शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

नालेसफाईचे पितळ पडले उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:45 IST

पहिल्याच पावसात दुकाने, घरांमध्ये पाणी : शिवसेना पदाधिकाऱ्याचा ‘चिखलफेक’चा इशारा

कल्याण : मान्सूनपूर्व सरींनी सोमवारी कल्याण-डोंबिवलीत अर्धा तास हजेरी लावली. पावसाच्या नुसत्या हजेरीने केडीएमसी हद्दीतील नालेसफाईची पोलखोल केली असून ही कामे योग्य प्रकारे झाली नसल्याच्या विरोधकांच्या आरोपावर शिक्कामोर्तब झाले. काठावर ठेवलेला कचरा पुन्हा नाल्यात गेल्याने खर्च पाण्यात गेला. काही दुकाने आणि घरांमध्ये आणि महापालिकेच्या मुख्यालयाच्या आवारात पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले होते. यामुळे संतप्त झालेले शिवसेनेचे कल्याण विधानसभा क्षेत्र संघटक आणि माजी नगरसेवक अरविंद मोरे यांनी महापालिकेच्या विरोधात चिखलफेक आंदोलनाचा इशारा देऊ न सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे.

नालेसफाईच्या कामांसाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये मंजूर केले आहेत. मात्र, अर्धा तास पडलेल्या पावसामुळे कल्याण-डोंबिवलीत ठिकठिकाणी पाणी साचले. शिवाजी चौक, भूमिगत गटार ओव्हरफ्लो झाल्याने महापालिका मुख्यालय परिसरात पाणी भरले. तसेच कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील रमाबाई आंबेडकरनगरमध्ये सात घरात पाणी शिरले. या ठिकाणी एका बिल्डरने चुकीच्या पद्धतीने केलेल्या बांधकामामुळे नाल्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याची तक्रार नागरिकांची आहे. दुपारपर्यंत या घरांमध्ये पावसाचे पाणी तसेच साचून होते. कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरातील चिकणीपाडातील हरिश्चंद्र यादव आणि उदय गायकवाड यांच्या चाळीत पाणी शिरले होते.रामबाग, शिवाजी चौक, बाजारपेठ, नारायण पेठ, ओक बाग, आंबेडकरनगर, सुभाष मैदान, कामगार वसाहत याठिकाणी पहिल्याच पावसात पाणी साचले. तसेच कल्याण परिसरात पहिल्या पावसात उच्च दाबाची वीजवाहिनी असलेल्या नऊ पोल व कमी दाबाची वीजवाहिनी असलेले सात वीजखांब कोसळले. एका डीपीचेही नुकसान झाले असून कल्याणच्या काही परिसरात बत्ती गुल झाली होती.महापालिका नालेसफाईचे काम देते; मात्र कंत्राटदार हे काम योग्य प्रकारे करतो की नाही यावर महापालिकेचे काहीच नियंत्रण नसते. कंत्राटदाराला पाठीशी घालणाºया अधिकाºयांना निलंबित न केल्यास चिखलफेक आंदोलन केले जाईल, असा इशारा आयुक्तांना मोरे यांनी दिला आहे.गाळ पुन्हा नाल्यातकोपर रेल्वे स्थानकाजवळील नाल्यात कचरा, गाळ व प्लास्टीक पिशव्यांचा खच पडलेला असतो. तो स्वच्छ केला जात नसल्याच्या निषेधार्थ मनसेने कोपर नाल्यास ‘महापौर नाला’ असे नाव दिले होते. मनसेच्या या आंदोलनानंतर महापालिकेने तो साफ केला.मात्र, नाल्यातून काढलेला कचरा, गाळ व प्लास्टीकचा खच नाल्याच्या शेजारीच रचून ठेवला होता. सोमवारी झालेल्या पावसात नाल्यातून काढलेला कचरा, गाळ, प्लास्टीकचा खच पुन्हा नाल्यात गेला आहे, याकडे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी लक्ष वेधले आहे.टिटवाळा परिसरात पावसाची हजेरीटिटवाळा : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग, टिटवाळा शहरात मंगळवारीही पावसाने हजेरी लावली. दुपारी ३.३० वाजल्यानंतर वाºयासह पाऊस बरसला. यावेळी बच्चे कंपनीने पावसात भिजण्याचा आनंद लुटला.टिटवाळा परिसरात सोमवारी सायंकाळी पाऊस झाला. त्यामुळे मंगळवारी वातावरणात उष्मा जाणवत होता. दुपारी ३ च्या सुमारास आभाळ भरून आले आणि सर्वत्र आंधार पसरला. सोसाट्याच्या वाºयासह पावसाला सुरुवात झाली.तासाभर बरसल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यात मुलांनी भिजत धम्माल केली. पावसाच्या हजेरीमुळे बळीराजा सुखावला आहे. पाऊस असाच रोज पडला तर येत्या आठवड्यात भातशेतीच्या पेरणीला सुरुवात होईल, असे फळेगाव येथील शेतकरी कृष्णा जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे