शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या अजेंड्यावर नेवाळी, उद्धव ठाकरेंशी चर्चा : वाचला अत्याचाराचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:30 IST

नेवाळीतील शेतक-यांचे आंदोलन पोलीसी बळाच्या वापरातून ज्यापद्धतीन९ दडपले गेले, त्याबद्दल गावकºयांच्या मनात अजूनही चीड आहे. हा विषय आता शिवसेनेने हाती घ्यावा, अशी मागणी तेथील लोकप्रतिनिधींनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यावर ठाकरे यांनी पूर्ण पाठिंब्याची ग्वाही दिली.

कल्याण : नेवाळीतील शेतक-यांचे आंदोलन पोलीसी बळाच्या वापरातून ज्यापद्धतीन९ दडपले गेले, त्याबद्दल गावकºयांच्या मनात अजूनही चीड आहे. हा विषय आता शिवसेनेने हाती घ्यावा, अशी मागणी तेथील लोकप्रतिनिधींनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यावर ठाकरे यांनी पूर्ण पाठिंब्याची ग्वाही दिली.ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर शिवसेनेच्या सर्व विजयी उमेदवारांनी शनिवारी ठाकरे यांची भेट घेतली. अंबरनाथ पंचायत समितीत नेवाळी गणातून नेवाळी ग्रामपंचायतीचे सरपंच चैनू जाधव यांच्या पत्नी, शिवसेनापुरस्कृत उमेदवार तेजश्री जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी नेवाळीत शेतकºयांवर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला.धावपट्टीसाठी घेतलेल्या जमिनी परत करण्याच्या मागणीवरून शेतकºयांनी जून महिन्यात छेडलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आंदोलकांनी टायर, वाहने पेटवून देत काटईनाका-बदलापूर रस्त्यावरील वाहतूक सहा तास रोखून धरली होती. यावेळच्या दगडफेकीत पोलिसांसह २६ जण जखमी झाले होते. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी छºर्याच्या बंदुकीचा वापर करत गोळीबार केला. त्यात शेतकरी जखमी झाले होते. नंतर वेगवेगळ्या गावातील शेतकºयांचे अटकसत्र राबवण्यात आले. संघर्ष समितीने वारंवार संरक्षणमंत्री, जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. पण कोणताही निर्णय न झाल्याने शेतकरी आक्र मक झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसी अत्याचाराला नेवाळीतला शेतकरी बळी पडला आहे. इतके होऊनही आता निवडणुका झाल्यानंतर शेतकºयांच्या समस्यांकडे कोणी लक्ष देत नाही. नेवाळी परिसरातील शेतकºयांच्या जमिनी बळकावणे म्हणजेच सरकारने शेतकºयांच्या तोंडचा घास काढून घेण्यासारखे आहे. या परिसरातील शेतकºयांच्या समस्या कमी न होता वाढत चालल्याची स्थानिकांची भावना आहे. चैनू जाधव यांनी याकडे उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. यावेळी जाधव यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगेही उपस्थित होते.संपूर्ण ताकदीने शेतकºयांच्या पाठीशी-कोणताही निर्णय न झाल्याने नेवाळीतील शेतकरी आक्र मक झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसी अत्याचाराला नेवाळीतला शेतकरी बळी पडला आहे.आता निवडणुका झाल्यानंतरही शेतकºयांच्या समस्यांकडे कोणी लक्ष देत नाही. नेवाळी परिसरातील शेतकºयांच्या जमिनी बळकावणे म्हणजेच सरकारने शेतकºयांच्या तोंडचा घास काढून घेण्यासारखे आहे. या परिसरातील शेतकºयांच्या समस्या कमी न होता वाढत चालल्याची स्थानिकांची भावना आहे. चैनू जाधव यांनी याकडे उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. जाधव यांनी पक्षप्रमुखांना शेतकºयांवर झालेल्या अत्याचाराचा तपशील दिला. तेव्हा शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी नेवाळीतील शेतकºयांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना