शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांची महाविकास आघाडीत गळचेपी, नरेश म्हस्के यांचा दावा

By अजित मांडके | Updated: April 18, 2023 17:04 IST

अजित पवार यांनी तुर्तास पुढील कार्यक्रमाला ब्रेक लावला आहे. मात्र ते नाराज असून त्यांच्या आजच्या बोलण्यातून ते स्पष्ट दिसून आले असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तुर्तास पुढील कार्यक्रमाला ब्रेक लावला आहे. मात्र ते नाराज असून त्यांच्या आजच्या बोलण्यातून ते स्पष्ट दिसून आले असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यांची वज्र मुठीत गळचेपी होत असून ते लवकरच आपला निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांचे आम्ही स्वागत करु आणि त्यांना मानाचे पान दिले जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज जरी अजित पवारांनी यातून माघार घेतली असली तरी ते येत्या काही दिवसात आपला निर्णय जाहीर करणार आहेत. त्यांनी आज अप्रत्यक्षपणे उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर देखील टिका केली आहे. त्यांची गळचेपी होत असल्याचे त्यांच्या समर्थक आमदारांना देखील दिसत आहे. संभाजी नगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत देखील ज्यांचे १५ आमदार आहेत, त्यांच्यासाठी वेगळी खुर्ची दिली जाते आणि सभा सुरु झाल्यानंतर त्यांची एन्ट्री होते, आणि ज्यांचे ५६ आमदार आहेत, त्यांना मात्र मानच दिला जात नाही, अशी टिका देखील त्यांनी केली. त्यामुळेच नागपुर येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी भाषण केले नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी शिवसेना, भाजप युतीला पाठींबा दिला तर त्यांचे आम्ही स्वागत करु आणि मानाचे पान त्यांना देऊ असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे राहुल गांधी मातोश्रीवर येणार यावरुन देखील त्यांनी नाराजी व्यक्त करीत उध्दव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे यांच्यावर टीका केली. बाळासाहेबांची शिवसेना संपविण्यात ज्यांचा मोठा वाटा होता, जे वारंवार स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर कशाही पध्दतीने टिका करतात, त्यांचे पाय मातोश्रीला लागणे हे कदीही न पटण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु ते आले नाहीत तर त्यांनी आपला पीए पाठविला आणि उध्दव यांनी दिल्लीला यावे तिकडेच सोनीया गांधी आणि राहुल गांधी आपल्याला भेटतील असे सांगितले आहे. त्यामुळे आता दिल्लीला जाऊन मुजरा करणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी सिल्वर ओकला गेले आता दिल्लीला जात आहेत, तुमच्यातील ठाकरी बाणा गेला कुठे असा सवाल उपस्थित करीत आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना हे बिलकुल आवडले नसते. ते होते तेव्हा अनेक दिग्गजांनी मातोश्रीवर हजेरी लावली होती. अगदी शरद पवार यांनी देखील मात्र आता ती हिम्मत गेली कुठे असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारthaneठाणेPoliticsराजकारण