शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-योगी आदित्यनाथांकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचेच कार्य; भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 20:14 IST

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी मांडलेल्या हिंदूत्वाच्या विचारांवरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना हिंदूत्वाची शक्ती मिळाली.

ठाणे: 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी मांडलेल्या हिंदूत्वाच्या विचारांवरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना हिंदूत्वाची शक्ती मिळाली. सावरकरांचे हिंदूत्व व भाजपाचे हिंदूत्व यात काहीही फरक नसून, स्वातंत्र्यवीर सावरकरांचेच कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करीत आहेत, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांनी शनिवारी येथे केले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ठाणे शहर भाजपातर्फे गडकरी रंगायतनमध्ये भाजपाचे देवधर यांचे 'सावरकरांचा राजकीय संघर्ष' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, भारत विचार दर्शनचे अध्यक्ष सुश्रुत चितळे, भाजपाचे प्रदेश सचिव संदिप लेले, भाजपाच्या सांस्कृतिक प्रकोष्टचे आकाश राऊत आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

१९४२ मध्ये राजकारणाचे हिंदूकरण झाले पाहिजे. हिंदूंनी राजकीयदृष्ट्या मते दिली पाहिजेत, असा विचार सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मांडला होता. या विचाराला ८० वर्ष पूर्ण झाल्याने, राजकारणाच्या हिंदूकरणाला उत्तर प्रदेशातून खरी सुरूवात झाली. केंद्र सरकारला निर्णय घेताना काही वेळा मर्यादा येतात. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत ३७० कलम हटविता आले नव्हते. आता राम मंदिर, ३७०, सीएए, ट्रिपल तलाक अशी मालिकाच सुरू झाली. मात्र, ती कोविडमुळे थांबली, असेही देवधर म्हणाले.

एक दिवस नक्कीच सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयात सावरकरांचे फोटो लागतील, असा विश्वास देवधर यांनी व्यक्त केला. सावरकरांनी राष्ट्रप्रेम काय असते, ते जगाला दाखवून दिले. त्यांच्या कार्यातून पुढील अनेक दशके तरुण पिढीला प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन आमदार निरंजन डावखरे यांनी केले. ठाणे व सावरकर यांचे अतूट नाते असल्याचे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले.

`हिंदूत्वाच्या पाठीत शिवसेनेनेच खंजीर खुपसला'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांतून हिंदूंमध्ये जागृती झाली होती, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे. भाजपा कधीही शिवसेनेकडे युतीसाठी गेला नव्हता. शिवसेनेने हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे कार्य केले. शरद पवारांसारख्या व्यक्ती समोरून संघर्ष करतात. परंतु, शिवसेनेने पाठीमागून वार करीत हिंदुत्वाबरोबरच महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांना हिंदुत्वावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असे परखड मत देवधर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदी