शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

नाल्यातच बेकायदा बांधकामे, पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 05:28 IST

पालिकेचे दुर्लक्ष : अंबरनाथ पोलीस ठाण्यासमोरील प्रकार, प्रवाहाचा मार्ग झाला अरुंद

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या मुख्य नाल्याचा प्रवाह बेकायदा बांधकामांनी अरुंद केला आहे. त्यातच, नव्याने अनेक बांधकामे नाल्यातच केली जात आहेत. अंबरनाथ पोलीस ठाण्यासमोरच असलेल्या दुकानदारांनी मागच्या नाल्यातच बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासन विलंब लावत आहे.

अंबरनाथ, कल्याण-बदलापूर रोडला अंबरनाथमध्ये समांतर असा नाला वाहत आहे. पूर्वी या नाल्याची रुंदी ही ६० फुटांपेक्षा अधिक होती. मात्र, या मुख्य नाल्याच्या किनाºयावरच मोठी बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. या बांधकामांवर कारवाई न झाल्याने नाल्याचा प्रवाह ६० फुटांवरून अवघ्या १० ते २० फुटांवर आला आहे. अनेक बेकायदा बांधकामे थेट नाल्यात अतिक्रमण करून उभी राहत असल्याने मुख्य नाल्याच्या प्रवाहाला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यासाठी नाल्याचा प्रवाह अरुंद पडत असल्याने अनेक सखल भागात पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. विम्कोनाका ते अंबरनाथ तहसीलदार कार्यालयापर्यंतच्या नाल्याचाच विचार केला, तर अनेक दुकाने आणि बांधकामे थेट नाल्याच्या प्रवाहात केल्याचे उघड होत आहे. एमआयडीसीमधील कंपन्यांनीही थेट नाल्याचा प्रवाह बदलून आपल्या कंपन्या उभ्या केल्या आहेत. नाल्याचा प्रवाह अरुंद होत असल्याची कल्पना पालिका प्रशासनाला असतानाही पालिकेचे अधिकारी या बांधकामांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नाल्यातील अतिक्रमण वाढतच आहे. या वाढत्या अतिक्रमणांबाबत पालिकेने नाल्याच्या किनाºयावर असलेल्या सर्व बेकायदा बांधकामांना नोटीस बजावणे गरजेचे आहे. मात्र, नोटीस तर दूरच राहिली, उलट नव्याने होणारी बांधकामेही पालिका प्रशासन रोखत नाही. अंबरनाथ पोलीस ठाण्यासमोरील दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या मागच्या भागात असलेल्या नाल्यातच बांधकामे सुरू केली आहेत.एका दुकानदाराने तर नाल्यात थेट आरसीसी बांधकाम करून नाल्याच्या प्रवाहातच दुकानाचे वाढीव बांधकाम केले आहे. गेल्या महिनाभरापासून बांधकामे सुरू असतानाही पालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. हीच परिस्थिती विम्कोनाक्याला लागून असलेल्या कंपन्यांचीही झाली आहे. या कंपन्यांनीही नाल्याची रुंदी कमी करून बांधकामे सुरू केली आहे.नाल्यात कोणतेही बांधकाम सुरू असेल, तर त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. नाल्याचा प्रवाह रोखण्याचा आणि त्यावर अतिक्रमण करण्याचा कुणाचाही अधिकार नाही.- देविदास पवार, मुख्याधिकारीकंपन्यांवर कारवाई नाहीच्नाल्याचा प्रवाह बदलल्यानंतर या संदर्भात अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. मात्र त्या तक्रारींची कोणतीच दखल पालिकेने घेतली नाही.कंपनी मालकाने थेट नाल्याचा प्रवाह बदलला.च्अंबरनाथमधील कल्याण-बदलापूर रस्त्याचे रूंदीकरण झाल्यावर दुकाने तुटलेल्या मालकांनी थेट मागच्या बाजूला नाल्यात अतिक्रमण करून आपली दुकाने थाटलेली आहेत.