शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

सत्ताधा-यांचा नाकर्तेपणा : दिव्यात भाजपाचे अनोखो श्राद्ध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 19:49 IST

ठाणे : दिवा शहरातील समस्यांबाबत सत्ताधारी शिवसेना उदासीन असल्याचा आरोप करत रस्त्यांच्या कामात होणा-या दिरंगाईमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक तथा दिवा प्रभाग समितीचे अध्यक्ष शैलेश पाटील यांच्या खाजगी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावरच भाजपा ने श्राद्ध घालून अनोखो आंदोलन केले. याप्रसंगी भाजपाचे दिवा सरचिटणीस रोहिदास ...

ठळक मुद्देविकासकामांतील चालढकलीविरोधात कार्यकर्त्यांनी केले मुंडणमे महिन्याच्या आत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

ठाणे : दिवा शहरातील समस्यांबाबत सत्ताधारी शिवसेना उदासीन असल्याचा आरोप करत रस्त्यांच्या कामात होणा-या दिरंगाईमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक तथा दिवा प्रभाग समितीचे अध्यक्ष शैलेश पाटील यांच्या खाजगी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावरच भाजपाने श्राद्ध घालून अनोखो आंदोलन केले. याप्रसंगी भाजपाचे दिवा सरचिटणीस रोहिदास मुंडे, अंकुश मढवी, नरेश कदम यांनी मुंडण केले.मुंब्रादेवी कॉलनी रोडसाठी सुमारे ९ कोटी रु पयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या रस्त्याचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरू झाले आहे. तीन महिने होऊनही १० टक्के काम झालेले नाही. निधी मंजूर आहे, वर्क आॅर्डर मिळाली आहे, तरी कामात वेळ काढला जात असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच, अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू असताना सत्ताधारी शिवसेना मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत मुंब्रादेवी कॉलनी येथे रस्त्याचे काम ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सुरू आहे, त्याच्या निषेधार्थ गुरुवारी भाजपा कार्यकर्त्यांनी ठामपा सत्ताधारी व प्रशासनाच्या नावाने श्राद्ध घालत मुंडण केले. याप्रसंगी कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड, अ‍ॅड. आदेश भगत, निलेश पाटील, रोशन भगत, सचिन भोईर, गणेश भगत आदी उपस्थित होते.दिवा शहरात सत्ताधा-यांची मनमानी असून नागरिकांचे हित लक्षात न घेता केवळ टेंडरसाठी कामे केली जात असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. गणेशनगर भागातील खड्डे अद्याप भरण्यात आले नाहीत, या रस्त्याच्या कामाला सुरु वात कधी करणार, असा सवाल उपस्थित करून सत्ताधारी दिव्यातील नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप रोहिदास मुंडे यांनी केला.मे महिन्याच्या आत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे कल्याण ग्रामीणचे नेते शिवाजी आव्हाड यांनी दिला आहे. दिव्यातील सर्व मुख्य रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी करा, अशी मागणी अ‍ॅड. आदेश भगत यांनी केली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेPoliticsराजकारण