शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

भाजपाला रोखले हेच राष्ट्रवादीचे यश

By admin | Updated: February 24, 2017 07:46 IST

काँग्रेसबरोबर आघाडी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेला विलंब, जागावाटपामध्ये केलेली दिरंगाई यामुळे

 जितेंद्र कालेकर / ठाणेकाँग्रेसबरोबर आघाडी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेला विलंब, जागावाटपामध्ये केलेली दिरंगाई यामुळे ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला आपली ताकद वाढवता आली नसली तरी राज्यात सत्ता नाही आणि शिवसेना व भाजपा या दोन हत्तींच्या झुंजीतही आपले मागील संख्याबळ राखण्यात या पक्षाने यश मिळवले आणि ठाण्यात दुसऱ्या क्रमांकाकरिता सुरु असलेल्या स्पर्धेत भाजपाला पिछाडीवर टाकले.या वेळी सत्तेसाठी राष्ट्रवादीची मदत इतर पक्षांना घ्यावी लागेल, असा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. शिवसेनेला मोठे यश लाभल्याने तशी वेळ आली नाही. राष्ट्रवादीने लढवलेल्या ८७ पैकी निम्म्याही जागा राष्ट्रवादीला जिंकता आलेल्या नाहीत. आघाडीच्या १३१ पैकी राष्ट्रवादीच्या वाट्याला ७२ जागा आल्या होत्या. कळवा-मुंब्य्रात दोघांमध्ये एकमत न झाल्याने १५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत झाली. २०१२ मध्ये १३० पैकी राष्ट्रवादीने ३४, तर काँग्रेसने १८ जागा जिंकून शिवसेना-भाजपा युतीला घाम फोडला होता.या वेळी सेना-भाजपाच्या युतीच्या रखडलेल्या चर्चेवर आघाडीचा निर्णय घेणाऱ्या राष्ट्रवादीने अखेरपर्यंत उमेदवार निश्चित केले नव्हते. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी अवधी मिळालाच नाही. एकीकडे आव्हाडांनी उमेदवारांच्या एबी फॉर्मच्या वाटपापासून ते प्रचारापर्यंतची धुरा एकहाती ठेवल्याने वसंत डावखरे, गणेश नाईक, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ही नेते मंडळी प्रचारात फारशी दिसलीच नाही. हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, टीडीसीचे अध्यक्ष बाबाजी पाटील, जितेंद्र पाटील या पक्षासाठी प्रतिष्ठेच्या जागा जिंकण्यात राष्ट्रवादीने यश मिळवले, ही या पक्षासाठी जमेची बाजू म्हणावी लागेल. राष्ट्रवादीचे नेते तथा अध्यक्ष शरद पवार यांच्या एकाच दिवशी दिवा आणि वागळे इस्टेट भागात झालेल्या दोन प्रचारसभा, सुप्रिया सुळे यांच्या मोजक्या चौकसभा आणि रॅली वगळता पक्षाला प्रचारामध्ये फारसा रंग भरताच आला नाही. आव्हाडांकडे ठाण्याच्या प्रचाराची मुख्य धुरा असली, तरी त्यांचाही प्रचार कळवा आणि मुंब्य्राच्या परिघातच दिसला. शहरात तर तो केवळ पोस्टरबाजीत अडकला. अगदी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पुतण्याचीही जागा पोषक वातावरण असून राखता आली नाही. सत्ताधारी सेनेने केलेला भ्रष्टाचार आणि गैरकारभाराची आकडेवारीनिहाय पत्रकार परिषदेद्वारे जशी त्यांनी माहिती दिली, तशी ठाण्याच्या विकासासाठी नेमके काय करणार आहे, याचा तपशील मात्र ते मांडू शकले नाहीत. आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनीच प्रचाराची धुरा वाहिली. तिकीटवाटपातील कुरबुरी आणि अंतर्गत गटातटांच्या राजकारणाचे ओंगळवाणे दर्शन निवडणुकीत झाले.