शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

मुलाचा खून करून संगीत शिक्षकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:01 IST

एकीकडे लाखो रुपयांचे कर्ज, त्यात पत्नीनेही साथ सोडली. त्यामुळे पत्नीच्या विरहातून ठाण्यातील संगीत शिक्षक शोमीक बिजोय घोष (३९) याने मुलगा एकाक्ष याचा खून करून नंतर

ठाणे : एकीकडे लाखो रुपयांचे कर्ज, त्यात पत्नीनेही साथ सोडली. त्यामुळे पत्नीच्या विरहातून ठाण्यातील संगीत शिक्षक शोमीक बिजोय घोष (३९) याने मुलगा एकाक्ष याचा खून करून नंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना कासारवडवली येथे बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी गुरुवारी सकाळी खून आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे.घोष यांनी बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांचे कारचालक प्रवीण चव्हाण (रा. पातलीपाडा, ठाणे) यांना काही कामानिमित्त एका वकिलाला घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे चव्हाण वकिलाला घेऊन कासारवडवलीतील ‘विजय एनक्लेव्ह’ येथे दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पोहोचले. तेव्हा घराचा दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या आणि पोलिसांच्या मदतीने त्यांनी दरवाजा तोडून घरात शिरकाव केला. त्यावेळी शोमीक हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. तर, मुलगा एकाक्ष हाही बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले आणि निरीक्षक नासीर कुलकर्णी यांनी घरात झडती घेतली, तेव्हा पत्नी सोडून गेल्यामुळे आपण आत्महत्या करत आहे, अशा आशयाच्या त्याने चार वेगवेगळ्या चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. त्यातील एक पत्नी, दुसरी पोलिसांच्या नावाने, तर उर्वरित दोन घरमालकाच्या नावाने आहेत. चारही चिठ्ठ्यांमध्ये जवळपास सारखाच मजकूर आहे. कर्जबाजारी असला तरी त्याबाबतचा फारसा उल्लेख नाही. पण, पत्नीला उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये तिच्याकडून घेतलेल्या पैशांचा उल्लेख असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढोले यांनी सांगितले.खोटारडेपणाला कंटाळून विभक्त१शोमीकने २०१७ मध्ये दिया या तरुणीशी दुसरे लग्न केले. तिच्याकडून त्याने लग्नाआधीच ४० लाख आणि नंतर २० लाख असे ६० लाख रुपये वेगवेगळ्या कारणांनी घेतले होते.२इमारतीमधील वाहने धुणाºया एका व्यक्तीकडून ५० हजार रुपये, तर मुंबईतील सिंग या व्यक्तीकडूनही त्याने २५ लाख रुपये घेतले होते. अशा अनेक लोकांकडून त्याने एक ते दोन कोटींपेक्षा अधिक रक्कम कर्जाऊ घेतलेली असल्यामुळे अनेकांनी त्यांच्याकडे पैशांचा तगादा लावला होता.३या प्रत्येकाला तो वेगवेगळी कारणे देऊन चकवा देत होता. त्याचे आईवडील कोलकाता येथे जिवंत असतानाही त्याने ते मृत पावल्याचे पत्नी दियाला सांगितले होते. परंतु, पत्नी या त्याच्या खोटारडेपणाला कंटाळली होती. घरीही कर्जवसुली करणाºयांच्या चकरा वाढल्या होत्या. या सर्वच प्रकाराला आणि त्याच्या खोटारडेपणाला कंटाळून दिया तीन महिन्यांपूर्वीच त्याला सोडून निघून गेली होती.