शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

सत्ताधा-यांचा नाकर्तेपणा : दिव्यात भाजपाचे अनोखो श्राद्ध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 19:49 IST

ठाणे : दिवा शहरातील समस्यांबाबत सत्ताधारी शिवसेना उदासीन असल्याचा आरोप करत रस्त्यांच्या कामात होणा-या दिरंगाईमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक तथा दिवा प्रभाग समितीचे अध्यक्ष शैलेश पाटील यांच्या खाजगी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावरच भाजपा ने श्राद्ध घालून अनोखो आंदोलन केले. याप्रसंगी भाजपाचे दिवा सरचिटणीस रोहिदास ...

ठळक मुद्देविकासकामांतील चालढकलीविरोधात कार्यकर्त्यांनी केले मुंडणमे महिन्याच्या आत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

ठाणे : दिवा शहरातील समस्यांबाबत सत्ताधारी शिवसेना उदासीन असल्याचा आरोप करत रस्त्यांच्या कामात होणा-या दिरंगाईमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक तथा दिवा प्रभाग समितीचे अध्यक्ष शैलेश पाटील यांच्या खाजगी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावरच भाजपाने श्राद्ध घालून अनोखो आंदोलन केले. याप्रसंगी भाजपाचे दिवा सरचिटणीस रोहिदास मुंडे, अंकुश मढवी, नरेश कदम यांनी मुंडण केले.मुंब्रादेवी कॉलनी रोडसाठी सुमारे ९ कोटी रु पयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या रस्त्याचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरू झाले आहे. तीन महिने होऊनही १० टक्के काम झालेले नाही. निधी मंजूर आहे, वर्क आॅर्डर मिळाली आहे, तरी कामात वेळ काढला जात असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच, अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू असताना सत्ताधारी शिवसेना मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत मुंब्रादेवी कॉलनी येथे रस्त्याचे काम ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सुरू आहे, त्याच्या निषेधार्थ गुरुवारी भाजपा कार्यकर्त्यांनी ठामपा सत्ताधारी व प्रशासनाच्या नावाने श्राद्ध घालत मुंडण केले. याप्रसंगी कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड, अ‍ॅड. आदेश भगत, निलेश पाटील, रोशन भगत, सचिन भोईर, गणेश भगत आदी उपस्थित होते.दिवा शहरात सत्ताधा-यांची मनमानी असून नागरिकांचे हित लक्षात न घेता केवळ टेंडरसाठी कामे केली जात असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. गणेशनगर भागातील खड्डे अद्याप भरण्यात आले नाहीत, या रस्त्याच्या कामाला सुरु वात कधी करणार, असा सवाल उपस्थित करून सत्ताधारी दिव्यातील नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप रोहिदास मुंडे यांनी केला.मे महिन्याच्या आत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे कल्याण ग्रामीणचे नेते शिवाजी आव्हाड यांनी दिला आहे. दिव्यातील सर्व मुख्य रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी करा, अशी मागणी अ‍ॅड. आदेश भगत यांनी केली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेPoliticsराजकारण