शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुंबईच्या धर्तीवर डीसी रूल बदलण्याची गरज, महापौर नरेश म्हस्केंचे शासनास पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 05:11 IST

मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या डीसी रूल अर्थात मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत बदल करावा, अशी मागणी करणारे पत्र म्हस्के यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

ठाणे : ठाणे शहरातील जुन्या व धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यास अडसर होत असल्याने महापौर नरेश म्हस्के यांनी थेट शासनाला साकडे घातले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या डीसी रूल अर्थात मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत बदल करावा, अशी मागणी करणारे पत्र म्हस्के यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. याबाबत सकारात्मक निर्णय होऊन धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असेही महापौरांनी नमूद केले आहे.ठाणे हे औद्योगिक शहर म्हणून उदयास आलेले आहे. तसेच प्रथम रेल्वे ठाण्याशी जोडली गेल्यामुळे पूर्वापार शहराची वाढ झालेली आहे. त्यामुळे त्या काळातील परिस्थितीनुसार इमारतींचे बांधकाम करण्यात आलेले आहे. सद्य:स्थितीत मूळ ठाणे शहरामध्ये जुन्या व जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आहे. ठाणे शहरातील जुन्या इमारती या छोट्याछोट्या भूखंडांवर असल्यामुळे त्यास मोठ्या प्रमाणावर मोकळ्या जागा पुनर्विकास करताना सोडणे शक्य होत नाही. त्यामुळे जास्तीतजास्त इमारतींची उंची सात मजल्यांपर्यंतच पोहोचते.सात मजल्यांच्यावर आवश्यक दुसरा जिना आणि जास्तीची मोकळी जागा भूखंड लहान असल्यामुळे सोडता येत नसल्यामुळे अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे. या बाबींचा विचार करून मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर हायराइज इमारतीची उंची ४५ मीटर म्हणजेच १५ मजल्यांचे बांधकाम करून नागरिकांचे पुनर्वसन करणे शक्य होईल.हा हवा बदल : मुंबई महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीतील कलम ४७ अ नुसार इमारतीस आवश्यक असणाऱ्या मोकळ्या जागांमध्ये इमारतीच्या कोणत्याही दोन बाजूस अगिनशमनच्या अनुषंगाने सहा मीटर मोकळी जागा सोडलेली असावी, असे केल्यास इमारतीचा पुनर्विकास करणे आणि अनुज्ञेय चटईक्षेत्र निर्देशांकांचा वापर करणे शक्य होणार आहे.यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीत बदल केल्यास पुनर्विकासामधील मोठा अडथळा कायमस्वरूपी दूर होणार आहे. यामुळे गेली अनेक वर्षे ज्या इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत, अशा सर्व इमारतींना व नागरिकांना योग्य तो न्याय देता यावा, यासाठी आपण नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. याबाबत सकारात्मक निर्णय होऊन आगामी काळात ठाण्यातील नागरिकांना दिलासा मिळेल, अशी आशा महापौरांनी व्यक्त केली.

टॅग्स :thaneठाणे