शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सागरमाला प्रकल्पांतर्गत जलवाहतुकीमुळे महागाई कमी होईल - रविंद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 18:11 IST

केंद्र व राज्य सरकारच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत ठिकठिकाणी जलवाहतुकीचे प्रकल्प सुरु करण्याचे काम हाती घेतले आहे. महाराष्ट्राला कोकण किनारी ७२५ किलो मीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. जलवाहतुकीमुळे महागाई कमी होईल असा दावा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी येथे केला.

डोंबिवली: केंद्र व राज्य सरकारच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत ठिकठिकाणी जलवाहतुकीचे प्रकल्प सुरु करण्याचे काम हाती घेतले आहे. महाराष्ट्राला कोकण किनारी ७२५ किलो मीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. जलवाहतुकीमुळे महागाई कमी होईल असा दावा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी येथे केला.डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने हॉटेल लिजंड येथे राज्यमंत्री चव्हाम यांच्या वार्तालाप आज सोमवारी आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी राज्यमंत्री चव्हाण यांनी उपरोक्त दावा केला. चव्हाण यांनी सांगितले की, रस्ते माल वाहतूकीची खर्च जास्त आहे. त्यात इंधन व वेळ वाया जातो. तसेच रस्ते माल वाहतूकीमुळे वाहतूक कोंडीचा सामना प्रवासी वाहतुकीला करावा लागतो. रस्ते जलवाहतुकीपेक्षा रेल्वे मालवाहतूकीचा खर्च कमी आहे. रेल्वे मालवाहतूकीपेक्षाही जलवाहतूकीचा खर्च कमी आहे. जलवाहतुकीचे प्रकल्प कार्यान्वीत झाल्यावर मालवाहतूकीसाठी लागणारा खर्च हा रस्ते वाहतूकीच्या तुलनेत अत्यंत कमी असेल. जलवाहतूकीमुळे महागाई कमी होण्यास जास्त मदत होईल असे चव्हाण यांनी नमूद केले. जलवाहतुकी प्रमाणेच कोकण किनारपट्टीलगत कोस्टल रोड तयार करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे. त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्न आहे. जलवाहतूकीला सरकारने प्राधान्य दिले आहे. विविध बंदराचा विकास सुरु केला आहे. त्यामुळे बंदरात दोन लाख मेट्रीक टन क्षमतेची जहाजे येऊ लागली आहे. यापूर्वी इतक्या मोठ्या क्षमतेची जहाजे बंदरात मार्गक्रमण करीत नव्हती. समुद्राच्या आत बंधारे बांधून चॅनल तयार केले जाणार आहे. तसेच अनेक बंदरातील गाळ काढल्याने जहाजे थेट बंदराच्या किनारी येऊ लागली आहेत.माहिती आणि तंत्रज्ञान खात्यामार्फत राज्यातील २८ हजार ५०० गावांपैकी १४ हजार गावे भारत नेटने जोडली गेली आहे. उर्वरीत गावेही २०१८ अखेरपर्यंत भारत नेटने जोडली जातील. त्यामुळे शाळा, सरकारी कार्यालये व बँकिंगचे व्यवहार भारत नेटमुळे अगदी सहज सोपे व जलद होण्यास शक्य होईल. विशेष म्हणचे त्याचा शिक्षणासाठी अधिक फायदा होईल. ज्या शाळेत शिक्षक नाही. त्या शाळेत डिजिटलद्वारे संपर्क साधून मुलाना शिकविता येणार आहे. अनेकांना सहकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागणार नाही. भारत नेटच्या माध्यमातून आॅनलाईन व्यवहार करता येऊ शकतात अशी माहिती चव्हाण यांनी यावेळी दिली.ग्रामीण भागात डॉक्टर व आरोग्य सेवा याविषयी नेहमीच ओरड केली जाते. त्यासाठी टेली मेडीसीन ही संकल्पना राज्यभरात राबविली जाणार आहे. या टेलीमेडीसीन संकल्पनेतून ज्या ठिकाणी डॉक्टर नाही. त्याठिकाणी टेलीमेडीसीन द्वारे संपर्क साधून रुग्णालया औषध उपचार सुचविता येईल. गोळ््या सांगता येतील. त्यातून ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविणे शक्य होईल. केवळ डॉक्टर नाही. या कारणास्तव उपचार अडून राहणार नाही. ह्रदय विकाराच्या शस्त्रक्रियेत स्टेंथ टाकण्याकरीता ७५ हजार ते एक लाख ७५ हजार रुपये खर्च येत होता. ही स्टेंथ औषध अथवा वस्तू म्हणून गणली जावी याविषयी काही सुस्पष्टता नसली तरी सरकारने त्याची किंमत ७ ते १८ हजार रुपये दरम्यान आणली. त्यामुळे ह्रदयविकाराचय रुग्णाना एक मोठा दिलासा मिळाला आहे. हे काम सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शक्य झाले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

स्मार्ट सिटी हा प्रकल्प कल्याण शहर केंद्रीत आहे. त्यात डोंबिवलीचा समावेश नाही. याविषयी चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी स्मार्ट सिटीच्या समितीत भाजपचा एकही सदस्य नव्हता. त्यात शिवसेनाचे सदस्य होते. त्यांनी कल्याण केंद्रीत प्रकल्प सूचविले. तेच त्यात समाविष्ट झाले. मात्र कल्याण ग्रोथ सेंटरच्या धर्तीवर डोंबिवली व कल्याण शहरात विकास परियोजना लागू करण्याचे सूचित केले आहे. त्यासाठी महापालिकेने योजना राबविण्याकरीता इरादा जाहिर केला आहे. या विकासासाठी अन्य कंपन्या गुंतवणूकीसाठी इच्छूक आहे. त्यातून विकासाला गती मिळणार आहे.मला काय मिळणार या हेतूमुळे अडली कामे...डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णलायात डायलिसीस सेंटर सुरु करण्यासाठी व सुतिका गृह नव्याने बांधण्यासाठी कसलीही अडचण नाही. मात्र स्थानिक महापालिकेतील काही मंडळी मला त्यातून काही मिळणार की नाही असा आग्रह धरीत असल्याने ही कामे रखडली आहे. मात्र त्यांचे हेतू काहीही असोत. त्यावर मात करुन डायलिसीस सेंटर सुरु करणार व सुतिका गृहही उभारणार असे चव्हाण यांनी सांगितले. मोठागाव ठाकूली माणकोली खाडी पूल, कल्याण मेट्रो, कल्याण ग्रोथ सेंटर, रिंग रोड या विविध प्रकल्पासाठी निधीची कोणतीही अडचण सरकारच्या पुढे नाही. सरकारचा निधी व इतर कंपन्याही गुंतवणूकीसाठी इच्छूक आहेत. प्रकल्प होत असताना महापालिकेची आर्थिक पतही असणे व महापालिकेने उत्पन्नाचे नवे स्त्रोत शोधून उत्पन्न वाढविणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे हा मुद्दाही चव्हाण यांनी मांडला.फोटो रविंद्र चव्हाण यांचा वापरणे.

 

टॅग्स :dombivaliडोंबिवली