शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
4
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
5
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
6
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
7
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
8
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
9
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
10
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
11
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
12
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
13
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
14
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
15
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
16
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
17
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
18
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
19
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
20
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

‘निसर्ग’चा ३४ शाळांना तडाखा, शिक्षण विभागाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:51 IST

ठाणे जिल्ह्यात ३४ लाखांहून अधिक नुकसान : शिक्षण विभागाची माहिती

स्नेहा पावसकर ।ठाणे : गेल्या आठवड्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका रायगडसह ठाणे, मुंबईलाही बसला. त्याच्या तडाख्यात ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ३४ शाळांचे मिळून एकूण ३२ लाख २५ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. या सगळ्या नुकसानीचे पंचनामे करून याची माहिती पुढे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभागाला दिली गेली आहे.

निसर्ग चक्रीवादळ मुंबई- ठाण्याला चकवा देऊन पुढे निघून गेले असले तरी त्यामुळे निर्माण झालेल्या वारा, पावसाने मात्र ठाणे-मुंबईत काहीसे नुकसान केलेच. ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भार्इंदर अशा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अशा प्रकारचे नुकसान अधिक झाले. घराबरोबरच ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या जवळपास ३१ आणि खाजगी माध्यमिक ३ शाळांचे या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने नुकसान झाले आहे. यातील ३१ शाळा या प्राथमिक विभागाच्या तर ३ शाळा या माध्यमिकच्या आहेत.३१ पैकी सर्वाधिक १३ शाळा मुरबाड तालुक्यातील, ७ शाळा भिवंडीतील, ५ शहापूर तालुक्यातील, ४ अंबरनाथ तालुक्यातील तर २ कल्याणमधील आहेत. या शाळांपैकी काही शाळांचे वर्गखोल्यांचे छत उडाले आहे. काही शाळांच्या संरक्षक भिंती अर्ध्या कोसळल्या, काहींच्या वर्गखोल्यांची कौले फुटून वासे तुटले आहेत.काही शाळांच्या गेटची मोडतोड झाली, पाण्याचे पाइप तुटले तर काहींच्या शौचालय, स्वच्छतागृहांची पडझड झाली आहे. या ३१ शाळांचे मिळून सुमारे ३१ लाख आठ हजार ४०० रुपये इतके नुकसान झाले आहे, अशी माहिती प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी दिली. तर माध्यमिक विभागातील मुरबाड तालुक्यातील तळवली येथील एका शाळेचे, तसेच शहापूरमधील आणि ठाण्यातील प्रत्येकी एका शाळेचे मिळून एक लाख १७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, असे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी सांगितले. कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या तरी शाळा लवकर सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत.मात्र, शाळा सुरू होईपर्यंत नुकसानग्रस्त शाळांचे काम झाले पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, असे पालकवर्गाचे मत आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी अपेक्षा आहे.निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून ही माहिती आम्ही पुढे शिक्षण विभाग तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही पाठविली आहे.- शेषराव बडे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, ठाणे जिल्हा परिषद

टॅग्स :thaneठाणे