शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

ठाणे प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडेपर्यंत लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यास परवानगी नाकारावी

By अजित मांडके | Updated: November 3, 2023 12:59 IST

राष्ट्रवादी ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांची मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे मागणी

ठाणे : ठाणे शहरामध्ये दिवसेंदिवस खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे लोकवस्तीच्या ठिकाणी असलेल्या आरएमसी प्लांटमध्ये होत असलेल्या सिमेंटचा वापर. यामुळे लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यास परवानगी नाकारावी, अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.

दिल्लीप्रमाणे मुंबई तसेच मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरामध्ये देखील हवेची गुणवत्ता खालावत चालली असून त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. प्रदूषणवाढीसाठी महत्वाचे कारण असलेल्या मोठ-मोठ्या अनेक इंडस्ट्रीज सध्या बंद झाल्या आहेत. परंतु शहरामध्ये बांधकाम उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून इमारत उभारणीसाठी मोठ-मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये आरएमसी चे प्लांट उभारण्यात येतात. यामध्ये सिमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. त्यामुळे सिमेंटसारख्या सर्वात कमी मायक्रॉनचे धूलीकण, त्यासोबत वाळू तसेच खडी यांचे धूलीकण, हे हवेत मिसळल्याने धुरके तयार होते आणि ज्या ठिकाणी हे आरएमसी प्लांट उभारण्यात येतात त्या परीसरामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाची समस्या निर्माण होते.

आरएमसी प्लांटधारक हा केवळ ज्या कॉम्प्लेक्ससाठी तो प्लांट उभारण्यात आला आहे त्यासाठी त्याचा वापर न करता बाहेर देखील त्या मालाची विक्री करताना दिसत आहे. त्यामुळे वारंवार रस्त्यावर फिरणारी आरएमसी ची वाहने, त्यामधून निघणारे धुलीकण हे देखिल प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. याचा परिणाम, ज्या परिसरामध्ये हे प्लांट उभारण्यात येतात त्या परीसरातील नागरिकांना श्वसनाच्या तसेच इतर आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते, अशी माहिती त्यांनी दिली.

आरएमसी प्लांट उभारण्यासाठी अनेक परवानग्यांची आवश्यकता असते. त्यानुसार प्लांटधारकाने संबंधित महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जल (प्रतिबंधक व नियंत्रण) कायदा १९७४ नुसार परवानगी घेतली आहे का ? याची तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वी दररोज ठाणे महानगरपालिकेमार्फत हवेची गुणवत्ता, डिस्प्ले केली जायची. ती देखिल सध्या कुठे दिसत नाही. त्यामुळे ठाणे शहरामध्ये प्रदूषण यंत्रणेची काय व्यवस्था आहे हेच कळेनासे झाले आहे. एकीकडे मुंबईसह ठाणे शहरामध्ये खालावत चाललेली हवेची गुणवत्ता आणि दुसरीकडे शहरामध्ये राजरोजपणे सुरु असलेल्या आरएमसी प्लांटमुळे होत असलेले प्रदूषण यामुळे नागरीक खूप त्रस्त आहेत.

याकडे दुर्लक्ष न करता जनतेला हवेच्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकविणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यासारखे आहे. या प्रकरणी आपण जातीने लक्ष घालून ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण विभागाला, जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून विचार करता योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश द्यावेत. तसेच हवेच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे आरएमसी प्लांट ज्या-ज्या ठिकाणी सुरु असतील त्या ठिकाणी संबंधीत प्लांट धारकाने आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत का? त्याला काम सुरु असलेल्या कॉम्प्लेक्सच्या व्यतिरीक्त बाहेर माल विकण्याची परवानगी आहे का ? याची तपासणी करावी. तसेच जोपर्यंत ठाणे शहर प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत लोकवस्तीच्या ठिकाणी नव्याने आरएमसी प्लांट उभारण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.