शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

राष्ट्रवादीने करुन दिली शिवसेनेला वचन नाम्याची आठवण, बॅनरवरुन गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 16:01 IST

शिवसेनेने दिलेल्या वचननाम्याची चिरफाड करणारा बॅनर राष्ट्रवादीने ठाण्यात लावला आणि काही क्षणातच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हा बॅनर खाली उतरविला. करवाढीच्या मुद्याचा हा बॅनर मात्र ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत होता.

ठळक मुद्दे३४ टक्के करवाढीचा राष्ट्रवादीने केला अनोखा निषेधशिवसेनेने केली ठाणेकरांची फसवणूक

ठाणे - पाचशे फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी देण्याचे आश्वासन शिवसेनेने ठाणेकरांना दिले होते. आपल्या वचननाम्यामध्ये तसे लेखी वचनही दिले होते. मात्र, करमाफी तर सोडा थेट १५ टक्के करवाढ करून शिवसेनेने ठाणेकरांची फसवणूक केल्याचा आरोप करीत सेनेला वचननाम्याची आठवण करून देणारा शिवसेनेने केली ठाणेकरांची फसवणूक या मथळ्याखाली आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक फलक ठाणे शहरात लावला. ठाणेकरांची फसवणूक करणाऱ्या शिवसेनेने ठाणेकरांची माफी मागावी, प्रशासनावर वचक नसल्याने सत्ता सोडून द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले आहे. दरम्यान, काही तासातच सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा फलक काढला.            मागील वर्षी झालेल्या ठरावामध्ये ३४ टक्के करवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी यंदापासून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मागील महासभेत ही करवाढ ३४ टक्क्यांवरून १५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा ठराव रद्द केलेला नसताना तसेच तांत्रिकदृष्ट्या ही करवाढ करणे शक्य नसताना हा ठराव महासभेत मंजुरीसाठी घेण्यात आला, हा महासभेचा अवमान आहे. काँग्रेस, भाजपा आणि राष्ट्रवादीने यास विरोध केल्यानंतरही गदारोळात शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात करवाढीचा उल्लेख नसला तरी या प्रस्तावामुळे ठाणेकरांचे कंबरडे मोडले आहे. सन २०१५-१६ मध्ये १० टक्के, २०१६-१७ मध्ये पाच टक्के आणि आता थेट १५ टक्के करवाढ करून शिवसेनेने विश्वास ठेवणाºया ठाणेकरांचा विश्वासघात केला आहे. त्यांनी जे लेखी स्वरूपात आश्वासन दिले होते तेच आश्वासन ठामपातील सत्ताधारी विसरले असल्याने आम्हाला होर्डींग्ज लावून त्याची आठवण करून द्यावी लागली, असे परांजपे म्हणाले.          दरम्यान, शिवसेनेने केली ठाणेकरांची फसवणूक या मथळ्याखालील हा होर्डींग्ज शिवसैनिकांनी लागलीच खाली उतरविला. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला महत्वाचे स्थान असते. मात्र, येथे दबावतंत्र वापरून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, जनतेची ही फसवणूक आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही आनंद परांजपे यांनी दिला. 

टॅग्स :thaneठाणेBanerबाणेरNCPराष्ट्रवादी काँग्रेस