शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

ठाणे जिल्ह्याला निसर्ग चक्री वादळाचा चकवा: सकंट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 23:56 IST

ठाणे जिल्हयात निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारी धडकल्यानंतर पावसानेही काही प्रमाणात हजेरी लावली. नवी मुंबईपासून सुरुवात झालेल्या या वादळाने जिल्हाभर दोन ते तीन तासांची हजेरी लावली. या काळात ठाणे शहरासह भिवंडी, मुरबाड आणि शहापूर आदी भागांमध्ये ७० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली. तर १० ते १२ घरांचे नुकसान झाले. या वादळापासून बचाव होण्यासाठी खाडी तसेच नदीकिनारी असलेल्या तीन हजार लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले होते.

ठळक मुद्देजिल्हयातून तीन हजार ९० लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर ७० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली १० ते १२ घरांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एकीकडे कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकले असतांना पावसानेही जिल्हाभर हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे शहापूर, भिवंडी, मुरबाड येथील १० ते १२ घरांचे नुकसान झाले. तर ठाणे शहरासह जिल्हयात ७० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या वादळामुळे कोणतीही मोठी हानी झाली नसून जिल्हयावरचे संकट टळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.दुपारी ३ ते ५ वाजण्याच्या सुमारास या निसर्ग वादळाची नवी मुंबईतून सुरुवात झाली. नंतर कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यापासून सर्वच ठिकाणी थोडया फार प्रमाणात त्याचा आसर जाणवला. वादळी वाºयामुळं नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, शहापूर आणि अंबरनाथ या भागांमध्ये अनेक झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. पावसाचा जोर जास्त नसला तरी वाºयामुळे समुद्रकिनारी असलेल्या घरांचे पत्रे उडाल्याच्याही घटना घडल्या. कुळगाव बदलापूरात १४ ठिकाणी, अंबरनाथमध्ये १५, उल्हासनगरमध्ये १० तर भिवंडीत सहा झाडे पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. कल्याणमध्ये चिराग हॉटेल भागात पाणी भरले होते. ठाण्यातील कळवा भागातही नवशक्तीचाळीत पाणी साचले होते. शहापूरातील दरहिगाव, मुरबाडमधील सोनावडे आणि वालीवडे तसेच भिवंडीतील एका घराचेही नुकसान झाले.* खबरदारीची उपाययोजना म्हणून ठाणे जिल्हयातील ४३० ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. सर्व ग्रामविस्तार अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली होती. बुधवारी दिवसभर शहर तसेच ग्रामीण भागात दवंडी पिटवून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. ठाणे महापालिकेनेही एनडीआरफची एक टीम तैनात ठेवली होती.* शिवाय, खाडी किनारी असलेल्या मीरा भार्इंदरच्या एक हजार ७००, शहापूरच्या एक हजार ६७ अशा तीन हजार ९० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. सुदैवाने या वादळामुळं कोणतीही मोठी हानी झाली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.* निसर्ग चक्र ीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाणे जिल्हा आपत्कालीन कक्ष, तसेच ठाणे महानगरपालिका आपत्कालीन कक्ष येथे भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वादळामुळे प्रभावित झालेल्या ठिकठिकाणच्या परिस्थितीची शिंदे यांनी माहिती घेतली. स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी देखील त्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. वादळाचा प्रभाव ओसरत असून ठाणे जिल्हावासीयांनी घाबरण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.* जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय  आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तीन तर राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तीन अशी सहा पथके जिल्हयातील मीरा भार्इंदर, शहापूर आणि नवी मुंबईत तैनात केली होती.

टॅग्स :thaneठाणेcycloneचक्रीवादळ