शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
3
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
4
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
5
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
6
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
7
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
8
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
9
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
10
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
11
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
12
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
13
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
14
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
15
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
16
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
17
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
18
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी

'मराठीचा अभिमान रोजच बाळगला पाहिजे!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:57 IST

इंग्रजी माध्यमातून मुले शिक्षण घेत असल्यामुळे त्यांचे मराठी अवांतर वाचन वाढवण्याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. - रत्नाकर मतकरी

मराठी भाषा गौरव दिन गुरुवारी, २७ फेब्रुवारीला सर्वत्र साजरा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध नाटककार आणि लेखक रत्नाकर मतकरी यांच्याशी साधलेला संवाद...मराठी भाषा दिन कसा साजरा करावा? याबद्दल काय वाटते?मराठी भाषेचे प्रेम हे आपल्याला कायमच वाटत असते. त्यामुळे विशेष दिनाच्या निमित्ताने अचानक एक दिवस आपला अभिमान जागा व्हावा आणि इतर दिवशी आपल्याला मराठीचा विसर पडावा, असे असू नये. आपण रोजच आपल्या भाषेचा किंवा संस्कृतीचा अभिमान बाळगला पाहिजे. दुसरीकडे हाही विचार मनात येतो की, सध्याच्या बदलत्या युगात निदान त्या दिवसाच्या निमित्ताने का होईना एरव्ही पूर्णपणे दुर्लक्षित झालेल्या लोकांना भाषेची, संस्कृतीची आठवण होते, असेही असेल. पण, हे दिवस साजरे करण्यापेक्षा त्यामागची जी भावना आहे, ती महत्त्वाची आहे. ती वर्षभर जोपासली पाहिजे.आता सकस लिखाण होतेय का?आमच्या काळातील लिखाणात सकसता होती, कारण लिखाणाचा आनंद घेण्यावर जास्त भर होता आणि इतर महत्त्वाकांक्षा कमी होत्या. आताही लिहिण्याचे कौशल्य नक्कीच आहे, पण खूप ठिकाणी ते विभागले जातेय. म्हणजे लिहिणाऱ्याला असेही वाटते की, साधी कथा लिहून मासिकात येण्यापेक्षा जर एखादी मालिका लिहिली किंवा वेबसिरीज लिहिली, तर त्यातून जास्त पैसे मिळतील. एखादा सिनेमा लिहिला तर अधिक नाव होईल. तर, या सगळ्यांत त्यांचे कौशल्य थोडे विभागले जातेय.शाळेत वाचन कमी झाले आहे?मुलांना इंग्रजी माध्यमात घातल्यामुळे त्यांचा मराठीचा सराव सुटला आहे. परिणामी, मराठी वाचन कमी झालेय. आमच्या नातवंडांना किंवा आमच्याकडे नाटकात जी मुले येतात, त्यांना बोललेले किंवा वाचून दाखवलेले मराठी समजते, पण स्वत: वाचायला कष्ट पडतात. मग, भाषेच्या संवर्धनासाठी इतर प्रयत्न केले जातात. शाळेत रोजच्या तासात जे वाचले जाते, त्याचा अधिक परिणाम होतो.आज महागाई वाढल्याने कलाकारांनी आपली आर्थिक जबाबदारी वाढवून घेतली आहे. परिणामी, पूर्वीच्या कलावंतांचा जो साधेपणा होता, तो टिकवून ठेवणे कुठेतरी परवडत नाहीये. त्यामुळे कौशल्य असूनही अर्थार्जनाकडे जास्त लक्ष द्यावे लागत आहे.सांस्कृतिक कार्यक्रम कसे असावेत?सध्या कार्यक्र मांतून अभिवाचन व्हायला लागले आहे, जेणेकरून जुने, उत्तम साहित्य प्रेक्षकांपर्यंत, नव्या पिढीपर्यंत पोहोचतेय, पण अजून त्याला योग्य स्वरूप आलेले नाही. ज्यांना करावेसे वाटते, ते कलाकार अभिवाचन करतात. कारण, यात किती व्यक्तींना रस असेल किंवा यातून किती अर्थार्जन होईल, याची शाश्वती नाही. म्हणजे, जो आपल्या इतर कार्यक्रमांवर खर्च केला जातो, तसा खर्च अभिवाचन कार्यक्र मांवर केला जात नाही, जो खरे म्हणजे केला पाहिजे.