शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या विरोधात राष्ट्रवादीने घेतला आक्षेप, पुन्हा जाणार न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 15:04 IST

स्थायी समिती सभापती निवडणुकीला राष्ट्रवादी आणि भाजपाने आक्षेप घेतला आहे. बेकायदेशीर ही निवडणुक प्रक्रिया असल्याचा मुद्दा उपस्थित करीत राष्ट्रवादीने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तौलानीक संख्याबळानुसारच निवड प्रक्रिया करावी असेही त्यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीला पुन्हा लागणार घरघरतौलानिक संख्याबळानुसार निवडणुक घ्यावी

ठाणे - सुमारे दिड वर्षाच्या प्रतिक्षेनंतर स्थायी समिती सभापतीपदाची निवडणुक लावण्यात आली आहे. परंतु ही निवडणुक प्रक्रियाच बेकायदा आणि चुकीची असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी  कॉंग्रेसने पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तौलानीक संख्याबळानुसारच ही निवडणुक प्रक्रिया पार पडावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तर या निवडणुक प्रक्रियेच्या विरोधात भाजपाने देखील न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्थायी समिती गठीत होण्याच्या प्रक्रियेला अडचणी येणार आहेत.       ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेच्या वेळेस ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत शहर अध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील देखील उपस्थित होते. दिड वर्षाच्या प्रर्दीघ प्रतिक्षेनंतर अखेर येत्या १६ मे रोजी ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणुक लागली आहे. त्यासाठी ११ मे रोजी अर्ज भरले जाणार आहेत. या निवडणुकीत आता कॉंग्रेसची भुमिका महत्वाची ठरणार असली तरी देखील सभापती हा आमचाच होईल असा दावा शिवसेनेने केला आहे. परंतु या निवडणुक प्रक्रियेवरच राष्टÑवादी कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. स्थायीची सुनावणी न्यायालयात प्रलंबित असून त्याचा अंमित निकाल हा येत्या २५ जून रोजी लागणार आहे. परंतु निकाल येण्यापूर्वीच सत्ताधारी शिवसेनेला याची घाई कशासाठी असा सवालही आव्हाडांनी उपस्थित केला आहे. त्यातही पालकमंत्र्यांनी ही निवडणुक घेण्यासाठी आग्रह केला असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. आता पालकमंत्री ठाणे महापालिकेचा कारभार चालविणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. निवडणुक घेतांना विरोधी पक्षाला देखील त्यात सहभागी करुन घेणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता हा केवळ मनमानी आणि चुकीचा कारभार केला जात असल्याचेही ते म्हणाले. कोकण विभागीय आयुक्तांनी जे तौलानीक संख्याबळ दिले आहे. त्यानुसार आधी सदस्यांची निवक करावी मगच सभापतीची निवडणुक घ्यावी असेही त्यांनी सांगितले आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या महासभेत पिठासीन अधिकाऱ्यांनी स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर केली होती. यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने तौलानीक संख्याबळानुसार पाच नावे दिली होती. परंतु त्यांचे एक नाव कापण्यात आले होते. हाच मुद्दा आता हाताशी घेऊन राष्ट्रवादीने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. एकूणच ही निवड प्रक्रिया चुकीची असून या विरोधात पुन्हा न्यायालयात धाव घेतली जाईल असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.वास्तविक पाहता स्थायी समिती सदस्यांची निवड ही तौलानीक संख्याबळानुसार झालेली नाही. त्याबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. असे असतांना देखील थेट सभापतीपदाची निवडणुक लावणे चुकीचे आहे. त्यामुळे या प्रक्रियेच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल असा इशारा भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी दिला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाElectionनिवडणूक