शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

अजित पवारांची महाविकास आघाडीत गळचेपी, नरेश म्हस्के यांचा दावा

By अजित मांडके | Updated: April 18, 2023 17:04 IST

अजित पवार यांनी तुर्तास पुढील कार्यक्रमाला ब्रेक लावला आहे. मात्र ते नाराज असून त्यांच्या आजच्या बोलण्यातून ते स्पष्ट दिसून आले असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तुर्तास पुढील कार्यक्रमाला ब्रेक लावला आहे. मात्र ते नाराज असून त्यांच्या आजच्या बोलण्यातून ते स्पष्ट दिसून आले असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यांची वज्र मुठीत गळचेपी होत असून ते लवकरच आपला निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांचे आम्ही स्वागत करु आणि त्यांना मानाचे पान दिले जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज जरी अजित पवारांनी यातून माघार घेतली असली तरी ते येत्या काही दिवसात आपला निर्णय जाहीर करणार आहेत. त्यांनी आज अप्रत्यक्षपणे उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर देखील टिका केली आहे. त्यांची गळचेपी होत असल्याचे त्यांच्या समर्थक आमदारांना देखील दिसत आहे. संभाजी नगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत देखील ज्यांचे १५ आमदार आहेत, त्यांच्यासाठी वेगळी खुर्ची दिली जाते आणि सभा सुरु झाल्यानंतर त्यांची एन्ट्री होते, आणि ज्यांचे ५६ आमदार आहेत, त्यांना मात्र मानच दिला जात नाही, अशी टिका देखील त्यांनी केली. त्यामुळेच नागपुर येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी भाषण केले नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी शिवसेना, भाजप युतीला पाठींबा दिला तर त्यांचे आम्ही स्वागत करु आणि मानाचे पान त्यांना देऊ असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे राहुल गांधी मातोश्रीवर येणार यावरुन देखील त्यांनी नाराजी व्यक्त करीत उध्दव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे यांच्यावर टीका केली. बाळासाहेबांची शिवसेना संपविण्यात ज्यांचा मोठा वाटा होता, जे वारंवार स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर कशाही पध्दतीने टिका करतात, त्यांचे पाय मातोश्रीला लागणे हे कदीही न पटण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु ते आले नाहीत तर त्यांनी आपला पीए पाठविला आणि उध्दव यांनी दिल्लीला यावे तिकडेच सोनीया गांधी आणि राहुल गांधी आपल्याला भेटतील असे सांगितले आहे. त्यामुळे आता दिल्लीला जाऊन मुजरा करणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी सिल्वर ओकला गेले आता दिल्लीला जात आहेत, तुमच्यातील ठाकरी बाणा गेला कुठे असा सवाल उपस्थित करीत आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना हे बिलकुल आवडले नसते. ते होते तेव्हा अनेक दिग्गजांनी मातोश्रीवर हजेरी लावली होती. अगदी शरद पवार यांनी देखील मात्र आता ती हिम्मत गेली कुठे असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारthaneठाणेPoliticsराजकारण