शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

राष्ट्रवादीचे आज अंबरनाथमध्ये शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: February 7, 2016 02:29 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी व कार्यकर्ता मेळावा ७ फेब्रुवारीला अंबरनाथ येथे होणार आहे. हा तालुका पक्ष सोडून बाहेर गेलेले व आता सत्ताधारी बाकावर असलेले भाजपाचे खासदार-आमदार

- सुरेश लोखंडे,  ठाणेराष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी व कार्यकर्ता मेळावा ७ फेब्रुवारीला अंबरनाथ येथे होणार आहे. हा तालुका पक्ष सोडून बाहेर गेलेले व आता सत्ताधारी बाकावर असलेले भाजपाचे खासदार-आमदार आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. चिरडच्या काठवळेवाडी येथील या जिल्हास्तरीय मेळाव्यात शेतकऱ्यांच्या समस्या व कार्यकर्त्यांच्या मागण्या, त्यातून पक्ष बळकटीकरणाचा मंत्र राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना देणार आहे. पक्ष सोडून गेलेल्या काही लोकप्रतिनिधींना जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन दाखवू पाहत असल्याने त्यातून पक्ष बळकट होणार की फोडाफोडीला ऊत येणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. माजी पालकमंत्री गणेश नाईक, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे अनुक्रमे या जिल्हा मेळाव्याचे अध्यक्ष व उद्घाटक आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व असल्याचे सातत्याने दाखवत असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सत्ता गेल्यापासून दिसेनासे असलेले सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार गोटीराम पवार आदी मंडळी या वेळी उपस्थित राहणार आहेत. तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकही यानिमित्ताने राष्ट्रवादी पक्षाची पाठराखण करत असल्याचे चित्र आहे. आत्मपरीक्षण करणार- पक्षातून बाहेर पडलेले खासदार कपिल पाटील यांच्यासह शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मतदारसंघ व एकेकाळचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पण आता भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्या बालेकिल्ल्यात हा मेळावा घेऊन राष्ट्रवादी आत्मपरीक्षण करीत आहे.- ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राष्ट्रवादीची सत्ता असली तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी बँकेने ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. तरी, त्यांनी या मेळाव्यात शेतकऱ्यांना निमंत्रित केले आहे.