शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मुलाचा खून करून संगीत शिक्षकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:01 IST

एकीकडे लाखो रुपयांचे कर्ज, त्यात पत्नीनेही साथ सोडली. त्यामुळे पत्नीच्या विरहातून ठाण्यातील संगीत शिक्षक शोमीक बिजोय घोष (३९) याने मुलगा एकाक्ष याचा खून करून नंतर

ठाणे : एकीकडे लाखो रुपयांचे कर्ज, त्यात पत्नीनेही साथ सोडली. त्यामुळे पत्नीच्या विरहातून ठाण्यातील संगीत शिक्षक शोमीक बिजोय घोष (३९) याने मुलगा एकाक्ष याचा खून करून नंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना कासारवडवली येथे बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी गुरुवारी सकाळी खून आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे.घोष यांनी बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांचे कारचालक प्रवीण चव्हाण (रा. पातलीपाडा, ठाणे) यांना काही कामानिमित्त एका वकिलाला घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे चव्हाण वकिलाला घेऊन कासारवडवलीतील ‘विजय एनक्लेव्ह’ येथे दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पोहोचले. तेव्हा घराचा दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या आणि पोलिसांच्या मदतीने त्यांनी दरवाजा तोडून घरात शिरकाव केला. त्यावेळी शोमीक हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. तर, मुलगा एकाक्ष हाही बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले आणि निरीक्षक नासीर कुलकर्णी यांनी घरात झडती घेतली, तेव्हा पत्नी सोडून गेल्यामुळे आपण आत्महत्या करत आहे, अशा आशयाच्या त्याने चार वेगवेगळ्या चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. त्यातील एक पत्नी, दुसरी पोलिसांच्या नावाने, तर उर्वरित दोन घरमालकाच्या नावाने आहेत. चारही चिठ्ठ्यांमध्ये जवळपास सारखाच मजकूर आहे. कर्जबाजारी असला तरी त्याबाबतचा फारसा उल्लेख नाही. पण, पत्नीला उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये तिच्याकडून घेतलेल्या पैशांचा उल्लेख असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढोले यांनी सांगितले.खोटारडेपणाला कंटाळून विभक्त१शोमीकने २०१७ मध्ये दिया या तरुणीशी दुसरे लग्न केले. तिच्याकडून त्याने लग्नाआधीच ४० लाख आणि नंतर २० लाख असे ६० लाख रुपये वेगवेगळ्या कारणांनी घेतले होते.२इमारतीमधील वाहने धुणाºया एका व्यक्तीकडून ५० हजार रुपये, तर मुंबईतील सिंग या व्यक्तीकडूनही त्याने २५ लाख रुपये घेतले होते. अशा अनेक लोकांकडून त्याने एक ते दोन कोटींपेक्षा अधिक रक्कम कर्जाऊ घेतलेली असल्यामुळे अनेकांनी त्यांच्याकडे पैशांचा तगादा लावला होता.३या प्रत्येकाला तो वेगवेगळी कारणे देऊन चकवा देत होता. त्याचे आईवडील कोलकाता येथे जिवंत असतानाही त्याने ते मृत पावल्याचे पत्नी दियाला सांगितले होते. परंतु, पत्नी या त्याच्या खोटारडेपणाला कंटाळली होती. घरीही कर्जवसुली करणाºयांच्या चकरा वाढल्या होत्या. या सर्वच प्रकाराला आणि त्याच्या खोटारडेपणाला कंटाळून दिया तीन महिन्यांपूर्वीच त्याला सोडून निघून गेली होती.