शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

‘निसर्ग’चा ३४ शाळांना तडाखा, शिक्षण विभागाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:51 IST

ठाणे जिल्ह्यात ३४ लाखांहून अधिक नुकसान : शिक्षण विभागाची माहिती

स्नेहा पावसकर ।ठाणे : गेल्या आठवड्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका रायगडसह ठाणे, मुंबईलाही बसला. त्याच्या तडाख्यात ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ३४ शाळांचे मिळून एकूण ३२ लाख २५ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. या सगळ्या नुकसानीचे पंचनामे करून याची माहिती पुढे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभागाला दिली गेली आहे.

निसर्ग चक्रीवादळ मुंबई- ठाण्याला चकवा देऊन पुढे निघून गेले असले तरी त्यामुळे निर्माण झालेल्या वारा, पावसाने मात्र ठाणे-मुंबईत काहीसे नुकसान केलेच. ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भार्इंदर अशा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अशा प्रकारचे नुकसान अधिक झाले. घराबरोबरच ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या जवळपास ३१ आणि खाजगी माध्यमिक ३ शाळांचे या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने नुकसान झाले आहे. यातील ३१ शाळा या प्राथमिक विभागाच्या तर ३ शाळा या माध्यमिकच्या आहेत.३१ पैकी सर्वाधिक १३ शाळा मुरबाड तालुक्यातील, ७ शाळा भिवंडीतील, ५ शहापूर तालुक्यातील, ४ अंबरनाथ तालुक्यातील तर २ कल्याणमधील आहेत. या शाळांपैकी काही शाळांचे वर्गखोल्यांचे छत उडाले आहे. काही शाळांच्या संरक्षक भिंती अर्ध्या कोसळल्या, काहींच्या वर्गखोल्यांची कौले फुटून वासे तुटले आहेत.काही शाळांच्या गेटची मोडतोड झाली, पाण्याचे पाइप तुटले तर काहींच्या शौचालय, स्वच्छतागृहांची पडझड झाली आहे. या ३१ शाळांचे मिळून सुमारे ३१ लाख आठ हजार ४०० रुपये इतके नुकसान झाले आहे, अशी माहिती प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी दिली. तर माध्यमिक विभागातील मुरबाड तालुक्यातील तळवली येथील एका शाळेचे, तसेच शहापूरमधील आणि ठाण्यातील प्रत्येकी एका शाळेचे मिळून एक लाख १७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, असे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी सांगितले. कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या तरी शाळा लवकर सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत.मात्र, शाळा सुरू होईपर्यंत नुकसानग्रस्त शाळांचे काम झाले पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, असे पालकवर्गाचे मत आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी अपेक्षा आहे.निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून ही माहिती आम्ही पुढे शिक्षण विभाग तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही पाठविली आहे.- शेषराव बडे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, ठाणे जिल्हा परिषद

टॅग्स :thaneठाणे