शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

कपिल पाटील यांना राष्ट्रवादीचे भरभरून मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 01:20 IST

भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्यावेळी भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला.

- पंढरीनाथ कुंभारभिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्यावेळी भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला. त्यानंतर झालेल्या पहिल्या २००९ च्या निवडणुकीत भाजप पक्षाचे विष्णू सावरा निवडून आले होते. यापूर्वी ते तीन वेळा वाडा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. वाडा विधानसभा मतदारसंघातील बराचसा भाग भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झाल्याने माजी आमदार सावरा यांनी भिवंडी विधानसभा क्षेत्रातून प्रथम निवडणूक लढविली. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसे व भाजपच्या उमेदवारास पराभूत करून शिवसेनेचे शांताराम मोरे निवडून आले.वास्तविक, हा नवा मतदारसंघ निर्माण झाल्याने या मतदारसंघात ग्रामीण भागातील शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाच्या बालेकिल्ल्यांचा समावेश होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी कपिल पाटील यांनी भाजपचे तिकीट मिळवून निवडणूक लढविली. तत्पूर्वी भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी बरेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेतले. त्यामुळे लोकसभेची निवडणूक लढविताना त्यांची ताकद वाढलेली होती. परिणामी त्यांना काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांना चांगल्या मतांनी पराभूत करता आले.मागील निवडणुकीत भिवंडी ग्रामीण मतदारसंघात भाजपचे पाटील यांना ८५ हजार ५४२ मते मिळाली होती. तर काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांना ४२ हजार ४७३ मते मिळाली होती. ग्रामीणमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भरभरून मतदान केल्याने पाटील यांना दुप्पट मते मिळाली होती. हीच परंपरा या निवडणुकीतही कायम राहिली. वास्तविक पहिल्यांदा कपिल पाटील निवडून आल्यानंतर मोठ्या संख्येने ग्रामीणमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये समाविष्ट केले आणि आपली पक्कड मजबूत केली. त्याचबरोबर शिवसेनेनेही आपले काम चोख बजाविल्याने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराची जादू फारशी चालली नाही. त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणे पाटील यांना दुप्पट मते मिळाली.टठयावेळी पाटील यांना १,११,५६१ तर काँग्रेसचे सुरेश टावरे यांना ५३,६६९ मते मिळाली. या निवडणुकीत पाटील यांच्या विरोधात शिवसेनेच्या पदाधिकाºयाने पुकारलेले बंड थंड केल्याने ते विजयी झाले. परंतु या बंडाचे फळ आपल्याला मिळेल या अतिविश्वासाने काँग्रेसचे टावरे यांना पाटील यांच्या अर्ध्या मतांपेक्षा कमी मतांवर समाधान मानावे लागले. हा फरक ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष असतानाही टावरे यांना कमी करता आला नाही.।की फॅक्टर काय ठरला?भिवंडी ग्रामीणमध्ये भाजपची मते असली तरी त्यास शिवसेनेची जोड आहे. परंतु त्याचबरोबर राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेली कार्यकर्त्यांची फळी ही पाटील यांची जमेची बाजू आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत झोकून दिले होते. त्यामुळे काही ठराविक कार्यकर्ते वगळता इतर कार्यकर्ते न बिथरता त्यांनी युतीधर्म पाळला. परिणामी दुप्पट मतांना धक्का न लागता मतदान वाढले. कपिल पाटील यांनी सर्व मित्रपक्षांना व संघटनांना बरोबरीने सन्मान देऊन वागविले.त्यामुळे उमेदवारी मिळण्यापूर्वी नाराजी संपुष्टात येऊन विजय हाती लागला.।या निकालाचा पुढील विधानसभेवर काय परिणामआता झालेल्या लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांनी मिळविलेली मते ही शिवसेना,भाजपसह श्रमजीवी व इतर संघटनांची असून या संघटनांचा प्रभाव ग्रामीण भागात आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ही जागा युतीकडे राहण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र युती शिवाय ही निवडणूक लढविल्यास अटीतटीचा सामना होईल. त्यामधून काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीस दिल्यास विधानसभेच्या निवडणुकीत त्याचा निकाल काही वेगळा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या ही जागा शिवसेनेकडे असून युतीधर्म असताना या जागेवर भाजप दावा करू शकते.मात्र ही जागा युतीकडे रहाणे भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरू शकते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९bhiwandi-pcभिवंडी