शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 03:13 IST

केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प गरिबांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांवर घाव घालणारा आहे. पेट्रोल, डिझेल या इंधनांच्या किमती वाढवल्याने दूध, भाज्या यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर त्याचा परिणाम झाला आहे.

ठाणे/मुंब्रा : केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प गरिबांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांवर घाव घालणारा आहे. पेट्रोल, डिझेल या इंधनांच्या किमती वाढवल्याने दूध, भाज्या यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर त्याचा परिणाम झाला आहे. इंधनावर सेस टॅक्स वाढवल्याने त्याचा परिणाम गरिबांच्या अन्नावर झाला आहे. यामुळे हा अर्थसंकल्प देशातील शेतकरी, मजूर, लहान व्यापारी, मध्यमवर्गीयांवर अन्याय करणारा आहे. याचाच अर्थ भाजपा सरकार गरिबांविरोधातील असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसने आ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सायकल आणि बैलगाडी मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकºयांनी चक्क चूल पेटवून त्यावर अन्न शिजवले.केंद्रीय अर्थसंकल्पाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मुंब्रा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. केंद्राने नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्याला गरिबांच्या आणि देशविरोधातील अर्थसंकल्प मानून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंब्रा तहसीलदार कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून चुलीवर स्वयंपाक बनवून सरकारचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या मोर्चाचे आयोजन कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान आणि युवक अध्यक्ष शानू पठाण यांनी केले होते. हे सरकार देश आणि गरिबांविरोधातील आहे, पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील व्यापारी, कारखानदारवर्गही देशोधडीला लागत आहे. आईवडिलांनी मोठ्या कष्टाने मुलामुलींना शिक्षण देऊन उच्चशिक्षित केले आहे. मात्र, या मुलांसमोरचे भविष्य अंधकारमय झाले आहे. देशाचे पंतप्रधान अशा मुलांना पकोडे विकायला सांगत आहेत. रस्त्यावर हातगाड्या लावून पकोडे विकण्यासाठीच आम्ही मुलांना शिक्षित केले आहे का, असा सवाल करून आमदार आव्हाड यांनी मोदी यांच्या चुकीच्या धोरणांचा निषेध केला. राज्याचे सरकार चालवणाºया फडणवीस सरकारचाही समाचार घेतला.देशात आणि राज्यात जातीय द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. विरोधकांची पोलिसांच्या बळावर मुस्कटदाबी केली जात आहे. विरोधकांवर जरब बसावी म्हणून भुजबळ यांच्यासारख्यांना कारागृहाबाहेर येऊ दिले जात नाही. हे सरकार सत्तेवर येताच देशाच्या संविधानाला धोका निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, यावेळी चुलीवर बनवलेले अन्न मोर्चेकºयांनी खाल्ले.

टॅग्स :thaneठाणे