शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”
2
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
3
जग बेलआऊटवर बेलआऊट पॅकेज देतेय, पाकिस्तानी सैन्य ते पैसे खातेय; वर्ल्ड बँकेनेच पाकिस्तानला उघडे केले...
4
हनिमून ते राजाची हत्या...; मेघालय पोलिसांनी विचारलेल्या 'या' १३ प्रश्नांनी उडवली सोनमची झोप!
5
MS धोनीसंदर्भात व्यक्त होताना शास्त्रींना आठवला 'पाकीटमार'; म्हणाले... (VIDEO)
6
सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय
7
खतरनाक! सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं बेतलं १९ वर्षीय मुलीच्या जीवावर; काय आहे डस्टिंग चॅलेंज?
8
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
9
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
10
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
11
Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!
12
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
13
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
14
Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन
15
जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
16
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
17
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
18
सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...
19
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
20
Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं

ठाणे जिल्ह्यातील नवा सीआरझेड आराखडा बिल्डरधार्जिणा ; सुनावणीमध्ये स्थानिकांचा तीव्र संताप

By सुरेश लोखंडे | Updated: March 7, 2020 15:25 IST

समुद्र, खाडी, नदी आदींच्या सीमारेषा म्हणजे सीआरझेड नकाशे तयार केले जात आहेत. यापैकी ‘सीआरझेड-३ मधील भाग अ व ब’च्या नकाशांसाठी जनसुनावणी घेतली जात आहे. यानुसार, महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे व कल्याण विभागातर्फे जिल्ह्याच्या प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडा (सीझेडएमपी) जनसुनावणी शुक्रवारी येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

ठळक मुद्दे* सूचनां लेखी स्वरूपात देण्यासाठी १३ मार्च शेवटची मुदत *मच्छीमारांसह तज्ज्ञांचे मत : नकाशे चुकीचे असल्याचा आरोप नकाशांसाठी चार लाखांचे स्केल वापरणे अपेक्षित आहे. मात्र, ते चार हजार असे वापरले

सुरेश लोखंडेठाणे : खाडीकिनाऱ्याची सीआरझेडची सीमारेषा निश्चित करण्यासाठी २००५ च्या नकाशाचा वापर करावा. सध्या तयार करण्यात येत असलेले सीआरझेडचे नकाशे विकासक व धनदांडग्यांच्या हिताच्या दृष्टीने तयार होत आहेत. त्यात खाडीकिनाºया लगतच्या गावठाणांना स्थान दिलेले नाही. कांदळवनाच्या नावाखाली मूळच्या मच्छीमार व्यावसायिकांच्या जमिनी हडप होत आहेत. बोटी उभ्या करण्याच्या, जेटीसह मच्छी वाळवणच्या जागा या नकाशांमधून हद्दपार केल्याचे आरोप करून नागरिकांनी शुक्रवारचा जिल्ह्याचा प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडा (सीझेडएमपी) जनसुनावणीत तीव्र संताप व्यक्त केला.        समुद्र, खाडी, नदी आदींच्या सीमारेषा म्हणजे सीआरझेड नकाशे तयार केले जात आहेत. यापैकी ‘सीआरझेड-३ मधील भाग अ व ब’च्या नकाशांसाठी जनसुनावणी घेतली जात आहे. यानुसार, महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे व कल्याण विभागातर्फे जिल्ह्याच्या प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडा (सीझेडएमपी) जनसुनावणी शुक्रवारी येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सीआरझेडचे नकाशे चेन्नई येथील संस्थेकडून तयार होत आहेत. त्यासाठी जनसुनावणी घेऊन स्थानिकांच्या हरकती घेतल्या जात आहे. मात्र, या संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापकास मराठी येत नसल्याचे पाहून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. पुणे येथील प्राध्यापक डॉ. महेश शिंदेकर यांनी या जनसुनावणीची संकल्पना नागरिकांनी दिल्यानंतरही स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत होता.        या नकाशांसाठी चार लाखांचे स्केल वापरणे अपेक्षित आहे. मात्र, ते चार हजार असे वापरले जात असल्याची चूक गिरीश साळगावकर यांनी निदर्शनात आणली. आधीच्या सुनावणीला १४४ हरकती नोंदवल्या, मात्र त्यातून केवळ १६ तक्रारी एमपीसीबीकडे पाठवल्या. विकासकांसाठी सीआरझेड हटवले जात असल्याचा आरोप मीरा-भार्इंदरचे धीरज परब यांनी करून त्यासाठी त्यांनी वरसावे, घोडबंदरगाव, उत्तन आदींची उदाहरणे दिली. काल्हेर येथील दशक्रिया विधीचा घाट नष्ट केला, पाऊलवाटा नष्ट केल्या. कांदळवनाच्या बीज ते पुराच्या पाण्यामुळे शेतात वाहून आल्याने वाढलेले तन आम्ही काढू शकत नाही. बोटींची जागाही या नकाशामुळे नष्ट झाल्याचा आरोप अ‍ॅड. भारव्दाज चौधरी यांनी केला. २००५ च्या नकाशांव्दारे पुढील नकाशे तयार करण्याची मागणी त्यांनी केली. जितेंद्र पाटील यांनी हॅड्रॉलिकप्रमाणे कांदळवन दाखवण्याची मागणी करून गुगलमॅपव्दारे नकाशे करण्यास विरोध केला. सुनावणीला आर्किटेक्चर, विकासक, मच्छीमार व्यावसायिक हजर होते.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी