शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी; जितेंद्र आव्हाडांची ट्विटच्या माध्यमातून टीका

By अजित मांडके | Updated: June 29, 2023 15:22 IST

शासन आपल्या दारी आता ठाणेकरांची बारी, घेऊन आले पावसाचे पाणी, मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी अशा शब्दात त्यांनी टिका केली आहे.

अजित मांडके,  लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे शहरात बुधवारी झालेल्या जोरदार पावसाने ठाणे महापालिकेच्या कामांची पोलखोल केली आहे. शहरातील ३८ हून अधिक भागात पाणी साचल्याने ठाणेकरांचा चांगलेच हाल झाले. त्यामुळे नालेसफाईची कामे किती चांगली झाली होती, हे देखील समोर आली आहे. याच मुद्यावरुन राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीव्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. शासन आपल्या दारी आता ठाणेकरांची बारी, घेऊन आले पावसाचे पाणी, मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी अशा शब्दात त्यांनी टिका केली आहे.

ठाण्यात बुधवारी तब्बल १४८.५७ मिमी पावसाची नोंद झाली. त्यातही शहरातील ३८ हून अधिक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. वृदांवन सोसायटीमधील तब्बल १५० इमारती पाण्याखाली आल्या होत्या. नाल्यातील आणि गटारातील पाणी रस्त्यांवर आल्याने अनेक ठिकाणी पाणीच पाणी अशीच काहीशी परिस्थिती होती. तिकडे दिव्यातही अनेक चाळींमध्ये पाणी शिरल्याचे दिसून आले. त्यातही पावसाळा सुरु झाल्यानंतरही शहरातील रस्त्यांची कामे देखील अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान शहरातील नौपाडा, पाचपखाडी, खारकर आळी, कोपरी, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि घोडबंदर, दिवा आदी भागात पाणी साचले होते. या भागांमध्ये तुंबलेल्या पाण्याची चित्रफित समाजमाध्यामांवर प्रसारित करत राष्ट्रवादीचे आमदार आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांसह पालिका आयुक्तांवर टिका केली आहे. पहिल्या दोन दिवसाच्या पावसातच ठाण्यात पाणी तुंबले आहे. असा प्रकार ठाण्यात कधीच होत नव्हता. विशेष म्हणजे नाले सफाईची पाहणी स्वत: मुख्यमंत्र्यांनी केली होती, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यानंतरही ठाण्यात पाणी तुंबणार, त्याकडे लक्ष द्या,अशी विनंती मी अनेक वेळा ठाणे पालिका आयुक्त यांच्याकडे केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांच्या विशेष सेवेत दंग असणाºया आयुक्तांना याकडे लक्ष देण्यास बहुदा वेळ मिळाला नसावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.  

पाऊस आला याच कौतुक करा..ठाणे तुंबल याची तक्रार काय करता..! अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देतील अशी मला खात्री आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.  शासन आपल्या दारी, आता ठाणेकरांची बारी.. घेऊन आले पावसाचे पाणी, मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी..! अशी टिकाही त्यांनी केली आहे. तर व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी ठाण्यातील विदारक चित्रच दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडEknath Shindeएकनाथ शिंदे