शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

अतिक्रमणांच्या विरोधातील लढा तीव्र करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 23:55 IST

मेधा पाटकर यांचे आवाहन : आगरी महोत्सवात ‘भूमिपुत्र व नागरी समस्या चळवळ’वर परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : भूमिपुत्र विरुद्ध बिल्डर, राजकीय नेते आणि विकासखोर हा जिवंत संघर्ष आहे. त्यात संवेदनशील, संवादशीलता आवश्यक आहे. राजकीय नेते, बिल्डर आणि विकासखोर भागीदार नसेल तरच भूमिपुत्र, प्रकल्पबाधित आदिवासी, शेतकरी यांचे प्रश्न सुटू शकतात. विकासाच्या नावाखाली २६०० गावे आणि शेती संपुष्टात आणण्याचा घाट घातला जात आहे. जन, जंगल आणि जमिनीवरील अतिक्रमणाचा लढा अहिंसा आणि सत्याग्रही मार्गाने अधिक तीव्र करण्याची गरज असल्याचे मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी येथे केले.आगरी युथ फोरमने क्रीडासंकुलात भरवलेल्या आगरी महोत्सवात रविवारी ‘भूमिपुत्र व नागरी समस्या चळवळ’ या विषयावर परिसंवाद झाला. त्यावेळी पाटकर बोलत होत्या. या परिसंवादात कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील, पदाधिकारी दशरथ पाटील, गणेश म्हात्रे, बळीराम तरे, अर्जुन चौधरी, चंद्रकांत पाटील, लता अरगडे, गंगाराम शेलार, गुलाब वझे आदी मान्यवर सहभागी झाले होते. या परिसंवादाचे सूत्रसंचालन ‘लोकमत’चे प्रतिनिधी अनिकेत घमंडी यांनी केले.पाटकर म्हणाल्या, इंग्रजांनी १८९४ च्या कायद्यान्वये हजारो हेक्टर जमिनी संपादित केल्या. त्यानंतर, स्वतंत्र भारतात एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण स्थापन करण्यात आले. पण, नर्मदा ते नंदीग्रामच्या लढ्यामुळे २०१३ मध्ये सरकारला कायदा करावा लागला. त्यामुळे २० हजार बाधितांना प्रत्येकी पाच एकर जमीन देण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. अजूनही सरकारविरोधात नर्मदा बांध विकास प्रकल्पबाधितांचा लढा सुरू आहे. आताच्या पंतप्रधानांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची घाई झाली होती. त्यामुळे त्यांनी बाधितांचे पुनर्वसन न करताच घाईघाईने सरदार पटेल यांचा साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करून उंच पुतळा उभारला. त्यासाठी पैसा कुठून आला हे उघड होत आहे, याकडे लक्ष वेधले.प्रकल्पाला जमीन देण्यापूर्वी प्रश्न विचारणे म्हणजे विकासाला विरोध आहे, असे होत नाही. विकास करताना सामान्यांना काय स्थान दिले जाणार आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जन, जमीन, जंगल यावर अतिक्रमण करून विकासाच्या नावाखाली प्रदूषण केले जात आहे, असे त्या म्हणाल्या. ग्रोथ सेंटरमध्ये विकासाची वाढ सांगून न्याय दिला जात नसेल, तर त्याचा उपयोग काय, असा सवाल करून कल्याण ग्रोथ सेंटरमध्ये वाढीव एफएसआय मिळावा, ही मागणी करणे म्हणजे बिल्डरांचा फायदा पाहण्यासारखे आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकल्पातील भरपाई मागताना पर्यायी जीवन जगण्याचे साधन उपलब्ध करून देणे, ही मागणी असली पाहिजे, असा सल्ला पाटकर यांनी दिला.बुलेट ट्रेनला गुजरात व महाराष्ट्रातून विरोध होत आहे. या प्रकल्पासाठी आदिवासींची ८० टक्के जमीन बाधित होणार आहे. बुलेट ट्रेनचा विरोध गुजरात उच्च न्यायालयाने विचारात घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात बुलेट ट्रेनविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नव्या सरकारने बुलेट ट्रेनचा पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला असला, तरी सरकारने जायका या कंपनीशी काय करार केला आहे, हे पाहावे. त्या कंपनीकडून प्रकल्पासाठी किती निधी येणार आहे, हे पाहू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प आणताना विधानसभा, लोकसभेला विचारात न घेता कंपन्यांशी परस्पर करार होतात. ही अत्यंत गंभीर बाब आहे. तसेच डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणताना त्याच्याबरोबरीने आठ फ्रेट कॉरिडॉर विकसित केले जाणार आहे, असे त्या म्हणाल्या.शेतीचे औद्योगिकीकरण केले जात असल्याने शेती संपुष्टात येणार आहे. बाटलीबंद पाणी कंपन्या ५५ पैशाला विकत घेऊन ते २० रुपये लीटरने विकतात. हे पाणी तुम्ही पीत असाल तर तुम्ही भूजल संपविण्यासाठी योगदान देत आहात. त्यामुळे हे पाणी पिणे बंद करून भूजल वाचविण्याच्या लढ्यात योगदान द्यावे, असे आवाहन पाटकर यांनी केले.पोल्युशन की पोलिटीकल कंट्रोल बोर्ड?च् प्रदूषणाची समस्या दिल्लीपासून डोंबिवलीपर्यंत पसरली आहे. तरीही, दिल्लीचे प्रदूषण हरियाणा व पंजाबच्या शेतकऱ्यांनी शेतीतील राब जाळल्याने झाल्याचा हास्यास्पद खुलासा सरकारमधील काही राजकीय नेते मंडळी करीत आहेत.च् ग्रोथ सेंटर, क्लस्टर या सगळ्या फसव्या योजना आहेत. तसेच प्रदूषण रोखण्यासाठी सरकारचे पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे पोलिटीकल कंट्रोल बोर्ड आहे, अशी टीका पाटकर यांनी यावेळी केली.