शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

मुलाचा खून करून संगीत शिक्षकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:01 IST

एकीकडे लाखो रुपयांचे कर्ज, त्यात पत्नीनेही साथ सोडली. त्यामुळे पत्नीच्या विरहातून ठाण्यातील संगीत शिक्षक शोमीक बिजोय घोष (३९) याने मुलगा एकाक्ष याचा खून करून नंतर

ठाणे : एकीकडे लाखो रुपयांचे कर्ज, त्यात पत्नीनेही साथ सोडली. त्यामुळे पत्नीच्या विरहातून ठाण्यातील संगीत शिक्षक शोमीक बिजोय घोष (३९) याने मुलगा एकाक्ष याचा खून करून नंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना कासारवडवली येथे बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी गुरुवारी सकाळी खून आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे.घोष यांनी बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांचे कारचालक प्रवीण चव्हाण (रा. पातलीपाडा, ठाणे) यांना काही कामानिमित्त एका वकिलाला घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे चव्हाण वकिलाला घेऊन कासारवडवलीतील ‘विजय एनक्लेव्ह’ येथे दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पोहोचले. तेव्हा घराचा दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या आणि पोलिसांच्या मदतीने त्यांनी दरवाजा तोडून घरात शिरकाव केला. त्यावेळी शोमीक हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. तर, मुलगा एकाक्ष हाही बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले आणि निरीक्षक नासीर कुलकर्णी यांनी घरात झडती घेतली, तेव्हा पत्नी सोडून गेल्यामुळे आपण आत्महत्या करत आहे, अशा आशयाच्या त्याने चार वेगवेगळ्या चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. त्यातील एक पत्नी, दुसरी पोलिसांच्या नावाने, तर उर्वरित दोन घरमालकाच्या नावाने आहेत. चारही चिठ्ठ्यांमध्ये जवळपास सारखाच मजकूर आहे. कर्जबाजारी असला तरी त्याबाबतचा फारसा उल्लेख नाही. पण, पत्नीला उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये तिच्याकडून घेतलेल्या पैशांचा उल्लेख असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढोले यांनी सांगितले.खोटारडेपणाला कंटाळून विभक्त१शोमीकने २०१७ मध्ये दिया या तरुणीशी दुसरे लग्न केले. तिच्याकडून त्याने लग्नाआधीच ४० लाख आणि नंतर २० लाख असे ६० लाख रुपये वेगवेगळ्या कारणांनी घेतले होते.२इमारतीमधील वाहने धुणाºया एका व्यक्तीकडून ५० हजार रुपये, तर मुंबईतील सिंग या व्यक्तीकडूनही त्याने २५ लाख रुपये घेतले होते. अशा अनेक लोकांकडून त्याने एक ते दोन कोटींपेक्षा अधिक रक्कम कर्जाऊ घेतलेली असल्यामुळे अनेकांनी त्यांच्याकडे पैशांचा तगादा लावला होता.३या प्रत्येकाला तो वेगवेगळी कारणे देऊन चकवा देत होता. त्याचे आईवडील कोलकाता येथे जिवंत असतानाही त्याने ते मृत पावल्याचे पत्नी दियाला सांगितले होते. परंतु, पत्नी या त्याच्या खोटारडेपणाला कंटाळली होती. घरीही कर्जवसुली करणाºयांच्या चकरा वाढल्या होत्या. या सर्वच प्रकाराला आणि त्याच्या खोटारडेपणाला कंटाळून दिया तीन महिन्यांपूर्वीच त्याला सोडून निघून गेली होती.