शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडेपर्यंत लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यास परवानगी नाकारावी

By अजित मांडके | Updated: November 3, 2023 12:59 IST

राष्ट्रवादी ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांची मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे मागणी

ठाणे : ठाणे शहरामध्ये दिवसेंदिवस खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे लोकवस्तीच्या ठिकाणी असलेल्या आरएमसी प्लांटमध्ये होत असलेल्या सिमेंटचा वापर. यामुळे लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यास परवानगी नाकारावी, अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.

दिल्लीप्रमाणे मुंबई तसेच मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरामध्ये देखील हवेची गुणवत्ता खालावत चालली असून त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. प्रदूषणवाढीसाठी महत्वाचे कारण असलेल्या मोठ-मोठ्या अनेक इंडस्ट्रीज सध्या बंद झाल्या आहेत. परंतु शहरामध्ये बांधकाम उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून इमारत उभारणीसाठी मोठ-मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये आरएमसी चे प्लांट उभारण्यात येतात. यामध्ये सिमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. त्यामुळे सिमेंटसारख्या सर्वात कमी मायक्रॉनचे धूलीकण, त्यासोबत वाळू तसेच खडी यांचे धूलीकण, हे हवेत मिसळल्याने धुरके तयार होते आणि ज्या ठिकाणी हे आरएमसी प्लांट उभारण्यात येतात त्या परीसरामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाची समस्या निर्माण होते.

आरएमसी प्लांटधारक हा केवळ ज्या कॉम्प्लेक्ससाठी तो प्लांट उभारण्यात आला आहे त्यासाठी त्याचा वापर न करता बाहेर देखील त्या मालाची विक्री करताना दिसत आहे. त्यामुळे वारंवार रस्त्यावर फिरणारी आरएमसी ची वाहने, त्यामधून निघणारे धुलीकण हे देखिल प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. याचा परिणाम, ज्या परिसरामध्ये हे प्लांट उभारण्यात येतात त्या परीसरातील नागरिकांना श्वसनाच्या तसेच इतर आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते, अशी माहिती त्यांनी दिली.

आरएमसी प्लांट उभारण्यासाठी अनेक परवानग्यांची आवश्यकता असते. त्यानुसार प्लांटधारकाने संबंधित महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जल (प्रतिबंधक व नियंत्रण) कायदा १९७४ नुसार परवानगी घेतली आहे का ? याची तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वी दररोज ठाणे महानगरपालिकेमार्फत हवेची गुणवत्ता, डिस्प्ले केली जायची. ती देखिल सध्या कुठे दिसत नाही. त्यामुळे ठाणे शहरामध्ये प्रदूषण यंत्रणेची काय व्यवस्था आहे हेच कळेनासे झाले आहे. एकीकडे मुंबईसह ठाणे शहरामध्ये खालावत चाललेली हवेची गुणवत्ता आणि दुसरीकडे शहरामध्ये राजरोजपणे सुरु असलेल्या आरएमसी प्लांटमुळे होत असलेले प्रदूषण यामुळे नागरीक खूप त्रस्त आहेत.

याकडे दुर्लक्ष न करता जनतेला हवेच्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकविणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यासारखे आहे. या प्रकरणी आपण जातीने लक्ष घालून ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण विभागाला, जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून विचार करता योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश द्यावेत. तसेच हवेच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे आरएमसी प्लांट ज्या-ज्या ठिकाणी सुरु असतील त्या ठिकाणी संबंधीत प्लांट धारकाने आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत का? त्याला काम सुरु असलेल्या कॉम्प्लेक्सच्या व्यतिरीक्त बाहेर माल विकण्याची परवानगी आहे का ? याची तपासणी करावी. तसेच जोपर्यंत ठाणे शहर प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.