शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

मतदार यादी घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे आमरण उपोषण

By पंकज पाटील | Updated: August 8, 2022 17:06 IST

Ambernath: अंबरनाथ पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जी अंतिम मतदार यादी तयार करण्यात आले आहे, त्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

- पंकज पाटीलअंबरनाथ - अंबरनाथ पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जी अंतिम मतदार यादी तयार करण्यात आले आहे, त्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. 7 जुलै रोजी अंबरनाथ नगरपालिकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. ही मतदार यादी प्रसिद्ध करताना अनेक हरकतींची दखल न घेता परस्पर नावे इतर प्रभागांमध्ये टाकण्यात आले होते. एवढेच नव्हे तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्या मतदारांची हरकत नव्हती अशा मतदारांना देखील इतर प्रभागात टाकले होते.

नियमानुसार ज्या हरकती आल्या होत्या त्या हरकतींची योग्य शहानिशा न करताच मतदार यादी निश्चित करण्यात आली. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे अंतिम मतदार यादीमध्ये शेकडो नावे परस्पर इतर प्रभागात ढकलण्याच्या प्रताप पालिका अधिकाऱ्यांनी केला होता. या प्रकरणी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र या तक्रारीची कोणतीही दखल पालिका प्रशासनाने घेतली नाही. एवढेच नव्हे तर या मतदार यादी घोटाळा प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने या प्रकरणी चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते, असे असताना देखील या प्रकरणाची कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. आणि योग्य कार्यवाही देखील करण्यात आली नाही.

याप्रकरणी सतत तक्रार करून देखील पालिका प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याने राष्ट्रवादीच्या वतीने उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. अखेर सोमवारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कबीर गायकवाड, सुरेश सिंह आणि रेश्मा सुर्वे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला मतदारांनी देखील समर्थन दर्शविले आहे. उपोषणाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उपोषणाच्या ठिकाणी उपस्थिती लावून आपले समर्थन दर्शवले आहे. मतदार यादीत अधिकाऱ्यांनी घोळ घातलेला असताना ते घोळ दुरुस्त करण्यासाठी पालिकेचे कोणतेही अधिकारी तत्परता दाखवत नसल्याने उपोषण करण्याची वेळ आल्याचे कबीर गायकवाड यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसambernathअंबरनाथ