शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

नवीन ठाण्यासाठी क्लस्टर रखडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 03:05 IST

४६७० इमारती धोकादायक; बिल्डरांसाठी रहिवासी टांगणीला, मुंब्य्राची परिस्थिती चिंताजनक

ठाणे : क्लस्टर योजना लागू होईल तेव्हा होईल, परंतु आजही ठाण्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. ठाणे महापालिकेने ४६७० इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. मागील वर्षी हा आकडा ४७०५ एवढा होता. यात मुंब्य्रात सर्वाधिक १४६० धोकादायक इमारती आहेत. मात्र, नवीन ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खाडीपल्याड परिसरातील बिल्डरांच्या प्रकल्पांची चांदी व्हावी, चुनावी जुमला करता यावा, यासाठी क्लस्टरचे घोडे राज्यकर्त्यांनी रखडवल्याची चर्चा आहे.पावसाळा सुरू झाला की, धोकादायक इमारतींचा प्रश्न हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. पालिकेकडून जाहीर होणाºया इमारतींच्या संख्येवरूनही अनेकवेळा शंका उपस्थित झाल्या आहेत. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना हक्काचे घर मिळावे, म्हणून ठाण्यात क्लस्टर योजना मंजूर झाली असून पहिल्या टप्प्यात सहा भागांत ती लागू केली आहे. त्यानुसार, या भागांचा सर्व्हे सुरू आहे. मात्र, धोकादायक इमारतींचा प्रश्न हा आजही तसाच आहे. स्मार्ट सिटी म्हणून विकासाची स्वप्ने पाहणाºया ठाणे शहरात विविध ठिकाणी एकूण चार हजार ६७० धोकादायक इमारती असून त्यात राहणाºया लाखो नागरिकांपुढे सुरक्षित निवाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासन आणि प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. या धोकादायक इमारतींपैकी सर्वाधिक दिवा आणि मुंब्य्रात आहेत. यामुळे तलावांचे ठाणे याऐवजी धोकादायक इमारतींचे ठाणे ही शहराची नवी ओळख ठरू लागली आहे.महापालिका क्षेत्रात ७० टक्कयांहून अधिक अनधिकृत बांधकामे असून यात झोपडपट्टी विभागाचे मोठे प्रमाण आहे. गेल्या वर्षी या वस्त्यांच्या पुनर्विकासासाठी समूह विकास योजना मंजूर केली. मात्र, तिच्या अंमलबजावणीच्या अगदीच प्राथमिक टप्प्यात आहे. ती कधी पूर्ण होईल, याबाबत नागरिकांच्या मनात साशंकता आहे. दरवर्षी पावसाळ्यात या इमारतींमधील रहिवाशांची झोप उडते. त्यांच्या पुनर्विकासासाठी तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे झाले नाही. या इमारतींमध्ये सुमारे एक लाखांहून अधिक रहिवासी वास्तव्यास आहेत. योग्यवेळी या इमारतींचा पुनर्विकास झाला असता, तर पालिकेला कोट्यवधीचे उत्पन्न मिळाले असते. शिवाय, शहरात किफायतशीर दरात घरे उपलब्ध झाली असती. मात्र, अशा परिस्थितीत नवीन ठाण्यातील गृहनिर्माण विकासावर परिणाम झाला असता. त्यामुळे पुनर्विकास योजनेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

टॅग्स :thaneठाणे