शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

सेनेच्या अजेंड्यावर नेवाळी, उद्धव ठाकरेंशी चर्चा : वाचला अत्याचाराचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:30 IST

नेवाळीतील शेतक-यांचे आंदोलन पोलीसी बळाच्या वापरातून ज्यापद्धतीन९ दडपले गेले, त्याबद्दल गावकºयांच्या मनात अजूनही चीड आहे. हा विषय आता शिवसेनेने हाती घ्यावा, अशी मागणी तेथील लोकप्रतिनिधींनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यावर ठाकरे यांनी पूर्ण पाठिंब्याची ग्वाही दिली.

कल्याण : नेवाळीतील शेतक-यांचे आंदोलन पोलीसी बळाच्या वापरातून ज्यापद्धतीन९ दडपले गेले, त्याबद्दल गावकºयांच्या मनात अजूनही चीड आहे. हा विषय आता शिवसेनेने हाती घ्यावा, अशी मागणी तेथील लोकप्रतिनिधींनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यावर ठाकरे यांनी पूर्ण पाठिंब्याची ग्वाही दिली.ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर शिवसेनेच्या सर्व विजयी उमेदवारांनी शनिवारी ठाकरे यांची भेट घेतली. अंबरनाथ पंचायत समितीत नेवाळी गणातून नेवाळी ग्रामपंचायतीचे सरपंच चैनू जाधव यांच्या पत्नी, शिवसेनापुरस्कृत उमेदवार तेजश्री जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी नेवाळीत शेतकºयांवर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला.धावपट्टीसाठी घेतलेल्या जमिनी परत करण्याच्या मागणीवरून शेतकºयांनी जून महिन्यात छेडलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आंदोलकांनी टायर, वाहने पेटवून देत काटईनाका-बदलापूर रस्त्यावरील वाहतूक सहा तास रोखून धरली होती. यावेळच्या दगडफेकीत पोलिसांसह २६ जण जखमी झाले होते. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी छºर्याच्या बंदुकीचा वापर करत गोळीबार केला. त्यात शेतकरी जखमी झाले होते. नंतर वेगवेगळ्या गावातील शेतकºयांचे अटकसत्र राबवण्यात आले. संघर्ष समितीने वारंवार संरक्षणमंत्री, जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. पण कोणताही निर्णय न झाल्याने शेतकरी आक्र मक झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसी अत्याचाराला नेवाळीतला शेतकरी बळी पडला आहे. इतके होऊनही आता निवडणुका झाल्यानंतर शेतकºयांच्या समस्यांकडे कोणी लक्ष देत नाही. नेवाळी परिसरातील शेतकºयांच्या जमिनी बळकावणे म्हणजेच सरकारने शेतकºयांच्या तोंडचा घास काढून घेण्यासारखे आहे. या परिसरातील शेतकºयांच्या समस्या कमी न होता वाढत चालल्याची स्थानिकांची भावना आहे. चैनू जाधव यांनी याकडे उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. यावेळी जाधव यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगेही उपस्थित होते.संपूर्ण ताकदीने शेतकºयांच्या पाठीशी-कोणताही निर्णय न झाल्याने नेवाळीतील शेतकरी आक्र मक झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसी अत्याचाराला नेवाळीतला शेतकरी बळी पडला आहे.आता निवडणुका झाल्यानंतरही शेतकºयांच्या समस्यांकडे कोणी लक्ष देत नाही. नेवाळी परिसरातील शेतकºयांच्या जमिनी बळकावणे म्हणजेच सरकारने शेतकºयांच्या तोंडचा घास काढून घेण्यासारखे आहे. या परिसरातील शेतकºयांच्या समस्या कमी न होता वाढत चालल्याची स्थानिकांची भावना आहे. चैनू जाधव यांनी याकडे उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले. जाधव यांनी पक्षप्रमुखांना शेतकºयांवर झालेल्या अत्याचाराचा तपशील दिला. तेव्हा शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी नेवाळीतील शेतकºयांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना