शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

नरवीर चिमाजी अप्पा यांच्या स्मारकामुळे ऐतिहासीक वारसा जपत पर्यटनालाही चालना मिळणार - राजन विचारे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 17:25 IST

 चौक डोंगरावरील २५०० चौ. मी. जागा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात आरक्षित आहे .

मीरारोड - चौक येथील धारावी किल्ल्यावर नरवीर चिमाजी अप्पा यांचा पुतळा बसवल्या नंतर आता या भागाचे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शना नुसार सुशोभीकरण करून स्मारक विकसित केले जाईल . यामुळे ऐतिहासिक ठेवा तसेच पर्यटनाच्या दृष्टीने या परिसराचे महत्व वाढणार असल्याचे खासदार राजन विचारे यांनी परिसराच्या पाहणी दौऱ्या नंतर सांगितले . 

 चौक डोंगरावरील २५०० चौ. मी. जागा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात आरक्षित आहे . २००३ साली महासभेत सदर आरक्षण विकसित करण्याचा ठराव मंजूर झाला होता. राज्य शासनाच्या पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय, संचालनालय यांनी बुरूज, किल्ला व सदरच्या आजूबाजूच्या परिसरातील जागा विकसित करण्यासाठी सन २००४ ला पाहणी करून स्मारक उभारण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याप्रमाणे आजूबाजूच्या परिसरात बगीचा विकसित करण्यात आला. 

परंतु नरवीर चिमाजी आप्पा यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी परवानगी मिळविण्याकरिता शासनाने स्थापन केलेल्या समितीकडे २००६ मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी  हा प्रस्ताव दि. १७ मार्च २०११ रोजी शासनास सादर केला. परंतु त्यावर कार्यवाही न झाल्याने कित्येक वर्ष प्रस्ताव प्रलंबित राहिला होता. ही बाब स्थानिक शिवसेना नगरसेविका हेलन जॉर्जी गोविंद यांनी खासदार राजन विचारे यांच्या निदर्शनास आणून  दिली होती . त्यानंतर खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात बैठक आयोजित करून सुधारित प्रस्ताव पुन्हा शासनाकडे सादर करण्याची सूचना पालिकेला केली . पालिकेने प्रस्ताव सादर केल्यानंतर  १२ फेब्रुवारी २०२१ रोजी मान्यता मिळाल्याचे पत्र मीरा-भाईंदर आयुक्तांना  देण्यात आले अशी माहिती विचारे यांच्या कार्यालया कडून देण्यात आली .  

नरवीर चिमाजी आप्पा यांचा पुतळा चौक येथे बसविण्याचा प्रस्ताव विविध कारणांनी गेल्या १९ वर्षापासून अडकला होता. खा . विचारे यांच्या प्रयत्नां नंतर पुतळा  नुकताच बसविण्यात आला.  खासदार निधीतून २५ लाख रुपये  उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विचारे यांनी आमदार गीता जैन , आयुक्त दिलीप ढोले, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता दीपक खांबित, स्थानिक नगरसेवक हेलन गोविंद जॉर्जी, शर्मिला बगाजी सह पुतळा व परिसराची पाहणी केली . यावेळी जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते राजू भोईर, विधानसभा क्षेत्र प्रमुख विक्रम प्रताप सिंग, शहर प्रमुख पप्पू भिसे, लक्ष्मण जंगम, जयराम मेसे, महिला जिल्हा संघटक स्नेहल सावंत, उप जिल्हा संघटक विद्या कदम, उपशहर संघटक तेजस्विनी पाटील, माजी नगरसेवक संदीप पाटील आदी  उपस्थित होते.

स्मारकाच्या ठिकाणी जुन्या दगडांचे अवशेष आहेत त्याचे पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्याने जतन करा, संपूर्ण स्मारकाला संरक्षण देण्यात यावे. या स्मारकातुन वसईचा किल्ला समुद्रातून दिसण्यासाठी वाढलेल्या वृक्षांची छाटणी करावी. तसेच नव्याने आलेले वृक्ष यांचे पुनर्रोपण दुसरीकडे करण्यात यावे. पुतळ्याच्या देखभालीसाठी हायड्रोलिक यंत्रणा उभारून या ठिकाणी हायमास्ट व विद्युत रोषणाई करण्यात यावी आदी सूचना खा. विचारे यांनी केल्या. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर