचे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)