शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी; जितेंद्र आव्हाडांची ट्विटच्या माध्यमातून टीका

By अजित मांडके | Updated: June 29, 2023 15:22 IST

शासन आपल्या दारी आता ठाणेकरांची बारी, घेऊन आले पावसाचे पाणी, मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी अशा शब्दात त्यांनी टिका केली आहे.

अजित मांडके,  लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे शहरात बुधवारी झालेल्या जोरदार पावसाने ठाणे महापालिकेच्या कामांची पोलखोल केली आहे. शहरातील ३८ हून अधिक भागात पाणी साचल्याने ठाणेकरांचा चांगलेच हाल झाले. त्यामुळे नालेसफाईची कामे किती चांगली झाली होती, हे देखील समोर आली आहे. याच मुद्यावरुन राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीव्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. शासन आपल्या दारी आता ठाणेकरांची बारी, घेऊन आले पावसाचे पाणी, मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी अशा शब्दात त्यांनी टिका केली आहे.

ठाण्यात बुधवारी तब्बल १४८.५७ मिमी पावसाची नोंद झाली. त्यातही शहरातील ३८ हून अधिक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. वृदांवन सोसायटीमधील तब्बल १५० इमारती पाण्याखाली आल्या होत्या. नाल्यातील आणि गटारातील पाणी रस्त्यांवर आल्याने अनेक ठिकाणी पाणीच पाणी अशीच काहीशी परिस्थिती होती. तिकडे दिव्यातही अनेक चाळींमध्ये पाणी शिरल्याचे दिसून आले. त्यातही पावसाळा सुरु झाल्यानंतरही शहरातील रस्त्यांची कामे देखील अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान शहरातील नौपाडा, पाचपखाडी, खारकर आळी, कोपरी, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर, दिवा आदी भागात पाणी साचले होते. या भागांमध्ये तुंबलेल्या पाण्याची चित्रफित समाजमाध्यामांवर प्रसारित करत राष्ट्रवादीचे आमदार आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांसह पालिका आयुक्तांवर टिका केली आहे. पहिल्या दोन दिवसाच्या पावसातच ठाण्यात पाणी तुंबले आहे. असा प्रकार ठाण्यात कधीच होत नव्हता. विशेष म्हणजे नाले सफाईची पाहणी स्वत: मुख्यमंत्र्यांनी केली होती, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यानंतरही ठाण्यात पाणी तुंबणार, त्याकडे लक्ष द्या,अशी विनंती मी अनेक वेळा ठाणे पालिका आयुक्त यांच्याकडे केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांच्या विशेष सेवेत दंग असणाºया आयुक्तांना याकडे लक्ष देण्यास बहुदा वेळ मिळाला नसावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.  

पाऊस आला याच कौतुक करा..ठाणे तुंबल याची तक्रार काय करता..! अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देतील अशी मला खात्री आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.  शासन आपल्या दारी, आता ठाणेकरांची बारी.. घेऊन आले पावसाचे पाणी, मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी..! अशी टिकाही त्यांनी केली आहे. तर व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी ठाण्यातील विदारक चित्रच दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडEknath Shindeएकनाथ शिंदे