शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

कल्याण पंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा, सभापतीपदी दर्शना जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 02:41 IST

कल्याण पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीनपैकी दोन सदस्यांनी शिवसेनेची साथ सोडून भाजपाशी हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव सभापती झाल्या. उपसभापतीपदी भाजपाचे पांडुरंग म्हात्रे विजयी झाले.

कल्याण : कल्याण पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीनपैकी दोन सदस्यांनी शिवसेनेची साथ सोडून भाजपाशी हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव सभापती झाल्या. उपसभापतीपदी भाजपाचे पांडुरंग म्हात्रे विजयी झाले.पंचायतीच्या १२ जागांपैकी भाजपाकडे पाच, राष्ट्रवादीकडे तीन आणि शिवसेनेकडे चार जागा होत्या. निवडणूक लढवताना शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र असल्याने शिवसेनेला सभापतीपद, तर राष्ट्रवादीला उपसभापतीपद मिळेल, अशी अपेक्षा होती. पण राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी भाजपाला समर्थन दिले. सभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या जाधव, भाऊ गोंधळी यांनी अर्ज भरला होता. उपसभापतीपदासाठी शिवसेनेच्या भरत भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गोंधळे यांना शिवसेनेचे समर्थन मिळणार होते. मात्र शिवसेनेची चार व गोंधळे यांचे एक मत अशी पाचच मते गोंधळी यांना पडली. भाजपाच्या पाठिंब्यावर सात मतांनी जाधव सभापतीपदी निवडून आल्या आणि सात मतांनी भाजपाचे म्हात्रे उपसभापतीपदी निवडून आले. सभापतीपदाचा अर्ज गोंधळी यांनी दाखल केला, तेव्हा शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे हे उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादीचे दोन सदस्य भाजपच्या गळाला लागल्याचे कळताच लांडगे तेथून निघाले. सभापती जाधव यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय एकटीचा नसून कार्यकर्त्यांनी दिलेल्या कलानुसार निर्णय घेतल्याचे सांगितले.राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ यांनी सांगितल, राष्ट्रवादीची शिवसेनेशी बांधिलकी निवडणुकीपुरतीच होती. पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा, असे संकेत पक्षाच्या वरिष्ठांकडून मिळाल्याने महिलेला सभापती पदाचा मान दिला. याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या राजकारणावर होणार का, असे विचारता परिणाम होणार हे नक्की असे त्यांनी सांगितले.भाजपाचे कल्याण तालुकाध्यक्ष चंदू गोष्टे यांनी सांगितले, राजकारण बाजूला ठेवून भाजपाने राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. ही युती स्थानिक पातळीवर आहे. विकासासाठी आम्ही कमीपणा घेऊन उपसभापतीपद घेतले, तरी विजय भाजपाचाच झाला.कथोरेंचे डावपेच यशस्वीकल्याण पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची युती असताना भाजपाला पाचच जागा मिळाल्या असतानाही युती फोडून राष्ट्रवादीचे दोन सदस्य आपल्याकडे खेचून घेण्यात भाजपा आमदार किसन कथोरे यशस्वी झाले. त्यामुळेच पंचायत समितीच्या सत्तेपासून शिवसेनेला दूर ठेवणे शक्य झाले.

टॅग्स :thaneठाणे