शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

वीजेच्या लपंडावाने तिर्थक्षेत्र वज्रेश्वरी देवीचा नवरात्रौ उत्सव अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 23:50 IST

भिवंडी : गेल्या काही दिवसांपासून वज्रेश्वरी आणि परिसरांत वीजेचा लपंडाव सुरू असल्याने यंदा योगीनी वज्रेश्वरी देवीचा नवरात्रौ उत्सव अंधारात सुरू असुन या बाबत भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. तर संस्थानाचा जनरेटर नादुरूस्त असल्याने आणि मंदिर प्रशासनाने पर्यायी व्यवस्था न केल्याने ऐन नवरात्रीच्या काळात मंदिरात मेणबत्त्या लावून देवीची पुजा करण्याची वेळ ...

ठळक मुद्देयोगीनी वज्रेश्वरी देवीचा नवरात्रौ उत्सव अंधारातशासनाच्या वीजवितरण कंपनीच्या वसई डिवीजनचे दुर्लक्षचिमाजी आप्पानी बांधले किल्यासारखे मंदिर

भिवंडी: गेल्या काही दिवसांपासून वज्रेश्वरी आणि परिसरांत वीजेचा लपंडाव सुरू असल्याने यंदा योगीनी वज्रेश्वरी देवीचा नवरात्रौ उत्सव अंधारात सुरू असुन या बाबत भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. तर संस्थानाचा जनरेटर नादुरूस्त असल्याने आणि मंदिर प्रशासनाने पर्यायी व्यवस्था न केल्याने ऐन नवरात्रीच्या काळात मंदिरात मेणबत्त्या लावून देवीची पुजा करण्याची वेळ पुजाऱ्यांवर आली आहे.महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले तिर्थक्षेत्र आणि तमाम आगरी-कोळी बांधवांची कुलदेवी असलेल्या योगीनी वज्रेश्वरी देवीचे मंदिर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात आहे. वज्रेश्वरी देवी बाबत अशी आख्यायीका सांगीतली जाते की,त्रेतायुगात कालिकात व सिंहमार हे दोन दैत्य उन्मत्त बनले होते. या असुरांनी भूतलावर मोठा धुमाकूळ घातला होता. या असुरांपासून ऋषीमुनींचे व लोकांचे संरक्षण करण्यासाठी व त्यांचा नाश करण्यासाठी सर्व देवी देवतांनी वशिष्ठ ऋषींच्या अधिपत्याखाली या भूमीत त्रिचंडी यज्ञ करण्याचे योजिले.या ठिकाणी गरम पाण्याची कुंडे निर्माण केली. या यज्ञाकरीता इंद्रदेवांना आमंत्रण न दिल्याने त्यांचा राग अनावर झाला आणि आपल्यावर वर्चस्व करण्याचा देवांचा व वसिष्ठ मुनींचा डाव आहे,असे समजून इंद्र देवाने त्रिचंडी यज्ञावर व वशिष्ठावर महाभयंकर असे वज्र सोडले. या वज्रामुळे यज्ञाच्या ठिकाणी प्रलय निर्माण झाले. तेव्हा भयभीत ऋषीमुनींनी आदिमाया आदिशक्ती पार्वती मातेची आळवणी सुरू केली. तेव्हा पार्वती मातेने इंद्राने फेकलेले महाभयंकर वज्र पडण्यापूर्वी गिळून टाकले व दोन्ही असुरांचा वध केला. त्यानंतर या भूमीतील यज्ञयाग यथासांग पार पडले. तेव्हापासून या देवीने वज्रेश्वरी नांव धारण करून भक्तांच्या रक्षणासाठी व कल्याणाकरिता कालिका व रेणुका या देवींसह वज्रेश्वरी गावात वास्तव्यास आहे.दिपमाळे समोर बावन्न पायºयांचे देवीचे भव्य मंदिर किल्लेवजा तटांनी बांधलेले आहे. पेशवेकाळात चिमाजी आप्पा जेंव्हा वसईच्या स्वारीवर निघाले, तेव्हा या ठिकाणी त्यांनी देवीला नवस केला की जर मी वसई सर केली तर तुझे मंदिर किल्ल्यासारखे बांधेंन. तेव्हा देवीच्या आशीर्वादाने चिमाजी आप्पानी मोहीम यशस्वी केली आणि परतल्यानंतर देवीचे भव्य असे किल्यासारखे मंदिर बांधले.तसेच देवीच्या दैनंदिन पूजा आर्चनासाठी परिसरातील सात गावे इनाम म्हणून दिली.ठाणे व पालघर जिल्ह्यातील भक्तांना देवीचे फार महत्व असुन नवरात्रौच्या काळात या देवळात लाखो भाविकांची गर्दी होत असते.अशा स्थितीत शासनाने या देवस्थानासाठी विविध सोयी उपलब्ध करून देणे अपेक्षीत आहे. किमान अश्विन व चैत्र नवरात्रौ उत्सवाच्या वेळी तसेच देवीच्या जत्रेच्या वेळी भाविकांच्या सोयीसाठी वीजेच्या सोयीसह इतर मुलभूत सुविधा मंदिराचे संस्थानीक व शासनाच्या प्रतिनीधींनी प्रयत्न केले पाहिजेत. शासनाच्या वीजवितरण कंपनीच्या वसई डिवीजन मधून या परिसरांत वीज पुरवठा होत असुन पारोळ सब स्टेशनमधून वज्रेश्वरीसह परिसरांतील गावांना वीजपुरवठा केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून वज्रेश्वरीसह इतर गावांंमध्ये वीजेचा लपंडाव सुरू असल्याने दर्शनाला येणाºया भाविकांची गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे या प्रकरणी उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर व तहसिलदार शशीकांत गायकवाड यांनी लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीelectricityवीज