शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

'‘शिक्षक’, ‘पदवीधर’सह युवकांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची गरज'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 1:11 AM

युवाशक्ती साहित्य संमेलन : ‘राजकारणातील युवा आवाज’ विषयावर झाला परिसंवाद, मान्यवरांनी मांडले विचार

अंबरनाथ : ‘कोमसाप’च्या राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलनात ‘राजकारणातील युवा आवाज’ या विषयावर शनिवारी झालेला परिसंवाद चांगलाच रंगला. या परिसंवादात युवकांनाही विधान परिषदेत नेतृत्व मिळण्याची गरज व्यक्त करण्यात आली. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासोबत युवा मतदारसंघाची गरज या वेळी व्यक्त झाली. या मतदारसंघातून युवकांनाच उमेदवारी देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.युवा शक्ती संमेलनाचे उद्घाटन झाल्यावर संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘राजकारणातील युवा आवाज’ या विषयावर परिसंवाद झाला. शिक्षक मतदारसंघाप्रमाणे युवा मतदारसंघही असावा.ज्यामुळे युवकांना राजकारणात संधी मिळून युवकांसाठी मोठे काम करता येईल, असे मत चांदीबाई महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख प्रा. नितीन आरेकर यांनी व्यक्त केले. राज्यपालांनी अध्यादेश काढूनही महाविद्यालयात निवडणुका होत नाहीत. यामुळे युवा नेतृत्वाचे एक प्रकारे नुकसान होत आहे. राजकारणाला व्यवसायिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. राजकारण करिअर घडविण्यासाठी एक चांगले माध्यम आहे. मात्र केवळ पैसे मिळाले म्हणजे राजकारणात यशस्वी झाले असे नाही, तर आपल्यामुळे नागरिकांची कामे झाली तर त्याचे समाधान वेगळे असते, असे मत आरेकर यांनी व्यक्त केले.या परिसंवादात तरुणांनी राजकारणाकडे वळण्याची गरज व्यक्त करण्यात आली. राजकारण वाईट आहे असे म्हणत गप्प बसण्याऐवजी वाईट झालेले राजकारण चांगले करण्यासाठी तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे. आज राजकारणात चांगल्या व्यक्तींची कमतरता आहे. ती कमतरता भरण्यासाठी चांगल्या तरुणांनी राजकारणात शिरकाव करणे गरजेचे आहे. अन्यथा नेत्यांचे वारसच राजकारणात यशस्वी होतील. राज्य आणि देशाची प्रगती ही नेते मंडळींच्या हातात असते. त्यामुळे राजकारणात चांगल्या विचारांची आणि ज्ञानाची गरज आहे. ज्ञानी व्यक्तींनी राजकारणाकडे सकारात्मकदृष्टीने पाहणे गरजेचे आहे. राजकारणातील चांगल्या व्यक्तींना योग्य पद मिळाले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे त्याचे उदाहरण असल्याचे मत व्यक्त केले. या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.युवा आमदारांमुळे होतात कामेया परिसंवादात कोमसापच्या केंद्रीय कार्याध्यक्ष नमिता कीर यांनी युवा आमदारांमुळे युवकांसाठी कामे होत आहते. त्यामुळे निवडणुकांमध्ये युवकांनाही संधी मिळायला हवी असे भाष्य केले. त्यांच्या कल्पनांना वाव दिला पाहिजे.राजकारण नेमके काय आहे, हे परिसंवादातून समजले. युवकांनी नेमके काय करायला हवे याची एक दिशाा मिळाली असे परिसंवादाला उपस्थित असलेल्या तरूणांनी सांगितले.

टॅग्स :ambernathअंबरनाथPoliticsराजकारण