शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

बर्थडेत न आल्याच्या रागातून तरुणांचा खून, आरोपीला अटक केल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेणार, कुटुंबाचा पवित्रा

By सदानंद नाईक | Updated: October 10, 2023 18:50 IST

शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उल्हासनगर: बर्थडेला न आल्याच्या रागातून मित्राने पोटात चाकूने वार केलेल्या प्रदीप वर्मा या तरुणांचा मंगळवारी मृत्यू झाला. मुलांच्या खुन्याला अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा वडीलासह नातेवाईकांनी घेतल्याने, शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-२ हनुमाननगर पाण्याच्या टाकी परिसरात रामबाबू वर्मा हे कुटुंबासह राहतात. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान त्यांचा प्रदीप नावाचा मुलगा घराबाहेर उभा असतांना ओळखीचा मित्र लोलो उर्फ सोहेल खान याने बर्थडे पार्टीला आला नाही, या रागातून प्रदीप वर्मा या तरुणांच्या पोटावर चाकूने वार केले. तसेच त्याला कोणी बचावासाठी आलातर, मारण्याची धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली. 

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी प्रदीप यांच्यावर प्रथम मध्यवर्ती रुग्णालयात उपचार केल्यानंतर, खाजगी रुग्णालयात हलविले. १९ दिवसांच्या झुंजीनंतर मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकारने परिसरात संताप व्यक्त होत आहे. वडील रामबाबू यांच्यासह नातेवाईकांनी जो पर्यंत पोलीस आरोपीला अटक करीत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला.

तसेच उपचारावर ७ ते ८ लाख रुपये खर्च करूनही मुलगा न वाचल्याची खंत वडील रामबाबू वर्मा यांनी व्यक्त केली आहे. वाढदिवसाला आला नाही यारागातून ओळखीच्याच मित्राने प्रदीप वर्मा या तरुणांचा खून केल्याने, गुन्हेगारीच्या संख्येत वाढ झाल्याचे उघड झाले. उल्हासनगर पोलीसांनी घटनेच्या १९ दिवसानंतरही मुख्य आरोपीला अटक केली नसल्याने, सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारी