शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

कल्याण पंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा, सभापतीपदी दर्शना जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 02:41 IST

कल्याण पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीनपैकी दोन सदस्यांनी शिवसेनेची साथ सोडून भाजपाशी हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव सभापती झाल्या. उपसभापतीपदी भाजपाचे पांडुरंग म्हात्रे विजयी झाले.

कल्याण : कल्याण पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीनपैकी दोन सदस्यांनी शिवसेनेची साथ सोडून भाजपाशी हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव सभापती झाल्या. उपसभापतीपदी भाजपाचे पांडुरंग म्हात्रे विजयी झाले.पंचायतीच्या १२ जागांपैकी भाजपाकडे पाच, राष्ट्रवादीकडे तीन आणि शिवसेनेकडे चार जागा होत्या. निवडणूक लढवताना शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र असल्याने शिवसेनेला सभापतीपद, तर राष्ट्रवादीला उपसभापतीपद मिळेल, अशी अपेक्षा होती. पण राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी भाजपाला समर्थन दिले. सभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या जाधव, भाऊ गोंधळी यांनी अर्ज भरला होता. उपसभापतीपदासाठी शिवसेनेच्या भरत भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गोंधळे यांना शिवसेनेचे समर्थन मिळणार होते. मात्र शिवसेनेची चार व गोंधळे यांचे एक मत अशी पाचच मते गोंधळी यांना पडली. भाजपाच्या पाठिंब्यावर सात मतांनी जाधव सभापतीपदी निवडून आल्या आणि सात मतांनी भाजपाचे म्हात्रे उपसभापतीपदी निवडून आले. सभापतीपदाचा अर्ज गोंधळी यांनी दाखल केला, तेव्हा शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे हे उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादीचे दोन सदस्य भाजपच्या गळाला लागल्याचे कळताच लांडगे तेथून निघाले. सभापती जाधव यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय एकटीचा नसून कार्यकर्त्यांनी दिलेल्या कलानुसार निर्णय घेतल्याचे सांगितले.राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ यांनी सांगितल, राष्ट्रवादीची शिवसेनेशी बांधिलकी निवडणुकीपुरतीच होती. पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा, असे संकेत पक्षाच्या वरिष्ठांकडून मिळाल्याने महिलेला सभापती पदाचा मान दिला. याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या राजकारणावर होणार का, असे विचारता परिणाम होणार हे नक्की असे त्यांनी सांगितले.भाजपाचे कल्याण तालुकाध्यक्ष चंदू गोष्टे यांनी सांगितले, राजकारण बाजूला ठेवून भाजपाने राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. ही युती स्थानिक पातळीवर आहे. विकासासाठी आम्ही कमीपणा घेऊन उपसभापतीपद घेतले, तरी विजय भाजपाचाच झाला.कथोरेंचे डावपेच यशस्वीकल्याण पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची युती असताना भाजपाला पाचच जागा मिळाल्या असतानाही युती फोडून राष्ट्रवादीचे दोन सदस्य आपल्याकडे खेचून घेण्यात भाजपा आमदार किसन कथोरे यशस्वी झाले. त्यामुळेच पंचायत समितीच्या सत्तेपासून शिवसेनेला दूर ठेवणे शक्य झाले.

टॅग्स :thaneठाणे