शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

'मराठीचा अभिमान रोजच बाळगला पाहिजे!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:57 IST

इंग्रजी माध्यमातून मुले शिक्षण घेत असल्यामुळे त्यांचे मराठी अवांतर वाचन वाढवण्याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. - रत्नाकर मतकरी

मराठी भाषा गौरव दिन गुरुवारी, २७ फेब्रुवारीला सर्वत्र साजरा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध नाटककार आणि लेखक रत्नाकर मतकरी यांच्याशी साधलेला संवाद...मराठी भाषा दिन कसा साजरा करावा? याबद्दल काय वाटते?मराठी भाषेचे प्रेम हे आपल्याला कायमच वाटत असते. त्यामुळे विशेष दिनाच्या निमित्ताने अचानक एक दिवस आपला अभिमान जागा व्हावा आणि इतर दिवशी आपल्याला मराठीचा विसर पडावा, असे असू नये. आपण रोजच आपल्या भाषेचा किंवा संस्कृतीचा अभिमान बाळगला पाहिजे. दुसरीकडे हाही विचार मनात येतो की, सध्याच्या बदलत्या युगात निदान त्या दिवसाच्या निमित्ताने का होईना एरव्ही पूर्णपणे दुर्लक्षित झालेल्या लोकांना भाषेची, संस्कृतीची आठवण होते, असेही असेल. पण, हे दिवस साजरे करण्यापेक्षा त्यामागची जी भावना आहे, ती महत्त्वाची आहे. ती वर्षभर जोपासली पाहिजे.आता सकस लिखाण होतेय का?आमच्या काळातील लिखाणात सकसता होती, कारण लिखाणाचा आनंद घेण्यावर जास्त भर होता आणि इतर महत्त्वाकांक्षा कमी होत्या. आताही लिहिण्याचे कौशल्य नक्कीच आहे, पण खूप ठिकाणी ते विभागले जातेय. म्हणजे लिहिणाऱ्याला असेही वाटते की, साधी कथा लिहून मासिकात येण्यापेक्षा जर एखादी मालिका लिहिली किंवा वेबसिरीज लिहिली, तर त्यातून जास्त पैसे मिळतील. एखादा सिनेमा लिहिला तर अधिक नाव होईल. तर, या सगळ्यांत त्यांचे कौशल्य थोडे विभागले जातेय.शाळेत वाचन कमी झाले आहे?मुलांना इंग्रजी माध्यमात घातल्यामुळे त्यांचा मराठीचा सराव सुटला आहे. परिणामी, मराठी वाचन कमी झालेय. आमच्या नातवंडांना किंवा आमच्याकडे नाटकात जी मुले येतात, त्यांना बोललेले किंवा वाचून दाखवलेले मराठी समजते, पण स्वत: वाचायला कष्ट पडतात. मग, भाषेच्या संवर्धनासाठी इतर प्रयत्न केले जातात. शाळेत रोजच्या तासात जे वाचले जाते, त्याचा अधिक परिणाम होतो.आज महागाई वाढल्याने कलाकारांनी आपली आर्थिक जबाबदारी वाढवून घेतली आहे. परिणामी, पूर्वीच्या कलावंतांचा जो साधेपणा होता, तो टिकवून ठेवणे कुठेतरी परवडत नाहीये. त्यामुळे कौशल्य असूनही अर्थार्जनाकडे जास्त लक्ष द्यावे लागत आहे.सांस्कृतिक कार्यक्रम कसे असावेत?सध्या कार्यक्र मांतून अभिवाचन व्हायला लागले आहे, जेणेकरून जुने, उत्तम साहित्य प्रेक्षकांपर्यंत, नव्या पिढीपर्यंत पोहोचतेय, पण अजून त्याला योग्य स्वरूप आलेले नाही. ज्यांना करावेसे वाटते, ते कलाकार अभिवाचन करतात. कारण, यात किती व्यक्तींना रस असेल किंवा यातून किती अर्थार्जन होईल, याची शाश्वती नाही. म्हणजे, जो आपल्या इतर कार्यक्रमांवर खर्च केला जातो, तसा खर्च अभिवाचन कार्यक्र मांवर केला जात नाही, जो खरे म्हणजे केला पाहिजे.