शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

नगरसेविकेचेच नाव मतदारयादीतून वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 01:06 IST

अंबरनाथमधील प्रकार : तहसीलदारांकडे केली तक्रार, दोषींवर कारवाईची मागणी

अंबरनाथ : लोकसभा निवडणुकीत मतदारयादीतील घोळामुळे अनेकांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले होते. मतदारयादी निश्चित करण्याआधी जी प्रारूप यादी तयार करण्यात येते, त्यात नाव असतानाही ऐन निवडणुकीच्यावेळी मतदारयादीतून स्थानिक नगरसेविकेचेच नाव वगळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या नगरसेविकेने तहसीलदारांकडे याप्रकरणी तक्रार केली आहे.

चिखलोली भागातील नगरसेविका सारिका शिंगवे यांचे नाव त्यांच्या ३०३ क्रमांकाच्या मतदारयादीत समाविष्ट होते. मतदारयादीतील नाव हे जानेवारी २०१९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदारयादीतही होते. त्यामुळे त्या निश्चिंत होत्या. मात्र, निवडणुकीच्या दिवशी मतदानासाठी जाण्याआधी त्यांनी यादीतील नाव शोधण्याचा प्रयत्न केला असता शिंगवे आणि त्यांचे पती रामदास या दोघांची नावे वगळण्यात आली होती. ते ज्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी नाव नसल्याने त्यांनी अ‍ॅपवरून त्यांचे नाव शोधले असता थेट उल्हासनगर कुर्ला कॅम्प परिसरात असल्याचे लक्षात आले. चिखलोली गावातील नाव थेट उल्हासनगरच्या यादीत गेल्याने त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले.

लोकसभा निवडणूक असल्याने त्यांनी उल्हासनगरमध्ये जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, भविष्यात ही चूक पुन्हा झाल्यास त्यांना नगरसेवकपदाच्या निवडणुकीला मुकण्याची वेळ आली असती. यासंदर्भात शिंगवे यांनी तहसीलदार कार्यालयात चौकशी केली असता बीएलओने त्यांचे नाव न वगळण्याचा अहवाल दिला होता. मात्र, असे असतानाही त्यांचे नाव स्थलांतरित करण्यात आले.याप्रकरणी शिंगवे यांनी चौकशी करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नगरसेविकेच्या बाबतीत हा प्रकार घडल्याने सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल, अशी प्रतिक्रिया शिंगवे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मतदानाच्या दिवशीही अनेकांची नावे वगळल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदान