शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"देशातील मुस्लिम स्वातंत्र्यवीर खरे देशप्रेमी, त्यांनी कधीच ब्रिटिशांसमोर माफी मागितली नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 23:39 IST

देशातील मुस्लिम स्वातंत्रवीर खरे देशप्रेमी होते त्यांनी कधी ब्रिटिशांसमोर माफी मागितली नाही असे विधान एमआयएम पक्षप्रमुख असउद्दीन ओवेसी यांनी करत भाजपच्या हिंदुत्ववादी देशप्रेमावर निशाणा साधला

नितिन पंडीत

भिवंडी : 

देशातील मुस्लिम स्वातंत्रवीर खरे देशप्रेमी होते त्यांनी कधी ब्रिटिशांसमोर माफी मागितली नाही असे विधान एमआयएम पक्षप्रमुख असउद्दीन ओवेसी यांनी करत भाजपच्या हिंदुत्ववादी देशप्रेमावर निशाणा साधला, ओवेसी शनिवारी भिवंडीतील धोबी तलाव येथील टावरे स्टेडियमवर आयोजित जाहीर सभेत बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील ,माजी आमदार वारीस पठाण ,शहर सरचिटणीस अँड अमोल कांबळे यांसह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

एमआयएम भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू शेख यांना दीड वर्षां पासून अटक झाली असल्याने पक्ष संघटनेला बळ देण्यासाठी कै परशराम टावरे क्रीडासंकुल येथे ओवेसी यांची सभा आयोजित केली होती. यावेळी ओवेसी यांनी भाजपा आरएसएस सह शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर सडकून टीका करताना देशातील मुस्लिमांचा संबंध मुगलां सोबत नव्हता देशात ६५ हजार वर्षात विविध देशातून पिढी येत गेली त्यामुळे हा देश हिंदू मुस्लिम यांचा नसून द्रवेडियन व आदिवासी या मूळ लोकांचा आहे असे सांगत. 

शरद पवार प्रधानमंत्री यांची भेट घेऊन संजय राऊत यांना अटक करू नये अशी विनवणी करतात पण त्यांच्या पक्षातील नवाब मलिक यांच्या साठी प्रयत्न करीत नाहीत कारण ते मुस्लिम आहे म्हणून का? असा सवाल करीत भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांचे राजकीय प्रस्थ वाढत असताना त्यांना राजकारणात थोपवता येत नसल्याने त्यांच्यावर खोट्या केस दाखल करून तुरुंगात टाकले आहे .त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी मुख्यमंत्री यांना विनंती केली आहे.

या सभेदरम्यान भाजपा आरएसएस यांचा खरपूस समाचार घेताना देशात महागाई बेरोजगारीची समस्या भस्मासुरा सारखी वाढली असताना मोदी सरकार मंदिर मशीद वादामध्ये अडकवून ठेवत आहे असे सांगत मुगल काळा आधी सुध्दा या देशात अनेक मंदिर बौद्धविहार तोडली गेली होती याची आठवण करून देत ताजमहाल लालकिल्ला मशीद येथे सुध्दा खोदकाम करण्याची मागणी होते हे खर आहे मात्र हे खोदकाम करून भाजपा आरएसएस हे नरेंद्र मोदी यांची शैक्षणिक पात्रतेची डिग्री शोधत असल्याची उपरोधिक टीका ओवेसी यांनी केली. तर भाजप सत्तेचा आठवा वर्धापन दिन साजरा करत आहे मात्र या आठ वर्षात महागाई , बेरोजगारी, इंधन दरवाढ यासह विकासाच्या मुद्यावर भाजप बोलत नाही भाजप फक्त कलम ३७०, बाबरी मशीद , राम मंदिर, भोंगे , अजान , नकाब याच मुद्यावर बोलून देशात हिंदू मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत असेही ओवेसी यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन