शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

मतदार यादी घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे आमरण उपोषण

By पंकज पाटील | Updated: August 8, 2022 17:06 IST

Ambernath: अंबरनाथ पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जी अंतिम मतदार यादी तयार करण्यात आले आहे, त्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

- पंकज पाटीलअंबरनाथ - अंबरनाथ पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जी अंतिम मतदार यादी तयार करण्यात आले आहे, त्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. 7 जुलै रोजी अंबरनाथ नगरपालिकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. ही मतदार यादी प्रसिद्ध करताना अनेक हरकतींची दखल न घेता परस्पर नावे इतर प्रभागांमध्ये टाकण्यात आले होते. एवढेच नव्हे तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्या मतदारांची हरकत नव्हती अशा मतदारांना देखील इतर प्रभागात टाकले होते.

नियमानुसार ज्या हरकती आल्या होत्या त्या हरकतींची योग्य शहानिशा न करताच मतदार यादी निश्चित करण्यात आली. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे अंतिम मतदार यादीमध्ये शेकडो नावे परस्पर इतर प्रभागात ढकलण्याच्या प्रताप पालिका अधिकाऱ्यांनी केला होता. या प्रकरणी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र या तक्रारीची कोणतीही दखल पालिका प्रशासनाने घेतली नाही. एवढेच नव्हे तर या मतदार यादी घोटाळा प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणी चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते, असे असताना देखील या प्रकरणाची कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. आणि योग्य कार्यवाही देखील करण्यात आली नाही.

याप्रकरणी सतत तक्रार करून देखील पालिका प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याने राष्ट्रवादीच्या वतीने उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. अखेर सोमवारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कबीर गायकवाड, सुरेश सिंह आणि रेश्मा सुर्वे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला मतदारांनी देखील समर्थन दर्शविले आहे. उपोषणाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उपोषणाच्या ठिकाणी उपस्थिती लावून आपले समर्थन दर्शवले आहे. मतदार यादीत अधिकाऱ्यांनी घोळ घातलेला असताना ते घोळ दुरुस्त करण्यासाठी पालिकेचे कोणतेही अधिकारी तत्परता दाखवत नसल्याने उपोषण करण्याची वेळ आल्याचे कबीर गायकवाड यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसambernathअंबरनाथ