शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वाणांमधील नैवेद्याने गरिबांचे तोंड गोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 00:58 IST

वटपौर्णिमेला अनोखा उपक्रम; फळे, पुरणपोळ्यांचे केले वाटप

टिटवाळा : ‘सोशल बार्बर’ अशी ओळख असलेल्या रवींद्र बिरारी यांनी तीन वर्षांपासून टिटवाळा परिसरात वटपौर्णिमेला अनोखा उपक्रम राबवत आहेत. वटपौर्णिमा व्रत करणाऱ्या महिला वडाच्या झाडाला वाण वाहतात. त्यामध्ये आंबा, फणसाचे गरे, केळी अशी विविध फळे असतात. हे वाण जमा करून गरीब त्यांनी गरीब वस्तीतील मुलांना वाटले. या वर्षी त्यांच्या या उपक्रमाला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. यंदा ४२ महिलांनी दिलेल्या वाणांतून १७५ पुरणपोळ्या जमा झाल्याचे बिरारी यांनी सांगितले.वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाला वाहत असलेली फळे, अन्नपदार्थांची नासाडी होते. एकवेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या गरजूंना हे अन्न मिळाले तर त्यांची पोटाची भूक भागेल आणि नासाडीही टळेल, या विचारातून बिरारी यांना ही कल्पना सुचली. श्रद्धेला कुठेही धक्का न लावता त्यांनी सतीचे वाण दान करण्याची ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यासाठी त्यांनी महिलांना यामागचा उद्देश पटवून दिला. अनेक महिलांना त्यांचा हा उपक्रम आवडला असून त्यांनी आपल्या मैत्रिणींनाही याबाबत सहकार्याचे आवाहन केले. त्यामुळे दरवर्षी प्रतिसाद वाढत आहे.केशकर्तन हा बिरारी यांचा व्यवसाय आहे; मात्र हा व्यवसाय त्यांनी स्वत:पुरता मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक कार्याची जोड दिली आहे. रेल्वे स्टेशनवर राहणारे अपंग, निराधार वृद्ध आणि मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तींची ते केस, दाढी मोफत करतात. मनोरुग्णांनी काही वेळा त्यांच्यावर हल्ले केले. अनेकदा त्यांना संसर्ग होऊ न ते आजारीही पडले. मात्र तरीही त्यांनी या समाजसेवेत कधीच खंड पडू दिला नाही. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊ न एका कंपनीने ‘द सोशल बार्बर’ हा लघुपट बनवला आहे. मदत ही पैशानेच करता येते असे नाही. तुमचा उद्देश प्रामाणिक असेल तर आपल्याकडे जे आहे, त्यातूनही अनेकांना समाधान देऊ शकतो, अशी भावना बिरारी यांनी व्यक्त केली.