शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

केमिकल टाकणाऱ्याचे नाव सांगा, लाखाचे बक्षीस मिळवा; यंत्रणा अपयशी ठरल्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 07:00 IST

वालधुनी नदी प्रदूषित

- सदानंद नाईकउल्हासनगर : शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीपात्रात केमिकल टाकले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीपात्रात केमिकल टाकणाऱ्यांची नावे सांगणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस स्थानिक नगरसेवक टोनी सिरवानी यांनी जाहीर केले आहे. तसेच प्रदूषण मंडळ, पोलीस प्रशासन व महापालिका अपयशी ठरल्याची टीका यावेळी सिरवानी यांच्यासह इतर नगरसेवकांनी केली.

वालधुनी नदी शहराला वरदान ठरण्याऐवजी शाप ठरली आहे. नदीपात्रात अंबरनाथ केमिकल झोन परिसरातील कारखाने विषारी द्रव्य नदीत सोडत असल्याने नदीचे पाणी दर पाच मिनिटाने रंग बदलते. हे कमी म्हणून की काय टँकरमधून आणलेले घातक केमिकल नदीपात्रात टाकत असल्याने पाण्याला उग्र दर्प येतो. यामुळे नागरिकांना उलट्या होणे, चक्कर येणे, डोके दुखणे, अंगाला खाज सुटणे असे त्रास होतात. 

बुधवारी रात्री नदीच्या पाण्याचा उग्र दर्प येत असल्याने नागरिकांनी स्थानिक नगरसेवक सिरवानी, गजानन शेळके, कविता पंजाबी यांच्याकडे धाव घेतली. या प्रकाराची माहिती पोलिसांसह महापालिका व प्रदूषण मंडळाला दिल्यावरही कुठलीही कारवाई झाली नसल्याची माहिती सिरवानी यांनी दिली. 

या नगरसेवकांनी गुरुवारी नागरिकांची बैठक घेतली. नदीपात्रात केमिकल टाकणाऱ्यांची माहिती जो देईल, त्याला एक लाख रुपये बक्षीस देण्याचे जाहीर केले. यापूर्वी असाच प्रकार झाल्यावर नागरिकांना विषारी वायूची बाधा होऊन रुग्णालयात दाखल केले होते. तसेच काही महिन्यांपूर्वी नदीपात्रातून उग्र दर्प येत असल्याने स्थानिक नगरसेवक, प्रदूषण मंडळाचे अधिकारी, पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन नदीकिनारी रात्रभर गस्त घातली होती. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर