शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वीजेच्या लपंडावाने तिर्थक्षेत्र वज्रेश्वरी देवीचा नवरात्रौ उत्सव अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 23:50 IST

भिवंडी : गेल्या काही दिवसांपासून वज्रेश्वरी आणि परिसरांत वीजेचा लपंडाव सुरू असल्याने यंदा योगीनी वज्रेश्वरी देवीचा नवरात्रौ उत्सव अंधारात सुरू असुन या बाबत भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. तर संस्थानाचा जनरेटर नादुरूस्त असल्याने आणि मंदिर प्रशासनाने पर्यायी व्यवस्था न केल्याने ऐन नवरात्रीच्या काळात मंदिरात मेणबत्त्या लावून देवीची पुजा करण्याची वेळ ...

ठळक मुद्देयोगीनी वज्रेश्वरी देवीचा नवरात्रौ उत्सव अंधारातशासनाच्या वीजवितरण कंपनीच्या वसई डिवीजनचे दुर्लक्षचिमाजी आप्पानी बांधले किल्यासारखे मंदिर

भिवंडी: गेल्या काही दिवसांपासून वज्रेश्वरी आणि परिसरांत वीजेचा लपंडाव सुरू असल्याने यंदा योगीनी वज्रेश्वरी देवीचा नवरात्रौ उत्सव अंधारात सुरू असुन या बाबत भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. तर संस्थानाचा जनरेटर नादुरूस्त असल्याने आणि मंदिर प्रशासनाने पर्यायी व्यवस्था न केल्याने ऐन नवरात्रीच्या काळात मंदिरात मेणबत्त्या लावून देवीची पुजा करण्याची वेळ पुजाऱ्यांवर आली आहे.महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले तिर्थक्षेत्र आणि तमाम आगरी-कोळी बांधवांची कुलदेवी असलेल्या योगीनी वज्रेश्वरी देवीचे मंदिर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात आहे. वज्रेश्वरी देवी बाबत अशी आख्यायीका सांगीतली जाते की,त्रेतायुगात कालिकात व सिंहमार हे दोन दैत्य उन्मत्त बनले होते. या असुरांनी भूतलावर मोठा धुमाकूळ घातला होता. या असुरांपासून ऋषीमुनींचे व लोकांचे संरक्षण करण्यासाठी व त्यांचा नाश करण्यासाठी सर्व देवी देवतांनी वशिष्ठ ऋषींच्या अधिपत्याखाली या भूमीत त्रिचंडी यज्ञ करण्याचे योजिले.या ठिकाणी गरम पाण्याची कुंडे निर्माण केली. या यज्ञाकरीता इंद्रदेवांना आमंत्रण न दिल्याने त्यांचा राग अनावर झाला आणि आपल्यावर वर्चस्व करण्याचा देवांचा व वसिष्ठ मुनींचा डाव आहे,असे समजून इंद्र देवाने त्रिचंडी यज्ञावर व वशिष्ठावर महाभयंकर असे वज्र सोडले. या वज्रामुळे यज्ञाच्या ठिकाणी प्रलय निर्माण झाले. तेव्हा भयभीत ऋषीमुनींनी आदिमाया आदिशक्ती पार्वती मातेची आळवणी सुरू केली. तेव्हा पार्वती मातेने इंद्राने फेकलेले महाभयंकर वज्र पडण्यापूर्वी गिळून टाकले व दोन्ही असुरांचा वध केला. त्यानंतर या भूमीतील यज्ञयाग यथासांग पार पडले. तेव्हापासून या देवीने वज्रेश्वरी नांव धारण करून भक्तांच्या रक्षणासाठी व कल्याणाकरिता कालिका व रेणुका या देवींसह वज्रेश्वरी गावात वास्तव्यास आहे.दिपमाळे समोर बावन्न पायºयांचे देवीचे भव्य मंदिर किल्लेवजा तटांनी बांधलेले आहे. पेशवेकाळात चिमाजी आप्पा जेंव्हा वसईच्या स्वारीवर निघाले, तेव्हा या ठिकाणी त्यांनी देवीला नवस केला की जर मी वसई सर केली तर तुझे मंदिर किल्ल्यासारखे बांधेंन. तेव्हा देवीच्या आशीर्वादाने चिमाजी आप्पानी मोहीम यशस्वी केली आणि परतल्यानंतर देवीचे भव्य असे किल्यासारखे मंदिर बांधले.तसेच देवीच्या दैनंदिन पूजा आर्चनासाठी परिसरातील सात गावे इनाम म्हणून दिली.ठाणे व पालघर जिल्ह्यातील भक्तांना देवीचे फार महत्व असुन नवरात्रौच्या काळात या देवळात लाखो भाविकांची गर्दी होत असते.अशा स्थितीत शासनाने या देवस्थानासाठी विविध सोयी उपलब्ध करून देणे अपेक्षीत आहे. किमान अश्विन व चैत्र नवरात्रौ उत्सवाच्या वेळी तसेच देवीच्या जत्रेच्या वेळी भाविकांच्या सोयीसाठी वीजेच्या सोयीसह इतर मुलभूत सुविधा मंदिराचे संस्थानीक व शासनाच्या प्रतिनीधींनी प्रयत्न केले पाहिजेत. शासनाच्या वीजवितरण कंपनीच्या वसई डिवीजन मधून या परिसरांत वीज पुरवठा होत असुन पारोळ सब स्टेशनमधून वज्रेश्वरीसह परिसरांतील गावांना वीजपुरवठा केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून वज्रेश्वरीसह इतर गावांंमध्ये वीजेचा लपंडाव सुरू असल्याने दर्शनाला येणाºया भाविकांची गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे या प्रकरणी उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर व तहसिलदार शशीकांत गायकवाड यांनी लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीelectricityवीज