शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नवीन ठाण्यासाठी क्लस्टर रखडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 03:05 IST

४६७० इमारती धोकादायक; बिल्डरांसाठी रहिवासी टांगणीला, मुंब्य्राची परिस्थिती चिंताजनक

ठाणे : क्लस्टर योजना लागू होईल तेव्हा होईल, परंतु आजही ठाण्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. ठाणे महापालिकेने ४६७० इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. मागील वर्षी हा आकडा ४७०५ एवढा होता. यात मुंब्य्रात सर्वाधिक १४६० धोकादायक इमारती आहेत. मात्र, नवीन ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खाडीपल्याड परिसरातील बिल्डरांच्या प्रकल्पांची चांदी व्हावी, चुनावी जुमला करता यावा, यासाठी क्लस्टरचे घोडे राज्यकर्त्यांनी रखडवल्याची चर्चा आहे.पावसाळा सुरू झाला की, धोकादायक इमारतींचा प्रश्न हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. पालिकेकडून जाहीर होणाºया इमारतींच्या संख्येवरूनही अनेकवेळा शंका उपस्थित झाल्या आहेत. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना हक्काचे घर मिळावे, म्हणून ठाण्यात क्लस्टर योजना मंजूर झाली असून पहिल्या टप्प्यात सहा भागांत ती लागू केली आहे. त्यानुसार, या भागांचा सर्व्हे सुरू आहे. मात्र, धोकादायक इमारतींचा प्रश्न हा आजही तसाच आहे. स्मार्ट सिटी म्हणून विकासाची स्वप्ने पाहणाºया ठाणे शहरात विविध ठिकाणी एकूण चार हजार ६७० धोकादायक इमारती असून त्यात राहणाºया लाखो नागरिकांपुढे सुरक्षित निवाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासन आणि प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. या धोकादायक इमारतींपैकी सर्वाधिक दिवा आणि मुंब्य्रात आहेत. यामुळे तलावांचे ठाणे याऐवजी धोकादायक इमारतींचे ठाणे ही शहराची नवी ओळख ठरू लागली आहे.महापालिका क्षेत्रात ७० टक्कयांहून अधिक अनधिकृत बांधकामे असून यात झोपडपट्टी विभागाचे मोठे प्रमाण आहे. गेल्या वर्षी या वस्त्यांच्या पुनर्विकासासाठी समूह विकास योजना मंजूर केली. मात्र, तिच्या अंमलबजावणीच्या अगदीच प्राथमिक टप्प्यात आहे. ती कधी पूर्ण होईल, याबाबत नागरिकांच्या मनात साशंकता आहे. दरवर्षी पावसाळ्यात या इमारतींमधील रहिवाशांची झोप उडते. त्यांच्या पुनर्विकासासाठी तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे झाले नाही. या इमारतींमध्ये सुमारे एक लाखांहून अधिक रहिवासी वास्तव्यास आहेत. योग्यवेळी या इमारतींचा पुनर्विकास झाला असता, तर पालिकेला कोट्यवधीचे उत्पन्न मिळाले असते. शिवाय, शहरात किफायतशीर दरात घरे उपलब्ध झाली असती. मात्र, अशा परिस्थितीत नवीन ठाण्यातील गृहनिर्माण विकासावर परिणाम झाला असता. त्यामुळे पुनर्विकास योजनेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

टॅग्स :thaneठाणे