शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

'‘शिक्षक’, ‘पदवीधर’सह युवकांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची गरज'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 01:12 IST

युवाशक्ती साहित्य संमेलन : ‘राजकारणातील युवा आवाज’ विषयावर झाला परिसंवाद, मान्यवरांनी मांडले विचार

अंबरनाथ : ‘कोमसाप’च्या राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलनात ‘राजकारणातील युवा आवाज’ या विषयावर शनिवारी झालेला परिसंवाद चांगलाच रंगला. या परिसंवादात युवकांनाही विधान परिषदेत नेतृत्व मिळण्याची गरज व्यक्त करण्यात आली. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासोबत युवा मतदारसंघाची गरज या वेळी व्यक्त झाली. या मतदारसंघातून युवकांनाच उमेदवारी देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.युवा शक्ती संमेलनाचे उद्घाटन झाल्यावर संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘राजकारणातील युवा आवाज’ या विषयावर परिसंवाद झाला. शिक्षक मतदारसंघाप्रमाणे युवा मतदारसंघही असावा.ज्यामुळे युवकांना राजकारणात संधी मिळून युवकांसाठी मोठे काम करता येईल, असे मत चांदीबाई महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख प्रा. नितीन आरेकर यांनी व्यक्त केले. राज्यपालांनी अध्यादेश काढूनही महाविद्यालयात निवडणुका होत नाहीत. यामुळे युवा नेतृत्वाचे एक प्रकारे नुकसान होत आहे. राजकारणाला व्यवसायिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. राजकारण करिअर घडविण्यासाठी एक चांगले माध्यम आहे. मात्र केवळ पैसे मिळाले म्हणजे राजकारणात यशस्वी झाले असे नाही, तर आपल्यामुळे नागरिकांची कामे झाली तर त्याचे समाधान वेगळे असते, असे मत आरेकर यांनी व्यक्त केले.या परिसंवादात तरुणांनी राजकारणाकडे वळण्याची गरज व्यक्त करण्यात आली. राजकारण वाईट आहे असे म्हणत गप्प बसण्याऐवजी वाईट झालेले राजकारण चांगले करण्यासाठी तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे. आज राजकारणात चांगल्या व्यक्तींची कमतरता आहे. ती कमतरता भरण्यासाठी चांगल्या तरुणांनी राजकारणात शिरकाव करणे गरजेचे आहे. अन्यथा नेत्यांचे वारसच राजकारणात यशस्वी होतील. राज्य आणि देशाची प्रगती ही नेते मंडळींच्या हातात असते. त्यामुळे राजकारणात चांगल्या विचारांची आणि ज्ञानाची गरज आहे. ज्ञानी व्यक्तींनी राजकारणाकडे सकारात्मकदृष्टीने पाहणे गरजेचे आहे. राजकारणातील चांगल्या व्यक्तींना योग्य पद मिळाले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे त्याचे उदाहरण असल्याचे मत व्यक्त केले. या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.युवा आमदारांमुळे होतात कामेया परिसंवादात कोमसापच्या केंद्रीय कार्याध्यक्ष नमिता कीर यांनी युवा आमदारांमुळे युवकांसाठी कामे होत आहते. त्यामुळे निवडणुकांमध्ये युवकांनाही संधी मिळायला हवी असे भाष्य केले. त्यांच्या कल्पनांना वाव दिला पाहिजे.राजकारण नेमके काय आहे, हे परिसंवादातून समजले. युवकांनी नेमके काय करायला हवे याची एक दिशाा मिळाली असे परिसंवादाला उपस्थित असलेल्या तरूणांनी सांगितले.

टॅग्स :ambernathअंबरनाथPoliticsराजकारण