शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

अजित पवारांची महाविकास आघाडीत गळचेपी, नरेश म्हस्के यांचा दावा

By अजित मांडके | Updated: April 18, 2023 17:04 IST

अजित पवार यांनी तुर्तास पुढील कार्यक्रमाला ब्रेक लावला आहे. मात्र ते नाराज असून त्यांच्या आजच्या बोलण्यातून ते स्पष्ट दिसून आले असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तुर्तास पुढील कार्यक्रमाला ब्रेक लावला आहे. मात्र ते नाराज असून त्यांच्या आजच्या बोलण्यातून ते स्पष्ट दिसून आले असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यांची वज्र मुठीत गळचेपी होत असून ते लवकरच आपला निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांचे आम्ही स्वागत करु आणि त्यांना मानाचे पान दिले जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज जरी अजित पवारांनी यातून माघार घेतली असली तरी ते येत्या काही दिवसात आपला निर्णय जाहीर करणार आहेत. त्यांनी आज अप्रत्यक्षपणे उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर देखील टिका केली आहे. त्यांची गळचेपी होत असल्याचे त्यांच्या समर्थक आमदारांना देखील दिसत आहे. संभाजी नगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत देखील ज्यांचे १५ आमदार आहेत, त्यांच्यासाठी वेगळी खुर्ची दिली जाते आणि सभा सुरु झाल्यानंतर त्यांची एन्ट्री होते, आणि ज्यांचे ५६ आमदार आहेत, त्यांना मात्र मानच दिला जात नाही, अशी टिका देखील त्यांनी केली. त्यामुळेच नागपुर येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी भाषण केले नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी शिवसेना, भाजप युतीला पाठींबा दिला तर त्यांचे आम्ही स्वागत करु आणि मानाचे पान त्यांना देऊ असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे राहुल गांधी मातोश्रीवर येणार यावरुन देखील त्यांनी नाराजी व्यक्त करीत उध्दव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे यांच्यावर टीका केली. बाळासाहेबांची शिवसेना संपविण्यात ज्यांचा मोठा वाटा होता, जे वारंवार स्वातंत्रवीर सावरकर यांच्यावर कशाही पध्दतीने टिका करतात, त्यांचे पाय मातोश्रीला लागणे हे कदीही न पटण्यासारखे असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु ते आले नाहीत तर त्यांनी आपला पीए पाठविला आणि उध्दव यांनी दिल्लीला यावे तिकडेच सोनीया गांधी आणि राहुल गांधी आपल्याला भेटतील असे सांगितले आहे. त्यामुळे आता दिल्लीला जाऊन मुजरा करणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी सिल्वर ओकला गेले आता दिल्लीला जात आहेत, तुमच्यातील ठाकरी बाणा गेला कुठे असा सवाल उपस्थित करीत आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना हे बिलकुल आवडले नसते. ते होते तेव्हा अनेक दिग्गजांनी मातोश्रीवर हजेरी लावली होती. अगदी शरद पवार यांनी देखील मात्र आता ती हिम्मत गेली कुठे असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारthaneठाणेPoliticsराजकारण