शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

बुलेट ट्रेनच्या पर्यावरणीय सुनावणीला राष्ट्रवादीचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 14:48 IST

बुलेट ट्रेनच्या विरोधातील वातावरण आता अधिकाधिक तापू लागले आहे.

ठाणे - बुलेट ट्रेनच्या विरोधातील वातावरण आता अधिकाधिक तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्या दिवसापासून बुलेट ट्रेनला विरोध केला असून आंदोलनही तापवण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी जिल्हाप्रशासनाने आयोजित केलेल्या पर्यावरणीय सुनावणीच्या वेळी गडकरी रंगायतनबाहेर आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. बुलेट ट्रेनसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादीत केल्या जाणार आहेत. शेतकर्‍यांना विश्वासात न घेता जमिनींचे संपादन केले जात असल्याने राष्ट्रवादीने विरोध केला आहे. तसेच, बुलेट ट्रेनसाठी कोटयवधी रुपये खर्च करण्यापेक्षा लोकल ट्रेन सुरळीत कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. मंगळवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये बुलेट ट्रेनच्या संदर्भात पर्यावरणीय हरकती आणि सूचनांची जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. या सुनावणीमध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे हे नगरसेवक सुहास देसाई,  कोपरी पांचपाखाडी विधानसभा अध्यक्ष नितीन पाटील , ठाणे शहर विधानसभाकार्याध्यक्ष  विजय भामरे, ओ. बी. सी.सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर , हेमंत वाणी, निलेश कदम, दिलीप नाईक, समीर भोईर, सुरेश सिंग, संतोष सहस्त्रबुद्धे, शैलेश कदम, सुमित गुप्ता, महेंद्र पवार, संदीप पवार यांच्यासह गडकरी रंगयातन येथे गेले. मात्र, प्रशासनाने त्यांना सुनावणीमध्ये सहभागी होण्यास विरोध केल्यामुळे त्यांनी रंगयातनच्या बाहेरच जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आनंद परांजपे यांनी, सध्या देशातील रेल्वे वाहतूक मोडकळीस आली आहे. ठाणे- कल्याणसारखी स्थानके अस्वच्छ स्थानकांच्या यादीत वरच्या क्रमांकावर येत आहेत. सरकते जिने स्टेशनांच्या बाहेर येऊन पडले आहेत. मात्र, ते बसवण्याचे औदार्य दाखविले जात नाही. एकीकडे लोकल ट्रेनमधून पडून हजारो लोक मरत असताना ही बुलेट ट्रेन आमच्या छाताडावर चालवून ठराविक वर्गाचे भले करण्याचा डाव आखला आहे. आमच्या पालघर, दिव्यातल्या शेतकर्‍यांना भूमिहीन करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगितले.