शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

कोरोनाकाळात नैराश्येत अडकलेल्या तरुणांना युवा रिफ्रेश देणार नवी दिशा

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 2, 2020 16:38 IST

कोरोना काळात ज्या तरुणांना नैराश्य आले अशांना रिफ्रेश करून त्यांच्यात नवीन उमेद निर्माण केली जाणार आहे.

ठळक मुद्देतरुणांना युवा रिफ्रेश देणार नवी दिशा किरण नाकती यांचा पुढाकारठाण्यातून होणार सुरुवात

ठाणे : वुई आर फॉर युच्या माध्यमातून आपल्या ठाण्यातील असंख्य ज्येष्ठ नागरिकांना सेवा देण्याचं काम गेली ८ ते ९ महिने किरण नाकती व त्यांचे सेवेकरी करीत आहेत.त्याचप्रमाणे  *१ डिसेंबर २०२०* पासून वुई आर फॉर यु च्या माध्यमातून " *युवा रिफ्रेश* " हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण-तरुणींसाठी सुरू करण्यात आले .

या विभागाची सुरुवात ठाण्यातून होणार असून त्याकरिता *'नव्या पिढीला नवी दिशा देऊ या, वुई आर फॉर यु ला कनेक्ट होऊ या'* असं म्हणत कोरोनाकाळात नैराश्य पदरी आलेल्या, आत्महत्येचा विचार मनात येणाऱ्या ,आत्मविश्वास गमावलेल्या तसेच नकारात्मक विचार मनात येणाऱ्या तरुण-तरुणींना सुमपदेशन(कौन्सिलिंग) करण्यासाठी " *युवा रिफ्रेश* "या समुपदेशन विभागाची सुरुवात करण्यात आली.आज या कोरोनाकाळात कुणी कुणाचा भाऊ, कुणाचे वडिल, कुणाची होणारी पत्नी,कुणाचा बालपाणीचा मित्र गमावला आहे.यांना त्या नकारात्मक विचारातून बाहेर काढून पुन्हा आत्मविश्वास देण्यासाठी ,पुन्हा रिफ्रेश करण्यासाठी या विभागाची सुरुवात करण्यात आली आहे. या विभागाचे उदघाटन  *युवा खासदार डॉ श्रीकांतजी शिंदे*  यांच्या हस्ते करण्यात आले. युवा रिफ्रेश मुळे युवा वर्गाला मानसिक बळ मिळेल,तसेच नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडून एका नव्या सकारात्मक विचाराकडे प्रेरित होण्याची ऊर्जा मिळेल.याची सुरुवात ठाणेजिल्ह्यापासून करीत आहोत.भविष्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात युवा रिफ्रेश पोहचणार आहे.या माध्यमातून तरुणांना नवी दिशा मिळेल.अशी माहिती युवा रिफ्रेशचे निर्माते किरण नाकती यांनी दिली. पोस्ट कोव्हीडच्या या वातावरणात मानसिकरित्या रिहाबिलेशनचे काम युवा रिफ्रेश करेल.युवा वर्ग आधीपासूनच इथे आहेच परंतु या माध्यमातून आणखीन मोठ्या संख्येने युवा रिफेशमुळे जोडला जाईल. युवा रिफ्रेशच्या माध्यमातून असंख्य तरुणांना मानसिक आधार मिळण्याचं कार्य होणार आहे असे डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितलेे.

टॅग्स :thaneठाणेSocialसामाजिकCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या